शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

म. गांधी १५० वे जयंती वर्ष; ९४ वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यात रोवली ग्रामोद्योगाची मुहूर्तमेढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 4:09 PM

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सावली येथे १९२५ रोजी खादी कार्यालय सुरू झाले. या घटनेला ९४ वर्षे झाली. १४ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधींची पावले सावलीच्या मातीला स्पर्श झाली.

उदय गडकरी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर  : राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या प्रेरणेतून सावली येथे १९२५ रोजी खादी कार्यालय सुरू झाले. या घटनेला ९४ वर्षे झाली. १४ नोव्हेंबर १९३३ रोजी गांधींची पावले सावलीच्या मातीला स्पर्श झाली.राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव मोठ्या उत्साहात व प्रसन्न मनाने सहभागी झाले होते. नुतन राष्ट्रीय विद्यालयात त्यांचे प्रथम स्वागत

झाले. त्यानंतर पदयात्रा खादी ग्रामोद्योग कार्यालयाकडे आगेकुच झाली. गांधीजींनी परिसराची पाहणी करून थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर एक सभा झाली. खादी कार्यालयाचे तत्कालीन व्यवस्थापक एन. के. देशपांडे यांनी हस्तलिखीत मानपत्र देऊन गांधीजींचा सत्कार केला. मानपत्रासोबत राष्ट्रीय कार्यासाठी ६१ रूपयांची थैली सन्मानाने प्रदान केली. त्यानंतर १९३६ रोजी गांधीजी पुन्हा सावली गावाला भेट दिली. त्यावळी त्यांनी एक आवठडा मुक्काम केला होता. अ. भा. गांधी सेवा संघाची सभा झाली होती. त्यामध्ये गांधीजींसोबत आचार्य विनोबा भावे, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. राजेंद्र प्रसाद सहभागी झाले होते. २७ फेबु्रवारी ते ३ मार्च १९३६ पर्यंत कालावधी गांधीजींनी सावली येथे घालविला. याच काळात गांधीजींचे नातू कृष्णदास गांधी व मनोज्ञा यांचा अगदी साध्या पद्धतीने विवाह पार झाला. त्यावेळी ‘जगतवंद्य महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांना मानपत्र’ असा मजकूर असलेला मानपत्र गांधीजींना प्रदान करण्यात आला. खादी कार्यालय अविरतपणे सुरू आहे. पण, काळाच्या स्पर्धेत उत्पादनाने वेग धरला नाही. खादी कार्यालयातून स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक घडामोडी घडल्या. या कालखंडातील आठवणी व घटना भारतीय इतिहासाचा अविभाज्य घटक झाल्या आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधी