शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

लोकशाही बळकटीसाठी नागरिकाने पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:15 AM

जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. विविधतेने नटलेले हे राष्ट्र भारतीय संविधानाच्या अलौकीक वैशिष्ट्यांमुळे व लोकशाही तत्वांमुळे खंबीरपणे उभे आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद व घराणेशाहीसारख्या अमानवी बाबींमुळे लोकशाही तत्वाला खिळ बसत आहे.

ठळक मुद्देसुनील पाटणे : यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताला ओळखले जाते. विविधतेने नटलेले हे राष्ट्र भारतीय संविधानाच्या अलौकीक वैशिष्ट्यांमुळे व लोकशाही तत्वांमुळे खंबीरपणे उभे आहे. परंतु सध्याच्या परिस्थितीत जातीवाद, धर्मवाद, प्रांतवाद व घराणेशाहीसारख्या अमानवी बाबींमुळे लोकशाही तत्वाला खिळ बसत आहे. लोकशाहीचा उंच इमला वाचविण्यासाठी भारतीय नागरिकांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे असे, असे आवाहन लोक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सुनिल पाटणे यांनी काढले.स्थानिक यशवंत महाविद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ‘महाराष्टÑाचे राजकारण’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इतिहास विभाग प्रमुख डॉ. विरेंद्र बैस तर पाहूणे म्हणून राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र बेले, प्रा. एकनाथ मुरकुटे, प्रा. प्रविण घोडखांदे, प्रा. राजेश भटकर, प्रा. वैशाली देशमुख मंचावर उपस्थित होते. यावेळी डॉ. विरेंद्र बैस म्हणाले की, प्रशासकीय सेवा हे सुध्दा लोकशाही बळकट करणारे अत्यंत महत्वाचे क्षेत्र आहे. याक्षेत्राकडे वळून विद्यार्थ्यांनी देश सेवेचे महान कार्य करावे, असे सांगितले. डॉ. रवींद्र बेले यांनी प्रास्ताविकातून राज्यशास्त्र विभागात आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी राज्यशास्त्र अभ्यास मंडळावर अध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले मुकेश भावे, उपाध्यक्ष योगिता मस्के, सचिव मीनाक्षी उडाण, कोषाध्यक्ष प्रविण धोटे, सहसचिव चंदन शेंडे व सदस्यांचे प्रमुख अतिथींच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन रामेश्वरी लिल्लारे हिने तर आभारप्रदर्शन योगिता मस्के हिने केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रितम मून, मंगेश खडसे, सागर डोळे, दीक्षा माटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.