शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नियोजनाचा अभाव; पावसाने शेत नेले खरडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:29 IST

समुद्धी महामार्ग हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेला असून शेताचे दोन भाग पडले आहे. हा महामार्गा रुंद व उंच असल्याने रस्त्यासाठी संपादित न केलेल्या जमिनीवर शेती करणे आता कठीण झाले आहे. या महामार्गालगतच्या अनेक शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद करुन टाकला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता असलेले नालेही या बांधकामा भुईसपाट करण्यात आले.

ठळक मुद्देपेरलेले बियाणे मातीमोल : समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यात समुद्धी महामार्गाचे काम सुरु असून कंत्राटदाराने खोल नाल्या, मातीचे ढिगारे कायम ठेवले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहे. परिणामी इटाळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पेरलेले बियाणे खरडून नेले. लाख मोलाचे बियाणे मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहेत.समुद्धी महामार्ग हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेला असून शेताचे दोन भाग पडले आहे. हा महामार्गा रुंद व उंच असल्याने रस्त्यासाठी संपादित न केलेल्या जमिनीवर शेती करणे आता कठीण झाले आहे. या महामार्गालगतच्या अनेक शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद करुन टाकला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता असलेले नालेही या बांधकामा भुईसपाट करण्यात आले. अशातच पहिल्याच पावसात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उंच महामार्ग आणि पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नाले बंद केल्याने लगतच्या शेतात पाणी साचून तलावाचे स्वरुप आले आहेत. काही शेतातील नुकताच पेरलेले सोयाबीन, तूर व कपाशीचे बियाणेही वाहून गेले आहे. यामध्ये इटाळा येथील शेतकरी प्रमोद ढुमणे, विजय लंगडे, संजय लंगडे, नितीन हटवार, संजय तडस, दिनेश चांभारे, मंगेश चांभारे, अशोक वरटकर, हेमकांत वरटकर, रामू उमाटे, गंगाधर मुडे, सचिन ढुमणे, हितेश चांभारे, विलास लंगडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना सूचना दिल्यानंतर तलाठ्यांनी पाहणी करुन अहवाल तहसीलदारांकडे पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी