शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाटचऱ्यांअभावी सिंचन प्रभावित

By admin | Updated: December 3, 2014 22:55 IST

परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही.

रोहणा : परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही. परिणामी शेतीला ओलित कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.लोअर वर्धा प्रकल्पातून मुख्य कालव्यापासून पाटचऱ्या काढून शेतकऱ्यांना सिंचनाची सोच उपलब्ध व्हावी म्हणून वर्षभरापूर्वी पाटचऱ्यांच्या कामाची निविदा काढण्यात आली. परंतु वर्षभराचा कालावधी लोटला तरी सुद्धा पाटचऱ्यांचे काम अजूनपर्यंत सुरूच न झाल्याने रोहणा परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नाही. शासन राज्यातील सिंचनात वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचा आव आणत आहे. परंतु ज्यामुळे सिंचनात वाढू होऊ शकते त्या पाटचऱ्यांची कामे अग्रक्रमाने करण्याऐवजी त्यातच दिरंगाई केली जात आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता सदर कामाची निविदा वर्षभरापूर्वी निघाली असली तरी ठेकेदाराला वर्कआर्डर अजून पर्यंत मिळाला नसल्याचे समजले. परिणामी ठेकेदार कामाला सुरूवात करू शकला नाही. सोयाबीनचे उत्पादन अल्प प्रमाणात झाल्याने त्या जमिनीवर रब्बी पीक घेणे शक्य होते. पण मुख्य कालव्यात भरपूर पाणी असूनही केवळ पाटचऱ्या नसल्याने शेतकरी ओलितापासून वंचित आहे. यासंदर्भात राणी लक्ष्मीबाई पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष अनील देशमुख यांनी लघू पाटबंधारे विभाग आर्वी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला पण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांच्या प्रयत्नांना अजूनतरी यश आले नाही. ओलिताची सोय असूनही ती अर्धवट करण्यात आल्याने ओलित करणे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे. यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने खरीप हातचा गेला. त्यामुळे रबी पिकाने तरी साथ द्यावी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु त्यासाठी पाण्याची अतोनात आवश्यकता असते. त्यामुळे संबंधित विभागाने आतातरी पाटचऱ्यांची कामे सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा रबी हंगामही कोरडाच जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.(वार्ताहर)