शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पालिकेचा कारभार वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:19 PM

अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे.

ठळक मुद्देदेवळी येथील प्रकार : सीओ ‘नॉट रिचेबल’

ऑनलाईन लोकमतदेवळी : अनेक कारणांनी येथील नगर परिषद प्रशासन वादात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवर असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे. या प्रकारामुळे नागरिकांची कामे खोळंबत असून त्यांचा त्रास वाढत आहे.या नगर परिषदमध्ये खा. तडस यांच्या प्रयत्नातून कोट्यवधीची विकास कामे सुरू आहे. यामध्ये साडेतील कोटींचे नाट्यगृह, तीन कोटींचे स्टेडियम, सहा कोटींच्या खर्चातून शॉपींग कॉम्प्लेक्स, बाजार ओट्याचे बांधकाम तसेच आठवडी बाजाराचे सौदर्यीकरण, दोन कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे सौदर्यीकरण, ३५ कोटींच्या खर्चातून नगर परिषदेच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम सुरू आहे. तसेच अंतर्गत रसते, नाल्या व इतर विकासकामे प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे न.प. मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीत होत आहे. त्यामुळे या सर्व विकासकामांच्या गुणवत्तेचा वाली कोण याबाबत विचारणा होत आहे.शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणाकरिता यंत्रणा गत एक ते दीड महिन्यापासून धावत आहे; परतु या सर्व घडामोडीत न.प.चा कमांकडरच नामामत्र ठरल्याने ही मोहीम रखडल्यात जमा आहे. अनेक दैनंदिन कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.मालकी हक्काच्या जागेच्या विवरणासहीत प्रॉपर्टी बाबतच्या अडचणी तसेच महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रासाठभ नागरिकांची फरफट होत आहे. बरेचदा न.प. स्थायी समितीच्या बैठकीला सुद्धा ते गैरहजर राहत आहेत. महत्त्वपूर्ण व आर्थिक बाबीवरील निर्णय उपस्थित सदस्यांवर सोडले जात आहे.नगर परिषद कार्यालयातील काहींवर कामाचा अतिभार व काहींवर मर्जी ठेवल्या जात असल्याने कर्मचाºयांत प्रत्येक विभागात आधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने गोंधळाची स्थिती आहे. दिवाबत्तीच्या तक्रारीचे वेळोवेळी निवारण, स्वच्छतेबाबत लोकांच्या अडचणी तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली आहे. विकास कामांसोबतच दैनंदिन येणाऱ्या अडचणीबाबत येथील नगरसेवकांची हतबलता केविलवाणी ठरली आहे. याकडे खासदारांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.कर्मचाऱ्यांचा थाट ‘आऊट आॅफ कंट्रोल’मुख्याधिकारी महिन्यातून फक्त दोन ते चार दिवसच ते पालिकेच्या कार्यालयात हजर राहत आहेत. अधिकारी नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचा थाट सध्या आऊट आॅफ कंट्रोल होवू पाहता आहे. खा.रामदास तडस यांची नगर परिषद म्हणून याकडे पाहिले जात आहे. असे असताना येथे असलेली अनागोंदी सर्वांना बुचकळ्यात पाडणारी आहे.