शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोग झोपेत? मतदार यादीत दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 20:27 IST

पत्रकार परिषदेतून शैलेश अग्रवाल यांचा आरोप : निवडणूक आयोगावरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीत अनेक प्रकाराच्या त्रुटी आहेत. एकाचे नाव परंतु ईपिक नंबर वेगळे असलेले तसेच जिल्हा सोडून पुणे, नागपूर व इतर शहरांत स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावेसुद्धा जिल्ह्यातील मतदार यादीत आहेत, असा आरोप अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय समन्वयक व प्रदेश कार्यकारी मंडळाचे प्रतिनिधी शैलेश अग्रवाल यांनी स्थानिक काँग्रेसच्या स‌द्भावनात आयोजित पत्रकार परिषदेत केला.

ते पुढे म्हणाले, जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदार यादीची पडताळणी काँग्रेस पक्षातर्फे सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत फक्त  २० टक्केच मतदार याद्या तपासल्या आहेत. त्यामध्ये हिंगणघाट शहरातील मतदार यादीमध्ये दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव आहेत. त्यामुळे या मजुराने इथे मतदान केले असेल आणि त्यांच्या गावी जाऊनसुद्धा मतदान केले असेल. ही 'वोट चोरी' नाही का, असा प्रश्नसुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाला यावेळी विचाराला. तसेच देवळी, पुलगाव, हिंगणघाट येथील १८७ नागरिकांचे मतदान हे ग्रामपंचायत क्षेत्रात आहे. मात्र, त्याच नागरिकांचे मतदान पालिका क्षेत्रातसुद्धा आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुका या वेगवेगळ्या होत असल्यामुळे त्यांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले नसेल का, असा प्रश्न उपस्थित करून ही 'वोट चोरी' नाही तर काय आहे? असा आरोपसुद्धा निवडणूक आयोगावर त्यांनी यावेळी केला. त्यामुळे निवडणूक आयोगाने डिजिटल स्वरूपात याद्या उपलब्ध करून द्याव्यात व मतदान केंद्रांचे सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध करावे, जेणेकरून एकाच नागरिकाने दोन वेळेस मतदान केले की नाही, हे स्पष्ट होईल, असेही अग्रवाल म्हणाले.

स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नाव जिल्ह्याच्या मतदार यादीत कायमचएकच नाव परंतु ईपिक वेगळे असलेल्या मतदारांची संख्या ४ हजार ७६५ आहे. सोबतच ग्रामपंचायत व नगरपालिका क्षेत्रात अशा दोन्ही ठिकाणी नाव असलेल्या मतदारांची संख्या ८ हजार ४९ इतकी आहे. तर वर्धा जिल्ह्यातून पुणे, नागपूर व इतर ठिकाणी स्थलांतरित झालेल्या व जिथे आहेत त्या ठिकाणी व जिल्ह्यातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांची संख्या १६ हजार ३८० एवढी आहे. सोबत देवळी, पुलगाव, आर्वी हिंगणघाट येथील मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांचे नाव वर्धा शहरातील मतदार यादीत आहे, असे एकूण ४ हजार ९५० मतदार आहेत. 

टॅग्स :wardha-acवर्धाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगcongressकाँग्रेस