शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

मजुरीच्या शोधात आलेय परजिल्ह्यातील मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:57 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.

ठळक मुद्देस्थलांतरण : गावातील कामांना मिळाली गती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. या पिकांची सध्या सोगणी व मळणी सुरु आहे. याच कालावधीत कापूस वेचणीलाही सुरुवात होत असल्याने गावागावांमध्ये मजुरांची समस्या भेडसावतात. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात गडचिरोली, वाशिम, पुसद या भागातील मजुरांचे जत्थे गावागावांमध्ये दाखल होत आहे.यात महिला, पुरुष व तरुणांचाही समावेश आहे. दरवर्षी या भागातील मजुर जिल्ह्यात दाखल होऊन सोयाबीन सोगणी, मळणी व कापूस वेचण्याचेही काम करतात. या दिवसांमध्ये हे मजूर गावात मिसळून जात असल्याने गावकऱ्यांसोबत त्यांची चांगलीच ओखळ झाली आहे. त्यामुळे तेच मजुर दरवर्षी गावात येऊन गावातील शेतकऱ्यांच्या कामात हातभार लावतात. तसेच या दरम्यान येणाऱ्या नवरात्री व दिवाळीच्या सणात सहभागी होऊन सहकार्यही करतात. त्यामुळे राहिलं तितके दिवस ते या गावाचा एक भागच होऊन जाते.या मजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासाया दिवसामध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सोगणी व कापसाची वेचणी येत असल्याने मजूरांची कमतरता भासते.परिणामी गावातील मजूरांचेही भाव चांगलेच वाढते. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील मजुरांचे आगमण झाले की, शेतकऱ्यांचाही भार हलका होतो. त्यांना वेळेत आणि योग्य दरात मजूर उपलब्ध होत असल्याने, या पर जिल्ह्यातील मजूरांमुळे दिलासा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.शेतकरीच करतात राहाण्याची व्यवस्थासोयाबीनच्या सोगणीचे दिवस आले की, गडचिरोली, बालाघाट, वाशिम व पुसद परिसरातील मजूर जिल्ह्यातील विविध खेड्यामध्ये दाखल होतात. सोयाबीनची सोगणीचे काम एकराप्रमाणे घेऊन सर्व मजूर मिळून अल्पावधीच तडीस नेतात. दिवाळीपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. गावातील शेतकरीच त्यांची राहण्याची व्यवस्था करतात. गावातील जो शेतकरी त्यांना काम देईल त्या शेतकऱ्याचे ते काम पूर्ण करुन दिवाळी करिता आपापल्या गावाला जातात. दिवाळीनंतरही काही मजूर पुन्हा परत येऊन घेतलेले काम पूर्ण करतात.आमच्याकडे धानाचीच शेती असल्याने आमच्याकडे सध्या पाहिजे तसा रोजगार मिळत नाही. घरातीत सदस्यांची संख्याही जास्त असल्याने दररोज कामाला गेल्याशिवाय दोन पैसे हातात पडत नाही. या दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीमुळे चांगला रोजगार मिळत असल्याने आम्ही परिवारासह इकडे येऊन काम करतो.- रामेश्वर कोरचे, शेतमजूर गडचिरोली