शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
3
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
4
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
5
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
6
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
7
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
8
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
9
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
10
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
11
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
12
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
13
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
14
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
15
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
16
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
17
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
18
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
19
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
20
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं

मजुरीच्या शोधात आलेय परजिल्ह्यातील मजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 23:57 IST

पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.

ठळक मुद्देस्थलांतरण : गावातील कामांना मिळाली गती

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम: पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम हवे असते.परंतु हे कामच मिळत नसल्याने उपसमारीची वेळ आली आहे. परिणामी कामाच्या शोधात पर जिल्ह्यातील मजूरांनी वर्धा जिल्ह्याची वाट धरली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध गावांमध्ये पर जिल्ह्यातील मजुरांचे जत्थे दाखल झाले आहे.वर्धा जिल्ह्यात सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते. या पिकांची सध्या सोगणी व मळणी सुरु आहे. याच कालावधीत कापूस वेचणीलाही सुरुवात होत असल्याने गावागावांमध्ये मजुरांची समस्या भेडसावतात. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात गडचिरोली, वाशिम, पुसद या भागातील मजुरांचे जत्थे गावागावांमध्ये दाखल होत आहे.यात महिला, पुरुष व तरुणांचाही समावेश आहे. दरवर्षी या भागातील मजुर जिल्ह्यात दाखल होऊन सोयाबीन सोगणी, मळणी व कापूस वेचण्याचेही काम करतात. या दिवसांमध्ये हे मजूर गावात मिसळून जात असल्याने गावकऱ्यांसोबत त्यांची चांगलीच ओखळ झाली आहे. त्यामुळे तेच मजुर दरवर्षी गावात येऊन गावातील शेतकऱ्यांच्या कामात हातभार लावतात. तसेच या दरम्यान येणाऱ्या नवरात्री व दिवाळीच्या सणात सहभागी होऊन सहकार्यही करतात. त्यामुळे राहिलं तितके दिवस ते या गावाचा एक भागच होऊन जाते.या मजुरांमुळे शेतकऱ्यांना दिलासाया दिवसामध्ये सर्वच शेतकऱ्यांच्या सोयाबीनची सोगणी व कापसाची वेचणी येत असल्याने मजूरांची कमतरता भासते.परिणामी गावातील मजूरांचेही भाव चांगलेच वाढते. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातील मजुरांचे आगमण झाले की, शेतकऱ्यांचाही भार हलका होतो. त्यांना वेळेत आणि योग्य दरात मजूर उपलब्ध होत असल्याने, या पर जिल्ह्यातील मजूरांमुळे दिलासा मिळत असल्याचे शेतकरी सांगतात.शेतकरीच करतात राहाण्याची व्यवस्थासोयाबीनच्या सोगणीचे दिवस आले की, गडचिरोली, बालाघाट, वाशिम व पुसद परिसरातील मजूर जिल्ह्यातील विविध खेड्यामध्ये दाखल होतात. सोयाबीनची सोगणीचे काम एकराप्रमाणे घेऊन सर्व मजूर मिळून अल्पावधीच तडीस नेतात. दिवाळीपर्यंत त्यांचे वास्तव्य असते. गावातील शेतकरीच त्यांची राहण्याची व्यवस्था करतात. गावातील जो शेतकरी त्यांना काम देईल त्या शेतकऱ्याचे ते काम पूर्ण करुन दिवाळी करिता आपापल्या गावाला जातात. दिवाळीनंतरही काही मजूर पुन्हा परत येऊन घेतलेले काम पूर्ण करतात.आमच्याकडे धानाचीच शेती असल्याने आमच्याकडे सध्या पाहिजे तसा रोजगार मिळत नाही. घरातीत सदस्यांची संख्याही जास्त असल्याने दररोज कामाला गेल्याशिवाय दोन पैसे हातात पडत नाही. या दिवसांमध्ये वर्धा जिल्ह्यात सोयाबीन व कपाशीमुळे चांगला रोजगार मिळत असल्याने आम्ही परिवारासह इकडे येऊन काम करतो.- रामेश्वर कोरचे, शेतमजूर गडचिरोली