शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लॉकडाऊन इफेक्ट; पोलिसांकडून आरोपींना पोलीस कोठडीऐवजी कारागृहात पाठवण्यावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 17:59 IST

लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना जेवणच मिळत नसल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे. परिणामी, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मागण्याऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दोन महिन्यांच्या कालावधीत दिसून आले आहे.

ठळक मुद्देहॉटेल्स, खानावळी बंद असल्याने आरोपींची खुराकही लॉक

राजेश सोळंकी।

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : कोरोना संकटकाळात सर्व नागरिक घरी बसले आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय ठप्प पडले आहेत. मात्र, जेवणावळी, हॉटेल्स बंद असल्याने याचा फटका लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींनाही बसत आहे. लॉकअपमध्ये असलेल्या आरोपींना जेवणच मिळत नसल्याने पोलिसांपुढेही पेच निर्माण झाला आहे. परिणामी, पोलिसांकडून न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मागण्याऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्यावरच अधिक भर दिला जात असल्याचे दोन महिन्यांच्या कालावधीत दिसून आले आहे.कोरोना विषाणू संक्रमणाचा फैलाव रोखण्यासाठी पोलीस विभागही रस्त्यावर उतरलेला दिसून येत आहे. एरव्ही गंभीर गुन्ह्यांचा तपास करणारे आणि आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करणारे पोलीसदादा आता नागरिकांमध्ये जनजागृती करताना दिसून येत आहेत. एखादी घटना घडल्यास आरोपींचा मागोवा घेत त्यांना अटक करून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी न्यायालयात तपास अधिकारी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करीत होते. मात्र, सद्यस्थितीत कोरोनाचे संक्रमण पाहता आणि लॉकडाऊनमध्ये जेवणावळी आणि हॉटेल्स बंद असल्याचे पाहून आरोपीला जेवण कोण देणार, याच विवंचनेत पोलीस बांधव असून परिणामी, त्यांच्याकडून न्यायालयात आरोपींच्या पोलीस कोठडीऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्याची मागणी करताना दिसत आहेत.लॉकडाऊन असल्याने गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. मागील दोन ते तीन महिन्यांपासून किरकोळ घटना सोडल्या तर सर्वत्र शांततेचे वातावरण आहे. मात्र, काही घटनेत अटक केलेल्या आरोपीला जेवण कोण देणार? असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.कोणत्याही गुन्ह्यांत आरोपींना अटक केल्यावर त्या घटनेचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलीस न्यायालयाकडे आरोपींची पोलीस कोठडी मागतात. न्यायालयाने पोलीस कोठडी मंजूर केल्यावर आरोपी पोलीस कोठडीत असेपर्यंत त्याच्या दोनवेळच्या जेवणाची संपूर्ण व्यवस्था पोलिसांनाच करावी लागते. कोठडीत असलेल्या आरोपींसाठी एखाद्या खानावळ किंवा हॉटेलमधून त्यांच्यासाठी जेवणाचा डबा बोलाविण्यात येत असतो. पण, सध्या लॉकडाऊनच्या काळात हॉटेल्स, खानावळी बंद असल्याने पोलिसांपुढे पेच निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसेच आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने पोलीसदादा अहोरात्र सेवा देत आहेत. या आणीबाणीच्या काळात मात्र, आरोपींची गुन्हेगारी प्रवृत्तीही कमी होऊ लागल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून आता आरोपीच्या पोलीस कोठडीऐवजी त्यांना कारागृहात पाठविण्याची मागणी न्यायालयापुढे करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

कडाऊन असल्याने मागील दोन ते तीन महिन्यांपासून जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यांच्या घटनांत घट झाली आहे. किरकोळ घटनांतील आरोपींना जामीन देण्याचे उच्च न्यायालयाचेच निर्देश आहेत. सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा झालेल्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय झाला आहे. केवळ गंभीर गुन्ह्यातच आरोपींची पोलीस कोठडी मागण्यात येत असून किरकोळ गुन्ह्यांतील आरोपींची जामिनावर सुटका करण्यात येत आहे.- विनय घुडे, शासकीय अभियोक्ता, जिल्हा व सत्र न्यायालय, वर्धा. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस