अतिक्रमणधारकांवर कारवाईची कुऱ्हाड

By Admin | Updated: January 10, 2015 01:54 IST2015-01-10T01:54:40+5:302015-01-10T01:54:40+5:30

गावातील मार्गांवर अतिक्रमण करून जागा बळकाविणाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने आठ जणांना नोटीस बजावली असल्याने धाबे दणानले आहे.

Kurchad to take action on encroachers | अतिक्रमणधारकांवर कारवाईची कुऱ्हाड

अतिक्रमणधारकांवर कारवाईची कुऱ्हाड

विजयगोपाल : गावातील मार्गांवर अतिक्रमण करून जागा बळकाविणाऱ्यांना ग्रामपंचायत प्रशासनाने आठ जणांना नोटीस बजावली असल्याने धाबे दणानले आहे. येथील वॉर्ड क्रमांक दोन भागत अतिक्रमणधारकांची संख्या अधिक आहे. वर्दळीच्या मार्गावर अतिक्रमण केल्याने आवागमनास त्रास होत असे. याबाबत नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली.
येथील विठ्ठलनगर परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून येणारा-जाणारा रस्ताच बंद केला आहे. ग्रामस्थांना यामुळे गैरसोय होत असे. या समस्येबाबत नागरिकांनी तहसीलदार व ग्रामपंचायत प्रशासनाला वारंवार निवेदन दिले. या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने हा निर्णय घेतला. आवागमनास बंद असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या कारवाईमुळे नागरिकांना पुर्ववत आवागमन कराता येणार आहे. विठ्ठल वार्डातील रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता बंद केला. अतिक्रमणधारकांवर प्रशासनाचा वचक नसल्याने अनेकांनी रस्त्यावर पक्के घर बांधली आहे. हीच री ओढत गावात अन्यत्र अतिक्रमण होत होते. यामुळे भविष्यात गावात रस्ते उरणार की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम (५३) अन्वये गावातील आठ अतिक्रमणधारकांना रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याच्या नोटीस बजाविण्यात आल्या. याची अंमलबजावणी न केल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.(वार्ताहर)

Web Title: Kurchad to take action on encroachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.