शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

मजुरीच्या शोधात आलेय परजिल्ह्यातील मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:57 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.

ठळक मुद्देस्थलांतरण : गावातील कामांना मिळाली गती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. या पिकांची सध्या सोगणी व मळणी सुरु आहे. याच कालावधीत कापूस वेचणीलाही सुरुवात होत असल्याने गावागावांमध्ये मजुरांची समस्या भेडसावतात. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात गडचिरोली, वाशिम, पुसद या भागातील मजुरांचे जत्थे गावागावांमध्ये दाखल होत आहे.यात महिला, पुरुष व तरुणांचाही समावेश आहे. दरवर्षी या भागातील मजुर जिल्ह्यात दाखल होऊन सोयाबीन सोगणी, मळणी व कापूस वेचण्याचेही काम करतात. या दिवसांमध्ये हे मजूर गावात मिसळून जात असल्याने गावकऱ्यांसोबत त्यांची चांगलीच ओखळ झाली आहे. त्यामुळे तेच मजुर दरवर्षी गावात येऊन गावातील शेतकऱ्यांच्या कामात हातभार लावतात. तसेच या दरम्यान येणाऱ्या नवरात्री व दिवाळीच्या सणात सहभागी होऊन सहकार्यही करतात. त्यामुळे राहिलं तितके दिवस ते या गावाचा एक भागच होऊन जाते.या मजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासाया दिवसामध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सोगणी व कापसाची वेचणी येत असल्याने मजूरांची कमतरता भासते.परिणामी गावातील मजूरांचेही भाव चांगलेच वाढते. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील मजुरांचे आगमण झाले की, शेतकऱ्यांचाही भार हलका होतो. त्यांना वेळेत आणि योग्य दरात मजूर उपलब्ध होत असल्याने, या पर जिल्ह्यातील मजूरांमुळे दिलासा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.शेतकरीच करतात राहाण्याची व्यवस्थासोयाबीनच्या सोगणीचे दिवस आले की, गडचिरोली, बालाघाट, वाशिम व पुसद परिसरातील मजूर जिल्ह्यातील विविध खेड्यामध्ये दाखल होतात. सोयाबीनची सोगणीचे काम एकराप्रमाणे घेऊन सर्व मजूर मिळून अल्पावधीच तडीस नेतात. दिवाळीपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. गावातील शेतकरीच त्यांची राहण्याची व्यवस्था करतात. गावातील जो शेतकरी त्यांना काम देईल त्या शेतकऱ्याचे ते काम पूर्ण करुन दिवाळी करिता आपापल्या गावाला जातात. दिवाळीनंतरही काही मजूर पुन्हा परत येऊन घेतलेले काम पूर्ण करतात.आमच्याकडे धानाचीच शेती असल्याने आमच्याकडे सध्या पाहिजे तसा रोजगार मिळत नाही. घरातीत सदस्यांची संख्याही जास्त असल्याने दररोज कामाला गेल्याशिवाय दोन पैसे हातात पडत नाही. या दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीमुळे चांगला रोजगार मिळत असल्याने आम्ही परिवारासह इकडे येऊन काम करतो.- रामेश्वर कोरचे, शेतमजूर गडचिरोली