शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मोफत प्रवेशाकडे 308 विद्यार्थ्यांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2022 05:00 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्याक दर्जा वगळता) शाळांमध्ये पहिली व नर्सरीकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यामधील ११४ शाळांतील १ हजार ११५ जागांकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.  जिल्ह्यातून ३ हजार ९१४ अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी राज्यभरात ‘लॉटरी’ काढण्यात आली. यामध्ये १ हजार १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशाकरिता झालेल्या सोडतीमध्ये १ हजार १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. तर तेवढ्याच विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादीही पोर्टलवर जाहीर करण्यात आली होती. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याकरिता १० मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती; परंतु तरीही  ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून ३०८ विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित (अल्पसंख्याक दर्जा वगळता) शाळांमध्ये पहिली व नर्सरीकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाकरिता जिल्ह्यामधील ११४ शाळांतील १ हजार ११५ जागांकरिता प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.  जिल्ह्यातून ३ हजार ९१४ अर्ज प्राप्त झाल्यानंतर ४ एप्रिल रोजी एकाच दिवशी राज्यभरात ‘लॉटरी’ काढण्यात आली. यामध्ये १ हजार १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता प्रवेशाकरिता एसएमएस पाठविण्यात आले. त्यानंतर २० एप्रिलपर्यंत प्रवेशाकरिता मुदत देण्यात आली होती; पण कालावधीत काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे प्रवेशाकरिता १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता प्रवेशाची मुदत संपली असून केवळ ८०० विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला असून ३०८ विद्यार्थ्यांनी याकडे पाठ फिरविली आहे. 

जिल्ह्यामध्ये आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत १ हजार १०८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना मिळालेल्या शाळेमध्ये जाऊन प्रवेश करणे अपेक्षित होते. एकदा मुदतवाढ दिल्यानंतरही निवड झालेल्यांपैकी ३०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे आता त्यांना प्रवेश मिळणार नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार  प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल.                                       लिंबाजी सोनवणे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

 

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थी