वादळात मोबाईलचा वापर धोक्याचा
By Admin | Updated: June 11, 2014 00:13 IST2014-06-11T00:13:52+5:302014-06-11T00:13:52+5:30
पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता.

वादळात मोबाईलचा वापर धोक्याचा
वायगाव (नि़) : पावसाळ्याला सुरवात झाली आहे. या दिवसात विजा कडाडत असतात. अशावेळी मोबाईलवर चॅटिंग, मोबाईलवर बोलणे शक्यता टाळणे गरजेचे असते. गेल्या वर्षी मोबाईल हाताळताना एका युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रत्येकाने याबाबत काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांनी केले आहे.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वीज पडल्याने जीवीत हानी झाल्याच्या अनेक घटना घडत असतात अशा वेळी मोबाईलवर बोलणे टाळायणे गरजेचे आहे. जिल्ह्यात गेल्या वर्षात १३ जणांच्या अंगावार वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. जिल्ह्यातील ८ गावामध्ये वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. यात सेलू तालुक्यातील येळाकेळी, समुद्रपूर तालुक्यातील लोखंडी, हिंगणघाट निबोली, आष्टी तालुक्यातील साहूर, कारंजा तालुक्यातील राहटी चा सहा गावात वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. विजेपासून बचावाकरिता सुरक्षित राहण्याच्या आवाहनाकडे दुर्लक्ष न करता त्याबाबत काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. वादळ वारा सुरु होताच घरातील संगणक, टीव्ही आदी विद्युत उपकरणे बंद करुन त्यांना विद्युत स्त्रोतापासून वेगळे करणे आवश्यक आहे. तसेच विजा कडाडत असताना मोबाईलवर बोलणे अत्यंत धोक्याचे असते. तसेच घराची दारे व खिडक्या बंद करणेही गरजेचे असते. घराबाहेर असल्यास आकाशात वीज चमकल्यावर मेघ गर्जनांचा आवाज आल्यास त्या ठिकानावरुन ३ ते ४ किलोमिटर परिसरात वीज पडण्याची दाट शक्यता असते. शेतात काम करत असताना पायाखाली लाकूड किंवा कोरडा पाला पाचोळा ठेवणे हितावह असते. तसेच झाडाखाली आश्रय घेणे धोक्याचे असते. कारण झाडाम्वर वीज पडण्याचा धोका जास्त असतो. आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे अशा वातावरणात काळजी घेण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.(वार्ताहर)