शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे.

ठळक मुद्देधरण वर्धा जिल्ह्यात; पाण्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्याला!

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात लालनाला प्रकल्प आहे; मात्र मुसळधार पाऊस आल्यास धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नदीकाठावरील घरांना धोका होतो. शिवाय प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना लाभ मात्र, चंद्रपूरला होतो. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे. तसेच कोरा, उसेगाव, तळोदी, अकोला, गणेशपूर, कृष्णापेठ, पाताळकोट, साखरा, दसोडा, सिल्ली, मंगरूळ, गाठवदेव महारमजरा, गाडामोडी या गावांतील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले.या गावातील शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन धरणाला अल्प मोबदल्यात दिली. धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण असताना अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीपासून वंचित असून मजुरी करून हलाखीचे जीवन जगत आहे. प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना त्याचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न मिळता चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राला दिले जात आहे. आतातर चक्क भूमिगत जलाहिनी टाकून चिमूर भागात पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मध्यंतरीच्या काळात माया ठवरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारे पाणी अडविण्याकरिता आंदोलन केले. आंदोलन दडपण्यात आले. या धरणात पाण्याचा साठा २७६१३ दलघमी असून लांबी ३३१५ मीटर, उंची १४६१ लिटर आहे. सद्यस्थितीत धरण भरले असून थोडाही पाऊस आला तर धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नाल्याच्या दोन्ही काठावरच्या जमिनी खरडून वाहून जात असल्याने शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धरणग्रस्त अनेक बाबीने त्रस्त आहेत.शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का?लालनाला प्रकल्प समुद्रपूर तालुक्यात आहे. त्यामुळे येथील शेतीक्षेत्र सिंचनाखाली यायला हवे. मात्र, प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना दिला जात नसून चंद्रपूर जिल्ह्यात महाऔष्णिक केंद्राला दिले जाते. पाणी चिमूर भागात पळविण्याचेही कटकारस्थान सुरू असताना शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Damधरण