शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आई कुणा म्हणू मी..! आता आई घरी ना दारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

अडीच वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी मुलगा आणि मुलगी, अशा जुळ्यांना जन्म दिल्यानंतर माउलीची अचानक प्रकृती खालावली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे परिवाराला मोठा धक्का बसला असून ‘आता आई कुणा म्हणू मी ! आई घरी ना दारी...’ अशी म्हणण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआंजी (मोठी) : आईची माया विकत घेता येत नाही आणि ती कोणी देऊही शकत नाही,असाच प्रसंग सध्या आंजी येथील तीन चिमुकल्यांवर ओढवला आहे. अडीच वर्षांपूर्वी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर सहा दिवसांपूर्वी मुलगा आणि मुलगी, अशा जुळ्यांना जन्म दिल्यानंतर माउलीची अचानक प्रकृती खालावली. रुग्णालयात उपचार सुरू असताना बुधवारी रात्री तिची प्राणज्योत मालवली. त्यामुळे परिवाराला मोठा धक्का बसला असून ‘आता आई कुणा म्हणू मी ! आई घरी ना दारी...’ अशी म्हणण्याची वेळ चिमुकल्यांवर आली आहे.आंजी येथील रहिवासी प्रशांत जोशी यांचा तीन वर्षांपूर्वी यवतमाळ येथील हर्षा नामक मुलीशी विवाह झाला. प्रशांत, हर्षा आणि प्रशांत यांची वृद्ध दिव्यांग आई, असा तिघांचाच परिवार आहे. त्यांच्याकडे थोडी शेती असून ते पुजारी आहेत. अडीच वर्षांपूर्वी त्यांना मुलगी झाली. त्यानंतर त्यांच्या परिवारात एक चैतन्य निर्माण झाले होते. सर्वकाही सुरळीत सुरू असताना दरम्यानच्या काळात हर्षाला प्रकृतीचा त्रास जाणवायला लागला. अशातच तिला गर्भधारणा झाल्याने यवतमाळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु जुळे मुले असल्याने डॉक्टरांनी सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे हर्षाला सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सर्व उपचार केल्यानंतर सहा दिवसांपूर्वी तिने मुलगा- मुलगी, अशा दोन गोंडस बाळांना जन्म दिला; पण प्रकृती खालावल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. बाळांची प्रकृती ठणठणीत असून, तिच्याही प्रकृतीत सुधारणा होत होती. बुधवारी अचानक प्रकृती खालावली आणि रात्रीच्या सुमारास तिने जगाचा निरोप घेतला. या घटनेने जोशी परिवाराला मोठा धक्का बसला असून, आता दोन चिमुकल्या जुळ्यांसह अडीच वर्षांच्या मुलीचा सांभाळ करण्याची मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. दोन चिमुकल्यांना आईचा  नीट चेहराही लक्षात नसताना नियतीने हिरावून घेतल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

‘त्या’ चिमुल्यांचे काय? -    हर्षा यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयातून बाळांनाही सुटी देण्यात आली असून, सध्या ते परिवाराच्या स्वाधीन करण्यात आले. गुरुवारी दुपारी साश्रुनयनांनी हर्षाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडत होता. तो म्हणजे ‘त्या’ चिमुकल्यांचे काय? हा प्रश्न परिवारासह नातेवाइकांनाही पडला आहे. परिवारातील सदस्य आणि नातेवाईक या चिमुकल्यांचा सांभाळ करीत आहेत.

 

टॅग्स :Deathमृत्यू