शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

गुळगुळीत महामार्गावर सुविधांचा अभाव, ६० चक्का ट्रकचा पंधरवड्यापासून मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:45 IST

हुसनापूर टोल नाक्यावरील प्रकार : दुचाकीस्वारांचे अपघात, व्यवस्थापकाचे दुर्लक्ष, वाहनचालकांकडून व्यक्त होत आहेत संताप

लोकमत न्यूज नेटवर्क भिडी : प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ते गुळगुळीत करण्यात आले. दिलेल्या सुविधेचा खर्च वसूल करण्यासाठी टोल नाके बांधण्यात आले. मात्र, या मार्गावरून अवजड वाहने जाण्याची सुविधाच नसल्याने गत पंधरवड्यापासून ६० चक्का ट्रकने टोल नाक्यावर मुक्काम ठोकला आहे. व्यवस्थापकाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याने पंधरवड्यात काही दुचाकीचे अपघात झाले असून या प्रकाराचा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

जिल्ह्यात ग्रामीण मार्गासह, राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विणण्यात आले. यात हजारो कोटी रुपये खर्ची करून समृद्धी मार्गाचाही समावेश आहे. मात्र, या मार्गावरून इतिवहजड वाहनांना जाण्याची व्यवस्था नसल्याने वाहन चालकांची मोठी दमछाक होत आहे. मथुरा येथून एनएलओ / एएच ०१०० क्रमांकाचा ६० चाकांचे अवडजड मालवाहू गिट्टी मिक्सर मशीन घेऊन नांदेड येथे निघाला. दरम्यान अनेक अडचणींवर मात करून हुसनापूर टोल नाक्यावर हे वाहन आले. मात्र, पुढे जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने या वाहनाला टोल नाक्यावरच मुक्काम करावा लागला आहे. गत १७ दिवसांपासून है वाहन एकाच ठिकाणी असल्याने दुचाकी, तीनचाकी वाहनांना वाहतुकीस अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मात्र, यात अजूनही टोल नाका व्यवस्थापकांनी यावर मार्ग काढला नसल्याने आणखी किती दिवस या ठिकाणी मुक्काम करावा, असा प्रश्न वाहन चालक, वाहकांपुढे पडला आहे. तातडीने यावर मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.

वाहनांनुळे अपघात दुचाकी, तीनचाकी वाहनधारकांनी सुरुवातीलाच टोल वसूल करण्यात आल्याने या टोल नाक्यावरून त्यांना टोल शुल्क द्यावे लागत नाही. निःशुल्क वाहनांच्या रांगेशेजारी है अवजड वाहन उभे करण्यात आल्याने मार्ग काढताना अडचण होत आहे. यात काही दुचाकींना अपघात झाले. यात किरकोळ जखमा आल्याने थोडक्यात बचावले. मात्र, मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर है वाहन हटवावे अशी मागणी करण्यात आली. टोल व्यवस्थापकांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

आधुनिक विकासाची हीच शोकांतिकाअद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, हजारो कोट्यांवधी रुपये खर्ची घालून आधुनिक विकास साधला जातो आहे. एवढेच काय तर आपत्कालीन स्थितीत देशात विणलेल्या महामार्गावर फायटर जहाज, विमान उतविल्याचे प्रयोग करण्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे अतिवजड वाहनांना या मार्गावरून नेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. आधुनिक विकासाची ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकroad safetyरस्ते सुरक्षाwardha-acवर्धा