शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 22:24 IST

विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणे आणि त्यांना घरी पोहोचविण्याकरिता सध्या स्कूल बसची व्यवस्था काही शाळा स्वत: करतात.

ठळक मुद्देउप प्रादेशिक परिवहन विभागाचे दुर्लक्ष : अनेक वाहनांतून आवश्यक सुविधाही बेपत्ता

रूपेश खैरी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविणे आणि त्यांना घरी पोहोचविण्याकरिता सध्या स्कूल बसची व्यवस्था काही शाळा स्वत: करतात. ज्या शाळेकडून अशी व्यवस्था करण्यात येत नाही तिथे विद्यार्थ्यांना पोहोचविण्याकरिता खासगी व्हॅनचा वापर करण्यात येतो. या खासगी व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविण्यात येत असल्याचे ‘लोकमत’ने गुरुवारी राबविलेल्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले आहे.विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याकरिता असलेल्या या वाहनांची स्कूल बस म्हणून उपप्रादेशिक परिवहन विभागात नोंद असते. या वाहनांत नियमानुसार काही प्राथमिक सुविधा देत विद्यार्थ्यांची संख्या ठरविल्या जाते. परवानगीच्या वेळी नियमाचे काटेकोर पालन करण्याची शपथ घेणाºया चालकांकडून प्रत्यक्षात मात्र नियमांचे उल्लंघन होते. वर्धेतील विद्यार्थ्यांना पोहोचविणाºया या स्कूल व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्या जात आहे. यामुळे अशा वाहनांची तपासणी करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून कारवाई गरजेची झाली आहे.वयानुसार ठरते विद्यार्थी बसविण्याची संख्याउपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने दिलेल्या माहितीनुसार वाहनात विद्यार्थ्यांच्या वयानुयार बसविण्याची मुभा देण्यात आली आहे. खासगीत धावत असलेल्या वाहनात साधारणत: सहा प्रवासी आसन व्यवस्था आहे. या वाहनात १२ वर्षांपेक्षा कमी वयाचे विद्यार्थी असल्यास नऊ आणि १२ वर्षांपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी असल्यास सहा विद्यार्थी बसविण्याचा नियम आहे. मात्र येथे नियमांना डावलून यापेक्षा अधिक विद्यार्थी बसविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. एका वाहनात १० पेक्षा अधिक विद्यार्थी बसविल्या जात असल्याचे दिसून आले आहे.शहरातील साधारणत: बहुतांश शाळा सकाळच्या वेळी असल्याने एका वाहनात विविध शाळेचे सुमारे २० विद्यार्थी बसविल्या जात आहे. याकडे मात्र वाहतूक पोलिसांसह उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयाचे दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनचालकांवर कारवाई गरजेचे आहे.कामांची व्यस्ततेमुळे पालकांकडे नसलेला वेळ आणि घर ते शाळेतील वाढते अंतर यामुळे शहरी भागात मोठ्या प्रमाणात स्कूल बसचा वापर होतो. स्कूल बसचा वाढता वापर हा आज व्यवसाय झाला असून अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन झाला आहे. यात पालकांकडून आपल्या घराजवळ वा परिचित व्यक्तीला पसंती देत आपल्या पाल्याला शाळेत नेणे आणि आणण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवितात. ही जबाबदारी देताना पालकांकडून वाहन मालकाला नियमांबाबत कधी विचारणा करण्यात येत नाही. एका वाहनात किती विद्यार्थी बसविले पाहिजे याचा नियम पालकांना कदाचित माहीत नसावा. कधी त्यांनी तशी तसदीही घेतली नाही.आरटीओंंची तपासणी संशयाच्या भोवºयातउपप्रादेशिक परिवहन विभागाच्या दोन कर्मचाºयांचे पथक शहरात दररोज स्कूल बसच्या तपासणीकरिता कार्यरत असल्याचे सांगण्यात आले आहे. असे पथक कार्यरत असताना स्कूल आॅटोची जिल्ह्यात परवानगी नसताना त्यांच्यावर किंवा नियमांपेक्षा अधिक विद्यार्थी बसविणाºया स्कूल व्हॅनवर कुठलीही कार्यवाही करण्यात आल्याचे ऐकिवात नाही. या पथकाकडून रस्त्याने धावणाºया स्कूल व्हॅनमध्ये नियमानुसार आवश्यक सुविधा आहेत अथवा नाही, याची तपासणी होत नसल्याचेही वाहनांची पाहणी करताच उघड होते. विद्यार्थ्यांना शाळेत नेणाºया अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याचे दिसून आले आहे. चालकाच्या शेजारी असलेल्या सिटवर एकमेकांच्या मांडीवर विद्यार्थी बसून असल्याचे दिसून आले आहे. यातूनच अपघाताची शक्यता बळावत आहे. याबाबत उप प्रादेशिक परिवहन विभागाने कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.स्कूल व्हॅन म्हणून शहरातील रस्त्यावर धावत असलेल्या वाहनांची तपासणी करण्याकरिता दोन अधिकाºयांचे पथक निर्माण करण्यात आले आहे. शाळेच्या काळात वाहनांची तपासणी करण्याची जबाबदारी या पथकाला देण्यात आली आहे. त्यांच्याकडून तशी कार्यवाही सुरू आहे. त्यांना या संदर्भात कडक कारवाई करण्यासंदर्भात पुन्हा सूचना करण्यात येईल.- विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा .