शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

देशावर प्रेम तर केलेच नाही; उलट देश विकायला निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणसासारखे जगता यावं असा संदेश दिला. त्याग आणि बलिदानातून मिळालेले सरकार विरोधी पक्ष बुडवायला निघाले आहे. लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्तरंजित क्रांती झाली. या रक्तरंजित क्रांतीमधून देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला आपापले अधिकार मिळून जगता यावे म्हणून काँग्रेसने आपल्या राजवटीत प्राधान्य दिले. नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणून सातत्याने देशाला शिखरावर पोहोचविण्याचे कार्य केले. परंतु आजची परिस्थिती फार भयावह आहे. केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी देशावर कुठल्याही प्रकारचे प्रेम केले नाही. उलट तेच आज देश विकायला निघाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘प्रारंभ... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा’ अंतर्गत आष्टीमध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकास क्रीडामंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, माजी मंत्री अशोक शिंदे, आमदार रणजित कांबळे, आयोजक माजी आमदार अमर काळे, नाना गावंडे, शेखर शेंडे, अतुल लोंढे, बाळ कुळकर्णी आदी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी अतिथींचे आष्टीच्या शहीद स्मारकावर आगमन झाले. सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणसासारखे जगता यावं असा संदेश दिला. त्याग आणि बलिदानातून मिळालेले सरकार विरोधी पक्ष बुडवायला निघाले आहे. लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडविला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रचंड मेहनत घेऊन लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही आज केंद्र सरकारच्या हुकुमशाही पद्धतीमुळे प्रचंड अडचणीत आली आहे. त्याला वाचविण्याची खºया अर्थाने गरज आहे, त्यासाठी एकदिलाने पुढे या, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले. माजी आमदार अमर काळे यांनी प्रास्ताविकातून १९४२ च्या स्वातंत्र लढ्यातील इतिहास कथन केला. पारतंत्र्याच्या काळात तुटलेल्या देशाला बळकटीवर उभारणी देण्याचे काम काँग्रेसनेच केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहीदांच्या वारसांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवंदना व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी : पालकमंत्री- शेतकरी हक्कासाठी जेव्हा लढा देतो. तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी पाठीशी उभा राहतो. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने साधी दखलही घेतली नाही. ही लोकशाही मार्गाने जाणारी वाटचाल तात्काळ रोखायला हवी, असे मत पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

- याप्रसंगी विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्राणाची आहुती देणाºयांचा हा देश असून आज लोकशाहीची विरोधकांकडून अवहेलना होत आहे. राज्यघटना पायदळी तुडवून देश नामशेष करण्याचा विरोधकांचा डाव सुरू असल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख यांनी ही मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस