शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
4
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
5
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
6
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
7
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
8
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
9
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
10
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
11
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
12
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
14
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
15
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
16
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
17
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
18
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
19
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
20
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लांबला; मृत जलसाठ्यावर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 22:18 IST

दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.

ठळक मुद्दे‘पाणी’ कोंडी : शहरात टँकरची मागणी वाढली, प्रशासनाचे नियोजन कोलमडले

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे ११ तर लघू जलाशयाची संख्या २३ च्या घरात आहे. मागील वर्षीपर्यंत या जलाशयात बºयापैकी जलसाठा उपलब्ध असायचा. मोठ्या व मध्यम ११ जलाशयामध्ये आज केवळ ३५ दलघमी म्हणजेच ६.९१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत या ११ ही जलाशयामध्ये तिप्पट म्हणजे १८.३५ टक्के (९५.४१ दलघमी) जलसाठा होता. यातून यावर्षीची पाण्याची भीषणता लक्षात येते. वर्धा शहरासह लगतच्या १३ ग्रा.पं. ला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून पाणीपुरवठा केला जातो. धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा आणि वेळेवर मान्सून येईल या अपेक्षेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. आजच्या घडीला धाम प्रकल्पात २.८५ दलघमी पाणीसाठा असून उन्हाच्या तीव्रतेने तो झपाट्याने तळ गाठत आहे. आता पुन्हा शहरातील पाणीपुरवठाही प्रभावित झाला असून नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातही टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे.पाटबंधारे विभागाने मागितली परवानगीधाम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ६९.४३५ दलघमी असून त्यापैकी जीवंत साठा ५९.४८५ दलघमी तर मृतसाठा ९.९५ दलघमी आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे धाम मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणी संचय झाला आहे. त्यामुळे आॅक्टोंबर २०१८ पासुनच बिगर सिंचनाकरिता धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ९ मे २०१९ रोजी फक्त ६.०५ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. मंडळ कार्यालयाने जानेवारी १९ ते मार्च १९ या तीन महिन्याचा पाणीवापर लक्षात घेता उर्वरित मे ते जून पर्यंत ८ दलघमी पाणी लागणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे ९ मे रोजी उपलब्ध ६.०५ दलघमी व उर्वरित कालावधीकरिता लागणारे पाणी ८ दलघमी याचा विचार करता २ ते ३ दलघमी पाण्याची तुट निर्माण होणार आहे. याचा विचार करता वर्धा नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पिपरी (मेघे) व शहराच्या सभोवतालच्या परिसरातील १३ गावे व इतर यंत्रणांना लागणाºया पिण्याच्या पाण्याची संभाव्य गरज भागविण्याकरिता धाम प्रकल्पाच्या मृत साठ्यातून ३ दलघमी पाणी वापर करण्याबाबत विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली आहे.मोठे व लघू जलाशय कोरडेठाकजिल्ह्यात ११ मोठे व मध्यम जलाशय असून यापैकी पोथरा,पंचधारा, मदन, मदन उन्नई व सुकळी लघू प्रकल्प यांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. यासोबत कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुºहा, रोठा-१, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवार, परसोडी, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या लघू प्रकल्पही कोरडेठाक असून सध्या केवळ ३.३७ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई