जिल्हाधिकारी कार्यालयात चौकीदारी करा किंवा नोकरी सोडा
By Admin | Updated: January 29, 2016 04:52 IST2016-01-29T04:52:39+5:302016-01-29T04:52:39+5:30
नव्याने सेवेत रूजू झालेल्या गावस्तरावरील कोतवालांना यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयात रात्र दिवसपाळीत चौकीदारी करावी

जिल्हाधिकारी कार्यालयात चौकीदारी करा किंवा नोकरी सोडा
देवळी : नव्याने सेवेत रूजू झालेल्या गावस्तरावरील कोतवालांना यापुढे जिल्हाधिकारी कार्यालयात रात्र दिवसपाळीत चौकीदारी करावी लागेल. अन्यथा नोकरी सोडावी लागेल, असा तोंडी आदेश तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी तालुक्यातील कोतवालांना दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. तालुका कोतवाल संघटनेच्यावतीने खा. रामदास तडस यांना निवेदन सादर करून आदेशासंदर्भात दिलासा देण्याची मागणी केली आहे.
गावतपातळीवरील जमिनीचे खटले, संजय गांधी निराधार योजनेबाबतची माहिती तसेच तलाठ्यांनी दिलेल्या सूचना कास्तकारांपर्यंत पोहचविण्यासोबतच परिसरातील शेतात जावून शासकीय कामे करण्यासाठी आजपावेतो कोतवालांच्या कामाची पद्धत राहिली आहे. या व्यतिरिक्त तहसीलमधील कार्यालयीन कामे, रेकॉर्डचे दस्ते उचलून दुसरीकडे नेणे, चौकीदारी करणे व इतर कामे त्यांच्याकडून करून घेतली जात आहेत.
यापुढे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसा व रात्रपाळीत चौकीदारी व साफसफाईची कामे करावी लागणार असल्याचे दिसते. याबाबतचा तोंडी आदेश तहसीलदार जाधव यांनी दिला असून दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप आहे. नव्याने रूजू झालेले जास्तीत जास्त कोतवाल उच्चशिक्षित असून त्यांच्यावर लादली जात असलेली कामे धोरणात्मक नसल्याचा आरोप खा. तडस यांनी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
वृद्धाची आत्महत्या
घोराडा : येथील नामदेव रामाजी महाकाळकर (७५) यांनी घरामध्ये छताला गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास उघड झाली. त्यांच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. अवघ्या दोन महिन्या अगोदर पत्नीचे निधन झाले. त्यांच्या मागे मोठा आप्तपरिवार आहे.(वार्ताहर)