शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

शेळीपालनातून उजळल्या जीवनवाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 10:03 PM

सतीश काळे। लोकमत न्यूज नेटवर्क अल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ...

ठळक मुद्देजिद्द, चिकाटीच यशाचे गमक : स्वयंसाहाय्यता बचत गटातून मिळाली उभारी

सतीश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कअल्लीपूर : महिलांचं जीवन हे ‘चूल आणि मूल’ इथपर्यंत मर्यादित होतं. पण, महिलांची शक्ती ओळखून समाजात तिलाही चार भिंतीबाहेर आपले अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील महिलांना खऱ्या अर्थाने बचत गटाच्या माध्यमातून बळ मिळाले. परिणामी, आज गावागावातील महिला सक्षम होऊन स्वत: जोरावर आपला संसार ऐटीत हाकताना दिसून येत आहे. यात अल्लीपूरच्या महिलांचाही समावेश असून त्यांनी स्वयंरोजगारातून माध्यमातून आपल्या समृद्ध जीवनाची वाट धरली आले.येथील विद्या वाघमारे या महिलेचे जीवन बचत गटामुळे संमृद्ध झाले आहे. पती-पत्नी दोघेही दुसऱ्याच्या कामाला जाऊन परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. काही दिवसांपूर्वी विद्या वाघमारे यांनी प्रज्ञा शील स्वयंसहाय्यता बचत गट स्थापन केला. या मध्ये पंधरा महिला सदस्या असून दरमहा प्रत्येकी १०० रुपये गोळा करायला सुरुवात केली. सहा महिन्यापर्यंत हा बचत गट सुरळीत चालल्याने बचत गटाला स्वयंरोजगारासाठी बँकेकडून कर्ज मिळाले. यातून बचत गटाच्या महिलांनी आपापला स्वयंरोजगार सुरु करुन परिवाराला हातभार लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. विद्या वाघमारे यांनी त्याच पैशातून दोन शेळ्या घेतल्या. वर्षभरातच उत्पन्न दुप्पट झाल्याने गटाच्या माध्यमातूनही शेळीपालन व्यवसायाला चालना मिळाली. पैशाची आवकही वाढू लागल्याने त्यांची ही भरभराटी पाहून उमेद अभियान अंतर्गत विद्या वाघमारे यांची पशुसखी म्हणून गावातून निवड करण्यात आली. पशुसखी म्हणून कार्य करीत असताना वेगवेगळे पशुखाद्य, औषधी व खते तयार करून ते पशुपालकांना माफक दरात उपलब्ध करुन देत आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये मिळत असल्याने त्यांच्या कष्टमय जीवनाचे फलीत झाले आहे. त्यांनी बिकट परिस्थितीवर मात करून घेतलेली ही झेप इतर महिलांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.महिलांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष असतो. तेव्हा खचून न जाता परिस्थितीशी झगडण्यासाठी आपण तयार असलो की, आपल्याला आपोआपच मार्ग सापडायला लागतात. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याची मोठी चळचळ उभी राहिली असून त्यातून महिलांनी आपले आयुष्य सुखकर करावे.- विद्या वाघमारे, अल्लीपूर.

टॅग्स :Womenमहिला