शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

मान्सून लांबला; मृत जलसाठ्यावर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 22:18 IST

दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.

ठळक मुद्दे‘पाणी’ कोंडी : शहरात टँकरची मागणी वाढली, प्रशासनाचे नियोजन कोलमडले

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : दिवसेंदिवस जलसंकट गडद होत असतानाच हवामान खात्याने मान्सून लांबल्याचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे आता जलाशयातील उपयुक्त जलसाठ्यातून शहराची तहान भागविणे प्रशासनालाही अडचणीचे ठरणार आहे. मान्सून वेळेवर येईल या आशेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. पण, आता ‘आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?’ अशी अवस्था निर्माण झाल्याने ही पाणीकोंडी फोडण्याकरिता मृत जलसाठ्याला हात घालावा लागणार आहे.वर्धा जिल्ह्यात मोठे व मध्यम असे ११ तर लघू जलाशयाची संख्या २३ च्या घरात आहे. मागील वर्षीपर्यंत या जलाशयात बºयापैकी जलसाठा उपलब्ध असायचा. मोठ्या व मध्यम ११ जलाशयामध्ये आज केवळ ३५ दलघमी म्हणजेच ६.९१ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवसापर्यंत या ११ ही जलाशयामध्ये तिप्पट म्हणजे १८.३५ टक्के (९५.४१ दलघमी) जलसाठा होता. यातून यावर्षीची पाण्याची भीषणता लक्षात येते. वर्धा शहरासह लगतच्या १३ ग्रा.पं. ला महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून पाणीपुरवठा केला जातो. धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा आणि वेळेवर मान्सून येईल या अपेक्षेने पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. आजच्या घडीला धाम प्रकल्पात २.८५ दलघमी पाणीसाठा असून उन्हाच्या तीव्रतेने तो झपाट्याने तळ गाठत आहे. आता पुन्हा शहरातील पाणीपुरवठाही प्रभावित झाला असून नागरिकांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यातही टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे.पाटबंधारे विभागाने मागितली परवानगीधाम प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ६९.४३५ दलघमी असून त्यापैकी जीवंत साठा ५९.४८५ दलघमी तर मृतसाठा ९.९५ दलघमी आहे. यावर्षी अपुºया पावसामुळे धाम मध्यम प्रकल्पामध्ये अत्यल्प पाणी संचय झाला आहे. त्यामुळे आॅक्टोंबर २०१८ पासुनच बिगर सिंचनाकरिता धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरणात ९ मे २०१९ रोजी फक्त ६.०५ दलघमी जलसाठा उपलब्ध होता. मंडळ कार्यालयाने जानेवारी १९ ते मार्च १९ या तीन महिन्याचा पाणीवापर लक्षात घेता उर्वरित मे ते जून पर्यंत ८ दलघमी पाणी लागणार असल्याचे कळविले आहे. त्यामुळे ९ मे रोजी उपलब्ध ६.०५ दलघमी व उर्वरित कालावधीकरिता लागणारे पाणी ८ दलघमी याचा विचार करता २ ते ३ दलघमी पाण्याची तुट निर्माण होणार आहे. याचा विचार करता वर्धा नगर परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पिपरी (मेघे) व शहराच्या सभोवतालच्या परिसरातील १३ गावे व इतर यंत्रणांना लागणाºया पिण्याच्या पाण्याची संभाव्य गरज भागविण्याकरिता धाम प्रकल्पाच्या मृत साठ्यातून ३ दलघमी पाणी वापर करण्याबाबत विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे परवानगी मागितली आहे.मोठे व लघू जलाशय कोरडेठाकजिल्ह्यात ११ मोठे व मध्यम जलाशय असून यापैकी पोथरा,पंचधारा, मदन, मदन उन्नई व सुकळी लघू प्रकल्प यांनी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. यासोबत कवाडी, सावंगी, लहादेवी, पारगोठाण, अंबाझरी, पांजरा बोथली, उमरी, टेंभरी, आंजी बोरखेडी, दहेगाव गोंडी, कुºहा, रोठा-१, रोठा-२, आष्टी, पिलापूर, कन्नमवार, परसोडी, मलाकापूर, हराशी व टाकळी बोरखेडी या लघू प्रकल्पही कोरडेठाक असून सध्या केवळ ३.३७ दलघमी जलसाठा उपलब्ध आहे.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई