शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
6
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
7
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
8
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
9
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
10
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
11
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
12
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
13
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
14
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
15
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
16
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
17
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
18
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
19
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
20
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
Daily Top 2Weekly Top 5

लालनाला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 06:00 IST

तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे.

ठळक मुद्देधरण वर्धा जिल्ह्यात; पाण्याचा लाभ चंद्रपूर जिल्ह्याला!

सुधीर खडसे ।लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : तालुक्यात लालनाला प्रकल्प आहे; मात्र मुसळधार पाऊस आल्यास धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नदीकाठावरील घरांना धोका होतो. शिवाय प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना लाभ मात्र, चंद्रपूरला होतो. त्यामुळे हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.तालुक्यातील लालनाला धरणाची निर्मिती १९९६ ला झाली. या धरणाचे क्षेत्रफळ बुडीत खासगी क्षेत्र १,१२६०० हेक्टर आहे. वनझुडपी क्षेत्र २९८३ हेक्टर व राजस्व क्षेत्र ३९.११ हेक्टर असे एकूण क्षेत्र १ लाख १९ हजार ५०० हेक्टर एवढे आहे. तीन गावे बुडीत या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात गेली. त्यामध्ये उसेगाव, तळोदी, गणेशपूर या गावाचा समावेश आहे. तसेच कोरा, उसेगाव, तळोदी, अकोला, गणेशपूर, कृष्णापेठ, पाताळकोट, साखरा, दसोडा, सिल्ली, मंगरूळ, गाठवदेव महारमजरा, गाडामोडी या गावांतील जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले.या गावातील शेतकऱ्यांनी आपली सुपीक जमीन धरणाला अल्प मोबदल्यात दिली. धरणग्रस्तांच्या मुलांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण असताना अनेक सुशिक्षित बेरोजगार नोकरीपासून वंचित असून मजुरी करून हलाखीचे जीवन जगत आहे. प्रकल्प वर्धा जिल्ह्यात असताना त्याचे पाणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न मिळता चंद्रपूर येथील महाऔष्णिक विद्युत केंद्राला दिले जात आहे. आतातर चक्क भूमिगत जलाहिनी टाकून चिमूर भागात पाणी पळविण्याचा प्रकार सुरू आहे. स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाणी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. मध्यंतरीच्या काळात माया ठवरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जाणारे पाणी अडविण्याकरिता आंदोलन केले. आंदोलन दडपण्यात आले. या धरणात पाण्याचा साठा २७६१३ दलघमी असून लांबी ३३१५ मीटर, उंची १४६१ लिटर आहे. सद्यस्थितीत धरण भरले असून थोडाही पाऊस आला तर धरणाचे पाणी सोडल्या जाते. यात नाल्याच्या दोन्ही काठावरच्या जमिनी खरडून वाहून जात असल्याने शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. धरणग्रस्त अनेक बाबीने त्रस्त आहेत.शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का?लालनाला प्रकल्प समुद्रपूर तालुक्यात आहे. त्यामुळे येथील शेतीक्षेत्र सिंचनाखाली यायला हवे. मात्र, प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ स्थानिक शेतकऱ्यांना दिला जात नसून चंद्रपूर जिल्ह्यात महाऔष्णिक केंद्राला दिले जाते. पाणी चिमूर भागात पळविण्याचेही कटकारस्थान सुरू असताना शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न केला जात आहे.

टॅग्स :Damधरण