लॉकडाऊन; २२ लाख प्रशासनाच्या लॉकरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 05:00 IST2020-05-01T05:00:00+5:302020-05-01T05:00:20+5:30

जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तिन्ही उपविभागात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये ३६ पथके तयार करण्यात आली आहे. या सर्व पथकांनी आपापल्या उपविभागीती ३०३ गावांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हात कोरोनाला प्रवेश मिळू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तिन्ही उपविभागातील ३४ गर्दीचे ठिकाणे शोधून काढली आहे.

Lockdown; 22 lakh in administration locker | लॉकडाऊन; २२ लाख प्रशासनाच्या लॉकरमध्ये

लॉकडाऊन; २२ लाख प्रशासनाच्या लॉकरमध्ये

ठळक मुद्देसंचारबंदंी काळात दंडात्मक कारवाई : वर्धा उपविभागाचा सर्वाधिक वाटा

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांना घरातच रहा, विनाकारण रस्त्यावर फिरु नका, मास्क वापरा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, अशा सूचना दिल्यानंतरही काही बेफिकीर नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अशांवर प्रशासनाकडून जिल्ह्याभरात कारवाईचा बडगा उगारुन या लॉकडाऊनच्या काळात आतापर्यंत तब्बल २२ लाख ५० हजार २२९ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
जिल्ह्यातील वर्धा, आर्वी व हिंगणघाट या तिन्ही उपविभागात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये ३६ पथके तयार करण्यात आली आहे. या सर्व पथकांनी आपापल्या उपविभागीती ३०३ गावांना भेटी देऊन कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी होते की नाही, यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्हात कोरोनाला प्रवेश मिळू नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तिन्ही उपविभागातील ३४ गर्दीचे ठिकाणे शोधून काढली आहे. त्या ठिकाणची गर्दी टाळून तेथे सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी व्हावी याकरिता वर्ग १ व २ संवर्गातील अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या शासकीय अधिकाऱ्यांना विविध स्वयंसेवी संस्थांचीही मदत मिळत आहे. नियंत्रण अधिकाऱ्यांसोबत ९० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी दिवसरात्र कार्य करीत आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरु ठेवण्यात आली आहे. तरीही नागरिक विनाकारण घराबाहेर पडताना दिसत आहे. त्यांच्यावर नाईलाजास्तव प्रशासनाला दंडात्मक कारवाई करावी लागत आहे. मास्क न वापरणे, विनाकारण बाहेर फिरणे, सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करणे, याप्रकरणी कारवाई करीत आतापर्यंत २२ लाख ५० हजार २२९ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यात सर्वाधिक दंड १८ लाख ४८ हजार ७०० रुपये हा फक्त वर्धा उपविभागात वसूल केला आहे.्र यासर्व उपाययोजनांमुळेच वर्ध्यात कोरोनाला अद्याप एंट्री मिळाली नाही.

झोपडपट्ट्यांची संख्या वर्ध्यात अधिक
जिल्हयातील वर्धा उपविभागात उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, आर्वी उपविभागात उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक तर हिंगणघाट उपविभागात उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत यांच्या नेतृत्वात कोरोनाशी लढा सुरु आहे. तिन्ही उपविभागामध्ये असलेल्या झोपडपट्ट्यांचीही नोंद घेतली असून तेथेही प्रतिबंधक उपाययोजना राबविल्या जात आहे. जिल्ह्यात ४८ झोपडपट्टया असून सर्वाधित ३० झोपडपट्टया वर्धा उपविभागात आहे. त्यातील १४ झोपडपट्टया एक ट्या वर्धा शहरामध्ये आहे. या परिसरावर प्रशासनाची करडी नजर आहे. आरोग्य विभागाकडून वारंवार तपासणी करण्यासोबतच इतरही खबरदारी घेतली जात आहे.

Web Title: Lockdown; 22 lakh in administration locker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.