शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून हिवरा गावात जलक्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 00:23 IST

कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कधीही नव्हता एवढा दुष्काळ यावर्षी पडणार होता. पाण्याअभावी शेतकऱ्यांना उसाचे पीक जाळावे लागणार होते. अशा बिकट संकटात अडकलेल्या हिवरा (दिंदोडा) ग्रामस्थांनी जमिनीत घामाचे थेंब टपकवून जमिनीतून पाझररूपी पाणी काढण्याची किमया केली आहे.वॉटर कप स्पर्धेत केवळ ४१६ लोकसंख्या असलेल्या हिवरा गावाने सहभाग घेतला तो, जलदूत डॉ. उल्हास जाजू यांच्या सहकार्यामुळेच. पाणी असेल तर शेती टिकणार आणि पावसाच्या पाण्याने शेतातील माती वाहून जाईल तर सुपिक जमिनी नष्ट होईल, याकरिता पाणी व शेतमाती हे दोन्ही टिकवून ठेवणे गरजेचे होते. अशावेळी हिवरा येथील परस्परविरोधी तीन गटांना एकत्रित आणून त्यांच्यापुढे जलक्रांतीची संकल्पना मांडणे डॉ. जाजू यांच्याकरिता आव्हानच होते. पण, त्यांनी शेती व पाण्याचे महत्त्व पटवून देत संपूर्ण गाव श्रमदानाकरिता एकत्रित करून जलयोद्धा पथक तयार केले आणि तेथूनच खºया जलक्रांतीला सुरूवात झाली.हिवरा गावापासून केवळ ५०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्याच्या खोदकामाला सुरूवात झाली, हे काम अधिक गतीने व्हावे, म्हणून अख्खे गावच टोपले, टिकास, फावडे घेऊन कामाला लागले. एकीकडे ४६ अंशांच्या तापमानात ग्रामस्थांच्या शरीरातून घामाचे थेंब टपकत होते, तर दुसरीकडे मशिनीद्वारे खोदकाम सुरू होते. आठवडाभर केलेल्या परिश्रमानंतर नाल्यालाच पाझर फुटला, आज या नाल्यात सुमारे सहा ते सात फूट पाणी आहे.हे श्रमदान येथेच थांबले नाही, तर पावसाच्या पाण्याने ज्या शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून जाते अशा शेतकºयांच्या शेतात संपूर्ण गावातील नागरिकांनी श्रमदान करून शेतात समतल बांध तयार केले. सुमारे २० शेतकºयांच्या ५० एकर शेतात बांध तयार केल्याने आता पावसाचे पाणी हे शेतातच मुरणार असून, शेतातील मातीही वाहून जाण्यास अटकाव होणार आहे. प्रबळ इच्छाशक्तीने धनी असलेल्या हिवरा ग्रामस्थांनी श्रमदानातून गावालगतच्या शेतात, शासकीय जमिनीवर विविध आकाराचे तब्बल सात तलावांची निर्मिती केल्याने पाऊसपाण्याच्या संवर्धनासोबत मातीचेही संवर्धन होणार आहे.जल है तो कल है, हे सर्वांना ज्ञात तर होते; पण आपण अशी काही क्रांती करू शकतो, यापासून ग्रामस्थ दूर होते. आज गावात आनंदाचे वातावरण आहे. याचे कारणही ग्रामस्थच आहे. आठ वर्षांपासून तर ६० वर्षांपर्यंतच्या ग्रामस्थांनी श्रमदानात घाम ओतला. डॉ. जाजू यांच्या मार्गदर्शनामुळेच हिवरा हे गाव सत्यमेव जयते वॉटर कपमध्ये सहभागी आहे. पुरस्काराच्या रकमेच्या अपेक्षेपेक्षा गावाने आज एकत्रित होत जलक्रांती घडवून आणली. त्यामुळे आगामी शेकडो वर्ष गावापासून पाणीप्रश्न दूर राहणार आहे.अक्षय बाळसराफ, जलयोद्धा टीम, हिवरा.स्वास्थ्य सेवा हे माध्यम आहे लोकांपर्यंत पोहोचायला. स्वास्थ्याचे प्रश्न सुटले तर गावाचे प्रश्न सुटतात, असे नाही. त्यांचे मूलभूत प्रश्न पोटाशी, शेतीशी संबंधित आहे. गावकरी जर उभा राहायचा असेल तर शेतीच्या जोरावरच उभा राहू शकतो आणि शेतीला आवश्यक आहे पाणी. शासनासोबतच समाजसेवी संस्थांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीला हिवरा ग्रामस्थांकडून मिळालेली श्रमदानाची साथ, यामुळेच जलक्रांती होऊ शकली.डॉ. उल्हास जाजू, जलदूत

टॅग्स :Water Cup Competitionवॉटर कप स्पर्धा