शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

पाटचऱ्यांअभावी सिंचन प्रभावित

By admin | Updated: December 3, 2014 22:55 IST

परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही.

रोहणा : परिसरातून लोअर वर्धा प्रकल्पाचा मुख्य कालवा गेला आहे. वर्षभरापासून कालव्यात भरपूर पाणी आहे. परंतु पाटचऱ्यांअभावी रोहण्यातील सदर प्रकल्पातून सिंचन होऊ शकत नाही. परिणामी शेतीला ओलित कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.लोअर वर्धा प्रकल्पातून मुख्य कालव्यापासून पाटचऱ्या काढून शेतकऱ्यांना सिंचनाची सोच उपलब्ध व्हावी म्हणून वर्षभरापूर्वी पाटचऱ्यांच्या कामाची निविदा काढण्यात आली. परंतु वर्षभराचा कालावधी लोटला तरी सुद्धा पाटचऱ्यांचे काम अजूनपर्यंत सुरूच न झाल्याने रोहणा परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नाही. शासन राज्यातील सिंचनात वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असल्याचा आव आणत आहे. परंतु ज्यामुळे सिंचनात वाढू होऊ शकते त्या पाटचऱ्यांची कामे अग्रक्रमाने करण्याऐवजी त्यातच दिरंगाई केली जात आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता सदर कामाची निविदा वर्षभरापूर्वी निघाली असली तरी ठेकेदाराला वर्कआर्डर अजून पर्यंत मिळाला नसल्याचे समजले. परिणामी ठेकेदार कामाला सुरूवात करू शकला नाही. सोयाबीनचे उत्पादन अल्प प्रमाणात झाल्याने त्या जमिनीवर रब्बी पीक घेणे शक्य होते. पण मुख्य कालव्यात भरपूर पाणी असूनही केवळ पाटचऱ्या नसल्याने शेतकरी ओलितापासून वंचित आहे. यासंदर्भात राणी लक्ष्मीबाई पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष अनील देशमुख यांनी लघू पाटबंधारे विभाग आर्वी यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला पण अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे त्यांच्या प्रयत्नांना अजूनतरी यश आले नाही. ओलिताची सोय असूनही ती अर्धवट करण्यात आल्याने ओलित करणे शेतकऱ्यांसाठी दिवास्वप्न ठरत आहे. यंदा पाऊस अत्यल्प झाल्याने खरीप हातचा गेला. त्यामुळे रबी पिकाने तरी साथ द्यावी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. परंतु त्यासाठी पाण्याची अतोनात आवश्यकता असते. त्यामुळे संबंधित विभागाने आतातरी पाटचऱ्यांची कामे सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. अन्यथा रबी हंगामही कोरडाच जाण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.(वार्ताहर)