शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

निवडणूक आयोग झोपेत? मतदार यादीत दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:27 IST

पत्रकार परिषदेतून शैलेश अग्रवाल यांचा आरोप : निवडणूक आयोगावरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीत अनेक प्रकाराच्या त्रुटी आहेत. एकाचे नाव परंतु ईपिक नंबर वेगळे असलेले तसेच जिल्हा सोडून पुणे, नागपूर व इतर शहरांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावेसुद्धा जिल्ह्यातील मतदार यादीत आहेत, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळाचे प्रतिनिधी शैलेश अग्रवाल यांनी स्थानिक काँग्रेसच्या स‌द्भावनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीची पडताळणी काँग्रेस पक्षातर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त  २० टक्केच मतदार याद्या तपासल्या आहेत. त्यामध्ये हिंगणघाट शहरातील मतदार यादीमध्ये दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव आहेत. त्यामुळे या मजुराने इथे मतदान केले असेल आणि त्यांच्या गावी जाऊनसुद्धा मतदान केले असेल. ही 'वोट चोरी' नाही का, असा प्रश्नसुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाला यावेळी विचाराला. तसेच देवळी, पुलगाव, हिंगणघाट येथील १८७ नागरिकांचे मतदान हे ग्रामपंचायत क्षेत्रात आहे. मात्र, त्याच नागरिकांचे मतदान पालिका क्षेत्रातसुद्धा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका या वेगवेगळ्या होत असल्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले नसेल का, असा प्रश्न उपस्थित करून ही 'वोट चोरी' नाही तर काय आहे? असा आरोपसुद्धा निवडणूक आयोगावर त्यांनी यावेळी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने डिजिटल स्वरूपात याद्या उपलब्ध करून द्याव्यात व मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करावे, जेणेकरून एकाच नागरिकाने दोन वेळेस मतदान केले की नाही, हे स्पष्ट होईल, असेही अग्रवाल म्हणाले.

स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नाव जिल्ह्याच्या मतदार यादीत कायमचएकच नाव परंतु ईपिक वेगळे असलेल्या मतदारांची संख्या ४ हजार ७६५ आहे. सोबतच ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात अशा दोन्ही ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची संख्या ८ हजार ४९ इतकी आहे. तर वर्धा जिल्ह्यातून पुणे, नागपूर व इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या व जिथे आहेत त्या ठिकाणी व जिल्ह्यातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची संख्या १६ हजार ३८० एवढी आहे. सोबत देवळी, पुलगाव, आर्वी हिंगणघाट येथील मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांचे नाव वर्धा शहरातील मतदार यादीत आहे, असे एकूण ४ हजार ९५० मतदार आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस