शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महाराष्ट्र विकास आघाडीने स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा कार्यक्रमातून वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 1:30 PM

विद्यमान राजकीय स्थितीत राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना यांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून सरकार बनविण्याचे ठरविले आहे. या सरकारच्या किमान समान कार्यक्रमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वगळण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

ठळक मुद्देकिमान समान कार्यक्रमात स्थान नाहीशिवसेनेच्या विरोधामुळे दोनही कॉँग्रेसचे नमते

अभिनय खोपडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्याची कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसची जुनी मागणी आहे. अनेक कॉँग्रेस नेत्यांनी आजवर या मागणीला घेऊन विदर्भात आंदोलने केलीत. परंतु, विद्यमान राजकीय स्थितीत राज्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना यांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करून सरकार बनविण्याचे ठरविले आहे. या सरकारच्या किमान समान कार्यक्रमातून स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी वगळण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे.महाराष्ट्र राज्याचे विभाजन करून स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, ही मागणी महाराष्ट्रच्या निर्मितीपासून केली जात आहे. ही मागणी घेऊन कॉँग्रेस सरकारच्या काळात पक्षाच्या स्तरावर विविध ठराव घेण्यात आले. विदर्भातील अनेक कॉँग्रेस व राकॉँ नेते स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर समर्थक आहेत व राज्यनिर्मितीला या दोन्ही पक्षांनी आजवर पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी विदर्भातील जनतेची इच्छा असल्यास स्वतंत्र राज्याला विरोध नसल्याचे यापूर्वीच विदर्भात अनेकदा बोलून दाखविले. भारतीय जनता पक्षानेही स्वतंत्र विदर्भ राज्याचा पुरस्कार केला. मात्र, स्वतंत्र विदर्भ राज्य मागील पाच वर्षांत निर्माण केले नाही. यामागे शिवसेनेचा विदर्भ राज्याला असलेला विरोध हे एक प्रमुख कारण होते. भाजप, कॉँग्रेस, राकॉँ या तीनही पक्षातील विदर्भवादी नेते स्वतंत्र राज्याची भूमिका घेऊन आहेत. आता कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेनेसोबत महाराष्ट्र विकास आघाडी निर्माण करून राज्यात सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाली आहे. त्यांनी किमान समान कार्यक्रम तयार केला आहे. याला तीनही पक्षांनी मान्यता दिली आहे. या किमान समान कार्यक्रमात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सोडून देण्यात आली, अशी माहिती मिळाली आहे. शिवसेनेचा महाराष्ट्रच्या विभाजनाला कायम विरोध राहिला आहे. त्यामुळे स्वाभाविकच विदर्भाला विरोध असल्याने या मागणीला कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून सध्या सोडून देण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे.

स्वतंत्र विदर्भ राज्याचे आश्वासन भाजपने दिले होते. मात्र, ते त्यांनी पाळले नाही. कॉँग्रेस पक्षाच्या अजेंड्यावर सध्या विदर्भ राज्याचा प्रश्न नाही. महाराष्ट्र विकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम हा महाराष्ट्रतील तेरा कोटी जनतेच्या अडचणी व प्रश्न लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. यात स्वतंत्र विदर्भाचा उल्लेख नाही. सध्या शेतकरी अडचणीत आहे. त्याला आधार देण्याची गरज आहे. या बाबीवरच या किमान समान कार्यक्रमाचा केंद्रबिंदू राहणार आहे.- विजय वडेट्टीवार, आमदार तथा माजी विरोधी पक्ष नेते.

टॅग्स :Vidarbhaविदर्भmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी