शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

पाटचऱ्यांअभावी सिंचन प्रभावित

By admin | Updated: December 3, 2014 22:55 IST

परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही.

रोहणा : परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही. परिणामी शेतीला ओलित कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.लोअर वर्धा प्रकल्पातून मुख्य कालव्यापासून पाटचऱ्या काढून शेतकऱ्यांना सिंचनाची सोच उपलब्ध व्हावी म्हणून वर्षभरापूर्वी पाटचऱ्यांच्या कामाची निविदा काढण्यात आली. परंतु वर्षभराचा कालावधी लोटला तरी सुद्धा पाटचऱ्यांचे काम अजूनपर्यंत सुरूच न झाल्याने रोहणा परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नाही. शासन राज्यातील सिंचनात वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचा आव आणत आहे. परंतु ज्यामुळे सिंचनात वाढू होऊ शकते त्या पाटचऱ्यांची कामे अग्रक्रमाने करण्याऐवजी त्यातच दिरंगाई केली जात आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता सदर कामाची निविदा वर्षभरापूर्वी निघाली असली तरी ठेकेदाराला वर्कआर्डर अजून पर्यंत मिळाला नसल्याचे समजले. परिणामी ठेकेदार कामाला सुरूवात करू शकला नाही. सोयाबीनचे उत्पादन अल्प प्रमाणात झाल्याने त्या जमिनीवर रब्बी पीक घेणे शक्य होते. पण मुख्य कालव्यात भरपूर पाणी असूनही केवळ पाटचऱ्या नसल्याने शेतकरी ओलितापासून वंचित आहे. यासंदर्भात राणी लक्ष्मीबाई पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष अनील देशमुख यांनी लघू पाटबंधारे विभाग आर्वी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला पण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांच्या प्रयत्नांना अजूनतरी यश आले नाही. ओलिताची सोय असूनही ती अर्धवट करण्यात आल्याने ओलित करणे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे. यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने खरीप हातचा गेला. त्यामुळे रबी पिकाने तरी साथ द्यावी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु त्यासाठी पाण्याची अतोनात आवश्यकता असते. त्यामुळे संबंधित विभागाने आतातरी पाटचऱ्यांची कामे सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा रबी हंगामही कोरडाच जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.(वार्ताहर)