शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

२००१ च्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सूचनेपुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 21:24 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. ही योजना २००९ ते २०१६ या कालावधीत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली होती.

ठळक मुद्देअध्यादेशावर अंमल करणारी यंत्रणा अनभिज्ञच

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून राज्य शासनाने शेतकऱ्यांना दीड लाखांपर्यंत कर्जमाफी दिली. ही योजना २००९ ते २०१६ या कालावधीत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आली होती. डाव्यांचा लाँग मार्च आणि शेतकऱ्यांच्या रेट्यामुळे ९ मे रोजी नवीन शासन आदेश काढून ही कर्जमाफी २००१ ते २०१६ अशी करण्यात आली; पण याबाबत बँका अद्याप अनभिज्ञच असल्याचे समोर आले आहे.राज्य शासनाने कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. अनेक शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ झाले; पण २००९ पूर्वी कर्ज घेतलेल्या, ते फेडू न शकलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नव्हता. २००९ पूर्वीच्या अनेक शेतकऱ्यांच्या जुन्या कर्जाचे कित्येक पुनर्गठण झाले. परिणामी, शेतकऱ्यांना नवीन कर्ज तर मिळाले; पण जुन्या कर्जाचे हप्ते आणि नवीन कर्जही प्रलंबित राहिले. हा कर्जाचा डोंगर कसा उतरवावा, अशी चिंता हजारो शेतकऱ्यांना होती. आता शासनाने २००१ पासूनचे जुने कर्जही माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्सम शासन आदेशही ९ मे रोजी काढण्यात आला; पण त्याबाबत अद्याप कुठलेही लेखी आदेश जिल्हा उपनिबंधक, जिल्हा सहकारी बँक तथा लीड बँकेला देण्यात आलेले नाहीत. यामुळे नवीन निर्णयानुसार कर्जमाफीची प्रक्रिया अद्यापही सुरू होऊ शकलेली नाही. वास्तविक, ९ मे रोजी काढलेल्या शासन आदेशावर सात दिवसांत पूढील कार्यवाही सुरू होणे अपेक्षित होते; पण तसे न झाल्याने नवीन निर्णयाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.डाव्यांनी काढलेल्या लाँग मार्चचा धसका घेत शासनाने अध्यादेश तर निर्गमित केला; पण त्यावर कार्यवाही कधी होणार, हा प्रश्नच आहे. कर्जमाफीच्या या आदेशाबाबत अद्याप उपसमितीने मार्गदर्शनही केलेले नाही. जुन्या योजनेच्या निकषानुसारच ही कर्जमाफी राहणार असली तरी तत्सम आदेश जिल्हा उपनिबंध, जिल्हा सहकारी बँका तथा अग्रणी बँकांना देणे गरजेचे असते. तत्सम निर्देश न दिल्याने जिल्ह्यात नवीन अध्यादेशावर कुठल्याही हालचाली होताना दिसत नाही.२३ फेबु्रवारीपासून निधीच नाहीवर्धा जिल्हा सहकारी बँकेला छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेतून १३६ कोटी रुपये प्राप्त होणार होते. यातून २१ हजार ६९६ शेतकऱ्यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार होते; पण आजपर्यंत केवळ ४२ कोटी रुपयांचा निधी बँकेला प्राप्त झाल्याची माहिती आहे. २३ फेबु्रवारी २०१८ पासून जिल्हा सहकारी बँकेला निधीच देण्यात आलेला नाही. परिणामी, अनेक शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचा भार अद्याप हलका होऊ शकलेला नाही. यामुळे नवीन अध्यादेशानुसार कार्यवाही कधी होणार व बँकांना पैसा कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.मोजकेच शेतकरी शिल्लक२००१ मध्ये सहकारी बँकांतूनच अधिकाधिक शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप केले जात होते. या कर्ज वाटपाच्या नोंदी जिल्हा खरेदी-विक्री संघाच्या गटसचिवांकडे आहे. हे जुने कर्ज माफ करण्यासाठी याद्या करताना सचिवांना कसरतच करावी लागणार आहे. काहींच्या नोंदी नसल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले आहे. यामुळे या सुधारित कर्जमाफी योजनेचा लाभ मोजकेच शेतकरी घेऊ शकणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कर्जमाफी योजनेत यापूर्वीच ७० टक्के शेतकरी पात्र ठरले आहेत. आता केवळ ३० टक्के म्हणजे साधारण नऊ ते दहा हजार शेतकरी शिल्लक राहिले असून जिल्हा बँकेला ५० ते ५५ कोटी रुपये अपेक्षित आहेत.सहकारी बँकांनाच लाभशासनाने शेतकऱ्यांचे २००१ ते ०९ पर्यंत दीड लाखांपर्यंतचे थकित कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. ही कर्जमाफी सरसकट देण्यात आली. या कर्जमाफीचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे कर्ज निल होऊन मिळणार असला तरी अप्रत्यक्षरित्या जिल्हा सहकारी बँकांनाच होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. वर्धा जिल्ह्यातच २००१ पासून शेतकऱ्यांकडे सुमारे ४१० कोटींचे कर्ज थकित होते. २००९ ते २०१६ दरम्यानच्या थकित कर्जापोटी जिल्हा बँकेला यातील काही रक्कम वसूल करता आली आहे. असे असले तरी अद्याप कोट्यवधी रुपये अडकले आहेत. या कर्जमाफीतून सहकारी बँका तरणार आहेत, हे निश्चित!

टॅग्स :Farmerशेतकरी