शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

श्रमदानातून हिवरा गावात जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:23 IST

कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.वॉटर कप स्पर्धेत केवळ ४१६ लोकसंख्या असलेल्या हिवरा गावाने सहभाग घेतला तो, जलदूत डॉ. उल्हास जाजू यांच्या सहकार्यामुळेच. पाणी असेल तर शेती टिकणार आणि पावसाच्या पाण्याने शेतातील माती वाहून जाईल तर सुपिक जमिनी नष्ट होईल, याकरिता पाणी व शेतमाती हे दोन्ही टिकवून ठेवणे गरजेचे होते. अशावेळी हिवरा येथील परस्परविरोधी तीन गटांना एकत्रित आणून त्यांच्यापुढे जलक्रांतीची संकल्पना मांडणे डॉ. जाजू यांच्याकरिता आव्हानच होते. पण, त्यांनी शेती व पाण्याचे महत्त्व पटवून देत संपूर्ण गाव श्रमदानाकरिता एकत्रित करून जलयोद्धा पथक तयार केले आणि तेथूनच खºया जलक्रांतीला सुरूवात झाली.हिवरा गावापासून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या खोदकामाला सुरूवात झाली, हे काम अधिक गतीने व्हावे, म्हणून अख्खे गावच टोपले, टिकास, फावडे घेऊन कामाला लागले. एकीकडे ४६ अंशांच्या तापमानात ग्रामस्थांच्या शरीरातून घामाचे थेंब टपकत होते, तर दुसरीकडे मशिनीद्वारे खोदकाम सुरू होते. आठवडाभर केलेल्या परिश्रमानंतर नाल्यालाच पाझर फुटला, आज या नाल्यात सुमारे सहा ते सात फूट पाणी आहे.हे श्रमदान येथेच थांबले नाही, तर पावसाच्या पाण्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाते अशा शेतकºयांच्या शेतात संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रमदान करून शेतात समतल बांध तयार केले. सुमारे २० शेतकºयांच्या ५० एकर शेतात बांध तयार केल्याने आता पावसाचे पाणी हे शेतातच मुरणार असून, शेतातील मातीही वाहून जाण्यास अटकाव होणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीने धनी असलेल्या हिवरा ग्रामस्थांनी श्रमदानातून गावालगतच्या शेतात, शासकीय जमिनीवर विविध आकाराचे तब्बल सात तलावांची निर्मिती केल्याने पाऊसपाण्याच्या संवर्धनासोबत मातीचेही संवर्धन होणार आहे.जल है तो कल है, हे सर्वांना ज्ञात तर होते; पण आपण अशी काही क्रांती करू शकतो, यापासून ग्रामस्थ दूर होते. आज गावात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारणही ग्रामस्थच आहे. आठ वर्षांपासून तर ६० वर्षांपर्यंतच्या ग्रामस्थांनी श्रमदानात घाम ओतला. डॉ. जाजू यांच्या मार्गदर्शनामुळेच हिवरा हे गाव सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सहभागी आहे. पुरस्काराच्या रकमेच्या अपेक्षेपेक्षा गावाने आज एकत्रित होत जलक्रांती घडवून आणली. त्यामुळे आगामी शेकडो वर्ष गावापासून पाणीप्रश्न दूर राहणार आहे.अक्षय बाळसराफ, जलयोद्धा टीम, हिवरा.स्वास्थ्य सेवा हे माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचायला. स्वास्थ्याचे प्रश्न सुटले तर गावाचे प्रश्न सुटतात, असे नाही. त्यांचे मूलभूत प्रश्न पोटाशी, शेतीशी संबंधित आहे. गावकरी जर उभा राहायचा असेल तर शेतीच्या जोरावरच उभा राहू शकतो आणि शेतीला आवश्यक आहे पाणी. शासनासोबतच समाजसेवी संस्थांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीला हिवरा ग्रामस्थांकडून मिळालेली श्रमदानाची साथ, यामुळेच जलक्रांती होऊ शकली.डॉ. उल्हास जाजू, जलदूत

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा