शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

कांबळे गटाला बाप्पा पावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 23:33 IST

युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा निकाल आज गणेशोत्सवाच्या दिवशी जाहीर झाला. यात आमदार रणजित कांबळे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत दणदणीत विजय मिळवून जिल्हाध्यक्षपदासह दोन विधानसभा अध्यक्षही निवडून आणले. त्यामुळे आज कांबळे गटाला बाप्पा पावले, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

ठळक मुद्देयुकाँ निवडणूक : जिल्हाध्यक्षपदी विपीन राऊत तर उपाध्यक्ष गौरव देशमुख

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीचा निकाल आज गणेशोत्सवाच्या दिवशी जाहीर झाला. यात आमदार रणजित कांबळे गटाने आपले वर्चस्व कायम ठेवत दणदणीत विजय मिळवून जिल्हाध्यक्षपदासह दोन विधानसभा अध्यक्षही निवडून आणले. त्यामुळे आज कांबळे गटाला बाप्पा पावले, असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे वर्धा विधानसभा अध्यक्षपद शेंडे गटाने बहूमताने हिसकाऊन वर्चस्व दाखवून दिले.युवक काँग्रेसच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात आमदार रणजित कांबळे गट आणि काँग्रेसचे प्रदेश महासचिव शेखर शेंडे गटामध्ये चांगलीच ओढाताण निर्माण झाली होती. तीन दिवस चाललेल्या निवडणूक प्रक्रियेनंतर आज नागपुरात मतमोजणी घेण्यात आली. यावेळी कांबळे गटाचे विपीन राऊत यांनी शेंडे गटाचे गौरव देशमुख यांचा पराभव करीत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद बळकावले. त्यामुळे नियमानुसार गौरव देशमुख यांच्या वाट्याला जिल्हा उपाध्यक्षपद आले आहे. आर्वी विधानसभा क्षेत्र वगळता देवळी, हिंगणघाट व वर्धा विधानसभा क्षेत्रात दोन्ही गटाकडून अध्यक्षपदाकरिता उमेदवार रिंगणात उतरविण्यात आले होते. युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी रिंगणात असलेले विपीन राऊत यांना ६६२ तर गौरव देशमुख यांना ५१२ मत मिळाली. यात विपीन राऊत यांचा विजय झाला. वर्धा विधानसभा अध्यक्षपदाकरिता कांबळे गटाचे विराज शिंदे व शेंडे गटाचे कुणाल भाकरे रिंगणात होते. यात शिंदे यांना १७२ तर भाकरे यांना ३५८ मते मिळाल्याने शेंडे गेटाने बाजी मारली. याशिवाय हिंगणघाटमध्ये कांबळे गटाचे नकूल भाईमारे यांना ८० तर शेंडे गटाचे निखिल श्रीरामे यांना ५६ मते मिळाल्याने भाईमारे विजयी झाले. तसेच देवळी विधानसभा क्षेत्रात कांबळे गटाचे निलेश ज्योत हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. या निवडणूकीत जे उमेदवार पराभूत झाले त्या सर्वांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विजयी उमेदवारांनी विजयोत्सव साजरा केला.आर्वी विधानसभा क्षेत्र निरंकआर्वी विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार अमर काळे हे काँग्रेसचे असतानाही या मतदार संघात युवक काँग्रेसची अत्यल्प सदस्य नोंदणी करण्यात आली. त्यामुळे येथे विधानसभा अध्यक्षपदाचा उमेदवार दिला नाही. येथील सदस्यांनी केवळ जिल्हाध्यक्ष पदाच्या उमेदवारालाच मतदान केले. त्यामुळे येथील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.जिल्हा परिषद गटनेत्याच्या पुत्राचा पराभववर्धा विधानसभा अध्यक्षपदाकरिता कांबळे गटाकडून जिल्हा परिषदचे गटनेता संजय शिंदे यांचे पुत्र विराज शिंदे रिंगणात होते. त्यांच्या विरुध्द शेंडे गटाचे कुणाल भाकरे यांनी निवडणूक लढविली. यात भाकरे यांनी ३५८ मत घेत शिंदे यांचा १८६ मतांनी पराभव केला. शिंदे यांना केवळ १७२ मतावरच समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे जि.प.गटनेत्याच्या पुत्राला इतक्या मताधिक्याने पराभव स्विकारावा लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.जिल्हा महासचिवांचीही झाली निवडयाच निवडणूकीदरम्यान युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिवही निवडण्यात आले. खुल्या प्रवर्गातून सचीन गुप्ता व दिपक कन्ना रिंंगणात होते. यापैकी सचीन गुप्ता यांनी १६३ मत घेऊन कन्ना यांचा ७० मतांनी पराभव केला. अनुसूचीत जाती आणि जमाती प्रवर्गातून नितीन इंगळे व विपूल ताडाम रिंगणात होते. यापैकी ताडाम यांनी ३७४ मत घेऊन इंगळे यांचा १८ मतांनी पराभव केला. इतर मागास वर्ग प्रवर्गातून राहूल सुरकार, महिला राखीव प्रवर्गातून पल्लवी खामनकर व अल्पसंख्यांक प्रवर्गातून मोहम्मद शेख हे तीन उमेदवार असल्याने त्यांची अविरोध निवड करण्यात आली. यातही कांबळे गटाचेच पारडे जड राहिले आहे. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता पक्षाची बाजू भक्कम करण्याची जबाबदारी येऊन पडली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेस