शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

विदर्भाचे गणेश : नवसाला पावणारा केळझरचा श्री सिद्धिविनायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2022 12:30 IST

अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक जागृत मूर्ती असल्याने येथील बाप्पा भाविकांच्या नवसाला पावणारा असल्याची सर्वत्र ख्याती आहे.

संघर्ष जाधव

केळझर (वर्धा) :विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणराज म्हणजे केळझर येथील श्री सिद्धिविनायक होय. केळझर हे गावच टेकड्यांच्या कुशीत वसल्याने निसर्गरम्य परिसरात हे मंदिर आहे. या मंदिरामध्ये गणेशोत्सनिामित्त गणेश चतुर्थीपासून दहा दिवस उत्सव साजरा केला जातो. या उत्सावाकरिता विदर्भातीलच नाही तर इतरही ठिकाणच्या भक्तांची मांदियाळी असते.

केळझर हे गाव वर्धा ते नागपूर मार्गावर वर्ध्यापासून पूर्वेस २५ किलोमीटर तर नागपूरपासून ५२ किलोमीटर अंतरावर आहे. भाविकांना या देवस्थानात येण्याकरिता एसटी महामंडळाच्या बसेस, ट्रॅव्हल्स आणि ऑटोचीही सुविधा आहे. येथील वरदविनायकाची मूर्ती ४ फूट ६ इंच उंच असून तिचा व्यास १४ फुट आहे. अत्यंत प्रसन्नचित्त, मनमोहक जागृत मूर्ती असल्याने येथील बाप्पा भाविकांच्या नवसाला पावणारा असल्याची सर्वत्र ख्याती आहे. टेकडीवर मंदिर परिसर असल्याने निसर्ग सौंदर्यात आणखीच भर पडली आहे.

या मंदिरात बाराही महिने भाविकांची उपस्थिती असते. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. वैशाख महिन्यात जागेश्वर महाराज स्मृतीनिमित्त सप्ताह, भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी उत्सव, अश्विन महिन्यात नवरात्रोत्सव, कार्तिक महिन्यात कार्तिक मास उत्सव, पौष महिन्यात एक दिवसीय यात्रा महोत्सव, माघ महिन्यात गणेश जयंती व महालक्ष्मी उत्सव आणि गजानन महाराज प्रगट दिन उत्सव आदी साजरे केले जातात.

ही तर ऐतिहासिक ‘एकचक्र नगरी’

वशिष्ट पुराणामध्ये व महाभारतामध्ये केळझर गावाचे नाव ‘एक चक्रनगर’ असल्याचा उल्लेख आहे. वशिष्ट पुराणाप्रमाणे श्री रामचंद्र प्रभूंचे गुरू वशिष्ट ऋषी यांचे येथे वास्तव्य असल्याची नोंद असून ऋषींनी स्वत: भक्ती व पूजेकरिता या गणपतीची स्थापना केली आहे. त्यानंतर याच काळात वर्धा नदीच्या निर्मितीचा देखील उल्लेख आहे. पुराणाप्रमाणे या गणपतीचे नाव वरद विनायक व वर्धा नदीचे नाव वरदा असल्याचे कळते. हा काळ श्रीराम जन्माच्या पूर्वीचा असून श्रीराम जन्मानंतर वशिष्ट ऋषींनी येथील वास्तव्य सोडले.

असा आहे येथील इतिहास

या एकचक्र नगरीत कुंतीपुत्र पांडव वास्तव्याला असताना बकासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याचा उल्लेख आहे. वर्धा-नागपूर मुख्य मार्गावर आग्नेय बाजूला बौद्ध विहाराच्या समोर बकासूर राक्षसाचे मैदान तोंड्या राक्षस म्हणून प्रचलित आहे. येथील टेकडीला वाकाटकच्या काळापासून भव्य किल्ल्याचे ठिकाण होते. या किल्ल्याला पाच बुरूज व माती, दगडांनी बांधलेले भव्य परकोट होते. पहिल्या व दुसऱ्या परकोटाचे आत चौकोनी सुंदर व भव्य अशी कुशावरती विहीर बांधलेली असून त्याला गणेश कुंड या नावाने ओळखतात. बरेचसे भाविक या विहिरीच्या पाण्याचा तीर्थ म्हणून उपयोग करतात. वाकाटकानंतर प्रवर्शन राजाचे हे गाव मुख्यालय असल्याची इतिहासात नोंद आहे. भोसले इतिहासाप्रमाणे भोसले राजे कोल्हापूरवरून नागपूरला स्थलांतरित होण्यापूर्वी त्यांचा केळझरला मुक्कामी राहिल्याची नोंद आहे.

टॅग्स :SocialसामाजिकGaneshotsavगणेशोत्सवganpatiगणपतीVidarbhaविदर्भ