शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अंकूर वाचविण्यासाठी केविलवाणी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 11:42 PM

रोहिनी नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सतत दोन-तीन दिवस पाऊस आणि मृग नक्षत्रास प्रारंभ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली; पण आता तीच घाई पिकांवर बेतण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देआठ दिवसांपासून पावसाची दडी : २२ जूनपर्यंत पाऊस येणार नसल्याचे भाकित, शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रोहिनी नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. सतत दोन-तीन दिवस पाऊस आणि मृग नक्षत्रास प्रारंभ यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची लगबग केली; पण आता तीच घाई पिकांवर बेतण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जमिनीवर डोकावणारे अंकूर कोमेजण्याच्या स्थितीत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना अंकूर वाचविण्याकरिता केविलवाणी धडपड करावी लागत आहे. कुठे फवाºयाने तर कुठे गुंडांनी रोपटे, बियाण्यांना पाणी दिले जात आहे.जिल्ह्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्रात शेतकºयांनी पहिल्या पावसात पेरण्या आटोपत्या घेतल्या. पावसाचे सातत्य कायम राहील, अशी आशा करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या; पण आठ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. जमिनीत असलेल्या ओलाव्यामुळे पेरलेले बियाणे उगवले. अंकूर जमिनीवर आले; पण ४० अंशांवर पोहोचलेल्या पाऱ्यामुळे हे अंकूर तग धरू शकणार नसल्याची बाब शेतकऱ्यांच्या लक्षात आली आहे. यामुळे सिंचनाची सोय असलेले शेतकरी स्प्रिंकलरच्या साह्याने बियाणे, रोपट्यांना पाणी देत आहेत; पण कोरडवाहु शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती केविलवाणी दिसून येत आहे. समुद्रपूर तालुक्यात काही शेतकरी मजुरांमार्फत तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांसह गुंडांनी बियाणे, रोपट्यांना पाणी देताना दिसून येत आहे. सेलू तालुक्यातही अशीच विदारक स्थिती असून फवारणी यंत्राद्वारे पाणी देत शेतकरी रोपट्यांना वाचविण्याची धडपड करताना दिसून येत आहे.दोन-तीन दिवसांच्या पावसानंतर सर्वत्र कडक उन्ह तापत असल्याने बियाणे जमिनीतच नष्ट होण्याची तथा अंकूर कोमेजण्याची स्थिती आहे. परिणामी, शेतकरी चिंतातूर आहेत. २२ जूनपर्यंत पाऊस येणार नाही, असे भाकित असल्याने जिल्ह्यावर दुबार पेरणीचे सावट दिसून येत आहे.दुबारचे सावटजिल्ह्यात ८ ते १० जूनपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र बरसल्याने शेतकºयांनी पेरण्यांची घाई केली. हवामान खात्याने २२ जूनपर्यंत पाऊस नसल्याची तर कृषी विभागाने पेरण्या न करण्याचा सल्ला दिला होता; पण शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत पेरण्या केल्या. पेरलेले बियाणे अंकूरले; पण पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. पाऊस न आल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागेल.

टॅग्स :agricultureशेती