शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

श्रमदानातून हिवरा गावात जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:23 IST

कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.वॉटर कप स्पर्धेत केवळ ४१६ लोकसंख्या असलेल्या हिवरा गावाने सहभाग घेतला तो, जलदूत डॉ. उल्हास जाजू यांच्या सहकार्यामुळेच. पाणी असेल तर शेती टिकणार आणि पावसाच्या पाण्याने शेतातील माती वाहून जाईल तर सुपिक जमिनी नष्ट होईल, याकरिता पाणी व शेतमाती हे दोन्ही टिकवून ठेवणे गरजेचे होते. अशावेळी हिवरा येथील परस्परविरोधी तीन गटांना एकत्रित आणून त्यांच्यापुढे जलक्रांतीची संकल्पना मांडणे डॉ. जाजू यांच्याकरिता आव्हानच होते. पण, त्यांनी शेती व पाण्याचे महत्त्व पटवून देत संपूर्ण गाव श्रमदानाकरिता एकत्रित करून जलयोद्धा पथक तयार केले आणि तेथूनच खºया जलक्रांतीला सुरूवात झाली.हिवरा गावापासून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या खोदकामाला सुरूवात झाली, हे काम अधिक गतीने व्हावे, म्हणून अख्खे गावच टोपले, टिकास, फावडे घेऊन कामाला लागले. एकीकडे ४६ अंशांच्या तापमानात ग्रामस्थांच्या शरीरातून घामाचे थेंब टपकत होते, तर दुसरीकडे मशिनीद्वारे खोदकाम सुरू होते. आठवडाभर केलेल्या परिश्रमानंतर नाल्यालाच पाझर फुटला, आज या नाल्यात सुमारे सहा ते सात फूट पाणी आहे.हे श्रमदान येथेच थांबले नाही, तर पावसाच्या पाण्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाते अशा शेतकºयांच्या शेतात संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रमदान करून शेतात समतल बांध तयार केले. सुमारे २० शेतकºयांच्या ५० एकर शेतात बांध तयार केल्याने आता पावसाचे पाणी हे शेतातच मुरणार असून, शेतातील मातीही वाहून जाण्यास अटकाव होणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीने धनी असलेल्या हिवरा ग्रामस्थांनी श्रमदानातून गावालगतच्या शेतात, शासकीय जमिनीवर विविध आकाराचे तब्बल सात तलावांची निर्मिती केल्याने पाऊसपाण्याच्या संवर्धनासोबत मातीचेही संवर्धन होणार आहे.जल है तो कल है, हे सर्वांना ज्ञात तर होते; पण आपण अशी काही क्रांती करू शकतो, यापासून ग्रामस्थ दूर होते. आज गावात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारणही ग्रामस्थच आहे. आठ वर्षांपासून तर ६० वर्षांपर्यंतच्या ग्रामस्थांनी श्रमदानात घाम ओतला. डॉ. जाजू यांच्या मार्गदर्शनामुळेच हिवरा हे गाव सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सहभागी आहे. पुरस्काराच्या रकमेच्या अपेक्षेपेक्षा गावाने आज एकत्रित होत जलक्रांती घडवून आणली. त्यामुळे आगामी शेकडो वर्ष गावापासून पाणीप्रश्न दूर राहणार आहे.अक्षय बाळसराफ, जलयोद्धा टीम, हिवरा.स्वास्थ्य सेवा हे माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचायला. स्वास्थ्याचे प्रश्न सुटले तर गावाचे प्रश्न सुटतात, असे नाही. त्यांचे मूलभूत प्रश्न पोटाशी, शेतीशी संबंधित आहे. गावकरी जर उभा राहायचा असेल तर शेतीच्या जोरावरच उभा राहू शकतो आणि शेतीला आवश्यक आहे पाणी. शासनासोबतच समाजसेवी संस्थांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीला हिवरा ग्रामस्थांकडून मिळालेली श्रमदानाची साथ, यामुळेच जलक्रांती होऊ शकली.डॉ. उल्हास जाजू, जलदूत

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा