शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मान्सून लांबला; मृत जलसाठ्यावर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 22:18 IST

दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.

ठळक मुद्दे‘पाणी’ कोंडी : शहरात टँकरची मागणी वाढली, प्रशासनाचे नियोजन कोलमडले

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे ११ तर लघू जलाशयाची संख्या २३ च्या घरात आहे. मागील वर्षीपर्यंत या जलाशयात बºयापैकी जलसाठा उपलब्ध असायचा. मोठ्या व मध्यम ११ जलाशयामध्ये आज केवळ ३५ दलघमी म्हणजेच ६.९१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत या ११ ही जलाशयामध्ये तिप्पट म्हणजे १८.३५ टक्के (९५.४१ दलघमी) जलसाठा होता. यातून यावर्षीची पाण्याची भीषणता लक्षात येते. वर्धा शहरासह लगतच्या १३ ग्रा.पं. ला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून पाणीपुरवठा केला जातो. धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा आणि वेळेवर मान्सून येईल या अपेक्षेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. आजच्या घडीला धाम प्रकल्पात २.८५ दलघमी पाणीसाठा असून उन्हाच्या तीव्रतेने तो झपाट्याने तळ गाठत आहे. आता पुन्हा शहरातील पाणीपुरवठाही प्रभावित झाला असून नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातही टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे.पाटबंधारे विभागाने मागितली परवानगीधाम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ६९.४३५ दलघमी असून त्यापैकी जीवंत साठा ५९.४८५ दलघमी तर मृतसाठा ९.९५ दलघमी आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे धाम मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणी संचय झाला आहे. त्यामुळे आॅक्टोंबर २०१८ पासुनच बिगर सिंचनाकरिता धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ९ मे २०१९ रोजी फक्त ६.०५ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. मंडळ कार्यालयाने जानेवारी १९ ते मार्च १९ या तीन महिन्याचा पाणीवापर लक्षात घेता उर्वरित मे ते जून पर्यंत ८ दलघमी पाणी लागणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे ९ मे रोजी उपलब्ध ६.०५ दलघमी व उर्वरित कालावधीकरिता लागणारे पाणी ८ दलघमी याचा विचार करता २ ते ३ दलघमी पाण्याची तुट निर्माण होणार आहे. याचा विचार करता वर्धा नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पिपरी (मेघे) व शहराच्या सभोवतालच्या परिसरातील १३ गावे व इतर यंत्रणांना लागणाºया पिण्याच्या पाण्याची संभाव्य गरज भागविण्याकरिता धाम प्रकल्पाच्या मृत साठ्यातून ३ दलघमी पाणी वापर करण्याबाबत विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली आहे.मोठे व लघू जलाशय कोरडेठाकजिल्ह्यात ११ मोठे व मध्यम जलाशय असून यापैकी पोथरा,पंचधारा, मदन, मदन उन्नई व सुकळी लघू प्रकल्प यांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. यासोबत कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुºहा, रोठा-१, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवार, परसोडी, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या लघू प्रकल्पही कोरडेठाक असून सध्या केवळ ३.३७ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई