शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Maharashtra Election 2019 :‘मत’उत्सवाचे ‘दान’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 5:00 AM

विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावर्षी चांगलाच रंगलेला आहेत. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात होते. त्यांना प्रचाराकरिता मिळालेल्या बारा दिवसाच्या कालावधीत त्यांनी आपला मतदार संघ पालथा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. सोबतच हा लोकशाही उत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडावा याकरिता प्रशासन यंत्रणाही सज्ज झाली.

ठळक मुद्देबजावले राष्ट्रीय कर्तव्य : चारही मतदारसंघांत उत्साह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सोमवारी लोकशाहीतील मतोत्सव साजरा करण्यात आला. शहरासह ग्रामीण भागातील मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर गर्दी करुन आपल्या उमेदवाराला मताचे दान केले.विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम यावर्षी चांगलाच रंगलेला आहेत. आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा मतदार संघातून ४७ उमेदवार रिंगणात होते. त्यांना प्रचाराकरिता मिळालेल्या बारा दिवसाच्या कालावधीत त्यांनी आपला मतदार संघ पालथा घालण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली. सोबतच हा लोकशाही उत्सव शांतता आणि सुव्यवस्थेत पार पडावा याकरिता प्रशासन यंत्रणाही सज्ज झाली. अखेर मतदानाचा दिवस उजाडला आणि चारही मतदार संघातील एकूण १३१४ मतदार केंद्रावर सकाळी सात वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. शहरासह ग्रामीण भागातील नवमतदारापासून तर वृद्ध मंडळींनीही या राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होऊन आपला अधिकार बजावला. बऱ्याचश्या भागामध्ये संथगतीने मतदानाची प्रक्रिया पार पडल्याने पहिल्या टप्प्यातील मतदान हे कमीच होते.दुपारनंतर मतदारांची ठिकठिकाणी गर्दी उसळली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पावसाची दाट शक्यता होती. परंतु निसर्गानेही या उत्सावाकरिता साथ दिल्याने सायंकाळपर्यंत शांततेत मतदान झाले.लोकप्रतिनिधींनीही रांगे उभे राहूनच केले मतदानमतदानाचा अधिकार हा सर्वांनाच सारखा असलेल्या हा अधिकार बजावताना लोकप्रतिनिंधीसह मोठ्या अधिकाऱ्यांनाही सारखाच न्याय दिल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदारांसह माजी आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, नगराध्यक्ष, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यासह विधानसभा निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार यांनीही आपापल्या मतदार संघातील मतदान केंद्रावर हजेरी लावली. त्या ठिकाणी मतदानाक रिता असलेल्या मतदारांच्या रांगेत उभे राहूनच आपले कर्तव्य बजावले. त्यामुळे सर्वसामान्य मतदार राजांनाही त्यांना एका मतदानाचे महत्त्व कळाले.नवमतदारांमध्येही मतदानाचा संचारला होता जोशजिल्ह्याच्या आर्वी, हिंगणघाट, देवळी व वर्धा या चारही मतदार संघात १८ ते १९ वयोगटातील मतदारांची संख्या १८ हजार ८३ मतदार आहे. यातील काही मतदार हे पहिल्यांदाच मतदान करणारे असल्याने त्यांच्यामध्ये आज जोश दिसून आला. आपल पहिल मतदान हे वाया जाता कामा नये म्हणून अनेकांनी विचारपूर्वक मतदान केले. त्यानंतर सेल्फी काढून ‘मी केले प्रथम मतदान...’ असे व्हाट्स अ‍ॅपवर स्टेटसही ठेवले आहे. यासोबत मतदानाचा टक्का वाढीच्या दृष्टीने आणि मतदानाचे महत्व इतरांना कळावे म्हणून सोशल मिडीयावर मतदान करण्याचे आणि मतदान केल्याचे अनेक संदेश झळकताना दिसून आले. त्यामुळे आज सोशल मिडीयाही या मतोत्सवात हाऊसफुल्ल झाला होता.

मतदान केंद्रावर सोईसुविधांचा अभाव, स्वयंसेवकांचे मोलाचे सहकार्यविधानसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर अत्यावश्यक सुविधांची संख्या लोकसभा निवडणुकीपासून दुप्पट करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर सावलीची व्यवस्था, दिव्यांग तसेच गर्भवती महिला मतदारांसाठी स्वयंसेवकांची मदत,लहान मुलांसाठी पाळणाघर, अंध आणि दिव्यांग मतदारांकरिता वाहतुकीची व्यवस्था, रांगेचे व्यवस्थापन, रॅम्पची व्यवस्था,पिण्याचे पाणी,विजेची उपलब्धता, मदत कक्ष, स्वच्छतागृहाची सुविधा व्यवस्था करण्यात करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. त्यानुसार प्रशासनाचे त्याची अंमलबजावणी केली परंतु ग्रामीण भागात काही ठिकाणी या सुविधांचा अभाव होता. वर्ध्यातील राष्ट्रभाषा येथील मतदान केंद्रावर अपंगाकरिता व्हीलचेअर नसल्याची ओरड मतदारांकडून करण्यात आली. विशेषत: प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवकांनी आपले मोलाचे कर्तव्य बजावले. 

टॅग्स :wardha-acवर्धा