शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देत बसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...', विधानसभेत काँग्रेसच्या उपमुख्यमंत्र्यांनी गायले RSS चे प्रार्थना गीत
3
बापरे! रात्रभर बेडवर नागाजवळ झोपला, सकाळी डोळं उघडताच धक्का बसला, घडलं असं...
4
"चावण्याचं कारण केवळ..."; नसबंदीनंतर कुत्र्यांना सोडून देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर नेमकं काय म्हणाल्या मनेका गांधी?
5
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
6
Asia Cup 2025 : MS धोनीनं करुन दाखवलं ते सूर्याला जमणार का? रोहितही ठरलाय फेल! जाणून घ्या खास रेकॉर्ड
7
Bigg Boss 19 Contestant List : 'बिग बॉस १९'मध्ये कोण जाणार? लिस्ट आली समोर, नावं वाचून थक्कच व्हाल
8
Video : युद्धाच्या १२ दिवसांनंतर इराणचा 'पॉवर शो', एका मिनिटात ११ मिसाईल डागून जगाला दिली 'ही' वॉर्निंग!
9
Dream11, एमपीएल, झूपीसह अनेक कंपन्यांकडून 'रियल मनी गेम्स' बंद; तुमच्या पैशांचं काय होणार?
10
२८ कोटी युझर्स, ९६०० कोटींचा महसूल; Dream 11 चा 'गेम' झाला, गेमिंग विधेयकानंतर बंद करण्याची तयारी?
11
बाई हा काय प्रकार? 'पुढचं पाऊल' फेम अभिनेत्रीचा प्रताप, नवऱ्याचं फक्त धड चेहरा गायब
12
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
13
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
14
Shravan Shukravar 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारनिमित्त देवीचे 'असे' करा कुंकुमार्चन; होईल शीघ्रकृपा!
15
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
16
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
17
मराठी, इंग्रजी, गणितात किती मार्क, विश्वास नांगरे पाटलांची आठवीतील गुणपत्रिका बघितली का?
18
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
19
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
20
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?

देशावर प्रेम तर केलेच नाही; उलट देश विकायला निघाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 05:00 IST

सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणसासारखे जगता यावं असा संदेश दिला. त्याग आणि बलिदानातून मिळालेले सरकार विरोधी पक्ष बुडवायला निघाले आहे. लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडविला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : इंग्रजांच्या तावडीतून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी रक्तरंजित क्रांती झाली. या रक्तरंजित क्रांतीमधून देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर प्रत्येकाला आपापले अधिकार मिळून जगता यावे म्हणून काँग्रेसने आपल्या राजवटीत प्राधान्य दिले. नागरिकांना विकासाच्या प्रवाहात आणून सातत्याने देशाला शिखरावर पोहोचविण्याचे कार्य केले. परंतु आजची परिस्थिती फार भयावह आहे. केंद्रात ज्यांचे सरकार आहे, त्यांनी देशावर कुठल्याही प्रकारचे प्रेम केले नाही. उलट तेच आज देश विकायला निघाले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्यावतीने ‘प्रारंभ... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा’ अंतर्गत आष्टीमध्ये ‘व्यर्थ न हो बलिदान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमाला राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, दुग्धविकास क्रीडामंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख, माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, माजी मंत्री अशोक शिंदे, आमदार रणजित कांबळे, आयोजक माजी आमदार अमर काळे, नाना गावंडे, शेखर शेंडे, अतुल लोंढे, बाळ कुळकर्णी आदी मंचावर उपस्थित होते. प्रारंभी अतिथींचे आष्टीच्या शहीद स्मारकावर आगमन झाले. सर्व मान्यवरांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्याच्या स्थळी सर्व मान्यवरांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली तसेच या स्थळाची पाहणी केली. त्यानंतर व्यर्थ न हो बलिदान कार्यक्रमाला सुरुवात झाली. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने माणसाला माणसासारखे जगता यावं असा संदेश दिला. त्याग आणि बलिदानातून मिळालेले सरकार विरोधी पक्ष बुडवायला निघाले आहे. लोकशाहीची सर्व मूल्ये पायदळी तुडविला जात आहे. त्यामुळे काँग्रेसने प्रचंड मेहनत घेऊन लोकांसाठी निर्माण केलेली लोकशाही आज केंद्र सरकारच्या हुकुमशाही पद्धतीमुळे प्रचंड अडचणीत आली आहे. त्याला वाचविण्याची खºया अर्थाने गरज आहे, त्यासाठी एकदिलाने पुढे या, असे आवाहनही नाना पटोले यांनी केले. माजी आमदार अमर काळे यांनी प्रास्ताविकातून १९४२ च्या स्वातंत्र लढ्यातील इतिहास कथन केला. पारतंत्र्याच्या काळात तुटलेल्या देशाला बळकटीवर उभारणी देण्याचे काम काँग्रेसनेच केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शहीदांच्या वारसांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते शाल श्रीफळ व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राष्ट्रवंदना व राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. 

काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी : पालकमंत्री- शेतकरी हक्कासाठी जेव्हा लढा देतो. तेव्हा काँग्रेस पक्ष त्यांच्यासाठी पाठीशी उभा राहतो. गेल्या वर्षभरापासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची केंद्र सरकारने साधी दखलही घेतली नाही. ही लोकशाही मार्गाने जाणारी वाटचाल तात्काळ रोखायला हवी, असे मत पालकमंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

- याप्रसंगी विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्राणाची आहुती देणाºयांचा हा देश असून आज लोकशाहीची विरोधकांकडून अवहेलना होत आहे. राज्यघटना पायदळी तुडवून देश नामशेष करण्याचा विरोधकांचा डाव सुरू असल्याचे सांगितले. यावेळी माजी मंत्री चंद्र्रकांत हंडोरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष विनायक देशमुख यांनी ही मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस