शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

Lok Sabha Election 2019; शहरात सरासरी ६२ टक्के मतदारांनी बजावला हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 9:50 PM

तालुक्यात सरासरी ६५, तर शहरात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदान करण्याकरिता पुरुषापेक्षा महिला मतदारांची जास्त गर्दी होती. एकूण १२ मतदान केंद्रावर १०९९३ पैकी ६८२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला

ठळक मुद्देखर्डीपुरा केंद्रावर रात्री ७ पर्यंत मतदारांच्या रांगा : नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी केले मतदान

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घा.) : तालुक्यात सरासरी ६५, तर शहरात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. मतदान करण्याकरिता पुरुषापेक्षा महिला मतदारांची जास्त गर्दी होती. एकूण १२ मतदान केंद्रावर १०९९३ पैकी ६८२० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाशहरातील खर्डीपुरा शाळा मतदान केंद्रावर रात्री ७ वाजतासुद्धा मतदारांची मोठी रांग होती. जवळजवळ ८ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालली. या केंद्रावर ७५ टक्के मतदान झाले. मशीनची गती संथ असल्यामुळे मतदानाला वेळ लागत होता. अनेक मतदार कंटाळले, थकले; पण मतदान करूनच बाहेर आले.शहरातील शिक्षित भागात असलेल्या बूथ क्र. ९५,९६,९७,९८,९९ वर मतदानाचा टक्का कमी झाला असून अशिक्षित भागातील म्हणजेच खर्डीपुरा भागातील ९१,९२,९३ आणि ९४ या बूथ क्रमाकांवर मतदान जास्त झाले. म्हणजेच या वेळेस अशिक्षित व कष्टकरी लोकांचा मतदान करण्याचा उत्साह जास्त, तर शिक्षित लोकांचा उत्साह कमी दिसून आला. शिक्षित भागातील बरेच कर्मचारी निवडणूक ड्युटीवर होते तर काहींनी मूळ गावी मतदान केले.तालुक्यातील ग्रामीण भागात बऱ्यापैकी मतदान झाले. एकूण सरासरी मतदान ६५ टक्के झाले. तुलनात्मकदृष्ट्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा मतदान काढण्याचा उत्साह जास्त दिसून आला. कारंजा तालुक्यात भाजपाचे ४ जि. प. सदस्य व सहा पंचायत समिती सदस्य असल्यामुळे तसेच पंचायत समिती व कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाचे ताब्यात असल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांचा प्रचारात बोलबोला जास्त दिसून आला.सावल येथील किशोर तुकाराम मानमोरे या नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान करून भारतीय लोकशाहीला महत्त्व दिले. भाजपा आणि कॉँग्रेस उमेदवार यांच्यातच काट्याची लढत झाली. भाजप उमेदवार रामदास तडस व कॉँग्रेस उमेदवार चारूलता टोकस यांचे राजकीय भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. कोण निवडून येणार हे २३ मे ला कळेल; पण तोपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जयपराजयाची गणिते मांडण्यात गुंग असल्याचे दिसून आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकwardha-pcवर्धाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019