शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
5
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
6
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
7
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
8
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
9
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
10
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
11
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
12
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
13
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
14
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
15
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
16
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
17
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
18
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
19
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
20
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...

महात्मा गांधी यांचे राजकारण प्रेमाचे, द्वेषाचे नव्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 10:03 PM

जगभरातील साहित्य, कला आणि विविध माध्यमांवर महात्मा गांधी यांनी आपला ठसा उमटविला आहे. जनमानसावर अधिराज्य गाजविणारा हा महात्मा सर्वांनाच आपलासा वाटतो. कारण गांधींचे राजकारण हे प्रेमाचे होते, ते द्वेषमूलक नव्हते, असे प्रतिपादन म्युझियम आॅफ गोवाचे संस्थापक डॉ. सुबोध केरकर यांनी केले.

ठळक मुद्देसुबोध केरकर : ‘महात्मा गांधी एक कलाविष्कार’ विषयावर विशेष व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगभरातील साहित्य, कला आणि विविध माध्यमांवर महात्मा गांधी यांनी आपला ठसा उमटविला आहे. जनमानसावर अधिराज्य गाजविणारा हा महात्मा सर्वांनाच आपलासा वाटतो. कारण गांधींचे राजकारण हे प्रेमाचे होते, ते द्वेषमूलक नव्हते, असे प्रतिपादन म्युझियम आॅफ गोवाचे संस्थापक डॉ. सुबोध केरकर यांनी केले. ते दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठात गांधी १५० निमित्त आयोजित ‘महात्मा गांधी एक कलाविष्कार’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.व्यासपीठावर कुलगुरू डॉ. ए. जे. अंजनकर, डॉ. श्याम भुतडा, डॉ. अभय मुडे, डॉ. अथरूद्दीन काझी, डॉ. सीमा सिंग, प्रा. इंदू अलवटकर, संजय इंगळे तिगावकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे सभागृहात आयोजित या व्याख्यानात सुबोध केरकर यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनव्दारे जगभरातील कलाक्षेत्रावर असलेल्या गांधींच्या प्रभावाची सचित्र मांडणी केली. विविध देशातील मोठमोठ्या कंपन्यांना आपल्या उत्पादनाची जाहिरात करताना आजही गांधींचे चित्र, व्यंगचित्र, चलचित्र आणि विधानांचा वापर करावासा वाटतो. त्यामुळे फ्रान्सच्या सुगंधी अत्तर बनविणाऱ्या जगविख्यात कंपनीपासून तर अमेरिकेतल्या बियर निर्मात्यांना आणि फास्ट फूड विक्रेत्यांनाही गांधी त्यांच्या ब्रँडवर हवा असतो. कोलंबिया सरकारला नागरिकांना पायी चालण्याचा संदेश देताना फूटपाथवर गांधीजीच चित्रं लावाविशी वाटतात. इटालियन टेलिकॉम कंपनी आपली संवादयंत्रणा सर्वश्रेष्ठ आहे, हे दाखविण्यासाठी गांधीची मदत घेते. ब्रिटीश पेन कंपनी पेनाच्या नीबवर गांधींचे चित्र कोरते. गांधी केवळ भारतातल्या देवदेवतांच्या चित्ररूपात दिसत नाही तर पाश्चातांच्या सुपरहिरोंमध्ये गांधींना प्राधान्य आहे. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटात आणि कार्टून फिल्ममध्येही गांधी झळकतो आणि अनेक पॉप गायकांच्या गाण्यांतूनही तो व्यक्त होत राहतो. पाश्चात्य व्यंगचित्रकारांपासून तर नंदलाल बोस, आर. के. लक्ष्मण आणि राज ठाकरे यांच्या पर्यंत अनेकांना व्यंगचित्रातून संदेश देण्यासाठी गांधी हेच माध्यम उपयुक्त वाटते. जगभरात सर्वाधिक पुस्तके आणि व्यंगचित्रे ही गांधीवरची आहेत. जगभरातील अनेक मुख्य रस्त्यांना गांधीचेच नाव आहे. गांधींचा प्रभाव स्वातंत्र्यपूर्व काळातही इतका होता की १९४६ मध्ये ब्रिटीश सरकारने गांधी ट्रेन सुरू केली होती. तर १९४८ साली लालबागचा राजा मंडळाने महात्म्याला आदरांजली वाहण्यासाठी गणेशाची मूर्ती गांधीरूपात साकारली होती, अशी रंजक माहिती या व्याख्यानात सुबोध केरकर यांनी दिली. त्यांच्या संग्रहातील अनेकानेक दुर्मिळ छायाचित्रांना, चलचित्रांना, पाश्चात्य गाण्यांना, गांधीच्या वैद्यकीय अहवालाला आणि केरकरांनी केलेल्या वर्तमानकालीन राजकारणावरील टिपणीलाही उपस्थितांनी भरभरून दाद दिली. धर्म हा खाजगी असू शकतो; पण खरा धर्म मानवताच आहे, असे म्हणणारे महात्मा गांधी अंधश्रद्धांना विरोध करणारे आणि आपल्या व्यक्तिमत्त्व आणि सामाजिक जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार करीत प्रयोगशीलता जोपासणारे होते, अशी माहिती सुबोध केरकर यांनी दिली. गांधीविषयक विविध वस्तूंचा आणि दस्तावेजांचा संग्रह करणाºया डॉ. केरकरांनी यावेळी स्वनिर्मित गांधी अ‍ॅपचे प्रात्यक्षिकही दिले. गांधी अ‍ॅप मोबाईलमध्ये असल्यास जगभरातील कोणत्याही चलनासमोर आपल्या मोबाईल फोनचा कॅमेरा धरला असता गांधींचे चित्र फोनच्या स्क्रीनवर येत असल्याचे त्यांनी दाखविले. व्याख्यानाला शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.