शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नियोजनाचा अभाव; पावसाने शेत नेले खरडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:29 IST

समुद्धी महामार्ग हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेला असून शेताचे दोन भाग पडले आहे. हा महामार्गा रुंद व उंच असल्याने रस्त्यासाठी संपादित न केलेल्या जमिनीवर शेती करणे आता कठीण झाले आहे. या महामार्गालगतच्या अनेक शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद करुन टाकला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता असलेले नालेही या बांधकामा भुईसपाट करण्यात आले.

ठळक मुद्देपेरलेले बियाणे मातीमोल : समृद्धी महामार्गाच्या बांधकामाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : तालुक्यात समुद्धी महामार्गाचे काम सुरु असून कंत्राटदाराने खोल नाल्या, मातीचे ढिगारे कायम ठेवले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहे. परिणामी इटाळा परिसरात झालेल्या जोरदार पावसाचे पाणी शेतात शिरल्याने पेरलेले बियाणे खरडून नेले. लाख मोलाचे बियाणे मातीमोल झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहेत.समुद्धी महामार्ग हा अनेक शेतकऱ्यांच्या शेतातून गेला असून शेताचे दोन भाग पडले आहे. हा महामार्गा रुंद व उंच असल्याने रस्त्यासाठी संपादित न केलेल्या जमिनीवर शेती करणे आता कठीण झाले आहे. या महामार्गालगतच्या अनेक शेतातील पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद करुन टाकला आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता असलेले नालेही या बांधकामा भुईसपाट करण्यात आले. अशातच पहिल्याच पावसात शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. उंच महामार्ग आणि पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नाले बंद केल्याने लगतच्या शेतात पाणी साचून तलावाचे स्वरुप आले आहेत. काही शेतातील नुकताच पेरलेले सोयाबीन, तूर व कपाशीचे बियाणेही वाहून गेले आहे. यामध्ये इटाळा येथील शेतकरी प्रमोद ढुमणे, विजय लंगडे, संजय लंगडे, नितीन हटवार, संजय तडस, दिनेश चांभारे, मंगेश चांभारे, अशोक वरटकर, हेमकांत वरटकर, रामू उमाटे, गंगाधर मुडे, सचिन ढुमणे, हितेश चांभारे, विलास लंगडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रार करुन नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तहसीलदारांनी तलाठ्यांना सूचना दिल्यानंतर तलाठ्यांनी पाहणी करुन अहवाल तहसीलदारांकडे पाठविल्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी