शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशावर प्रेम तर केलेच नाही; उलट देश विकायला निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणसासारखे जगता यावं असा संदेश दिला. त्याग आणि बलिदानातून मिळालेले सरकार विरोधी पक्ष बुडवायला निघाले आहे. लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्तरंजित क्रांती झाली. या रक्तरंजित क्रांतीमधून देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला आपापले अधिकार मिळून जगता यावे म्हणून काँग्रेसने आपल्या राजवटीत प्राधान्य दिले. नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणून सातत्याने देशाला शिखरावर पोहोचविण्याचे कार्य केले. परंतु आजची परिस्थिती फार भयावह आहे. केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी देशावर कुठल्याही प्रकारचे प्रेम केले नाही. उलट तेच आज देश विकायला निघाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘प्रारंभ... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा’ अंतर्गत आष्टीमध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकास क्रीडामंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, माजी मंत्री अशोक शिंदे, आमदार रणजित कांबळे, आयोजक माजी आमदार अमर काळे, नाना गावंडे, शेखर शेंडे, अतुल लोंढे, बाळ कुळकर्णी आदी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी अतिथींचे आष्टीच्या शहीद स्मारकावर आगमन झाले. सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणसासारखे जगता यावं असा संदेश दिला. त्याग आणि बलिदानातून मिळालेले सरकार विरोधी पक्ष बुडवायला निघाले आहे. लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडविला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रचंड मेहनत घेऊन लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही आज केंद्र सरकारच्या हुकुमशाही पद्धतीमुळे प्रचंड अडचणीत आली आहे. त्याला वाचविण्याची खºया अर्थाने गरज आहे, त्यासाठी एकदिलाने पुढे या, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले. माजी आमदार अमर काळे यांनी प्रास्ताविकातून १९४२ च्या स्वातंत्र लढ्यातील इतिहास कथन केला. पारतंत्र्याच्या काळात तुटलेल्या देशाला बळकटीवर उभारणी देण्याचे काम काँग्रेसनेच केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहीदांच्या वारसांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवंदना व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी : पालकमंत्री- शेतकरी हक्कासाठी जेव्हा लढा देतो. तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी पाठीशी उभा राहतो. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने साधी दखलही घेतली नाही. ही लोकशाही मार्गाने जाणारी वाटचाल तात्काळ रोखायला हवी, असे मत पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

- याप्रसंगी विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्राणाची आहुती देणाºयांचा हा देश असून आज लोकशाहीची विरोधकांकडून अवहेलना होत आहे. राज्यघटना पायदळी तुडवून देश नामशेष करण्याचा विरोधकांचा डाव सुरू असल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख यांनी ही मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस