शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण पाणीपुरवठा विभागात वाहतेय अनियमिततेचे पाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:00 IST

ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथील राष्ट्रीय पेयजल योजना आणि बोरगाव (दातार) येथील मुख्यमंत्री पेयजल योजना, या दोन्ही कामांचे कार्यारंभ आदेश देताना कंत्राटदाराकडून सुरक्षा ठेव घेणे बंधनकारक होते. मात्र, पाणीपुरवठा विभागातील लेखा अधिकारी विनोद चौधरी यांनी कंत्राटदाराचे हित जोपासत नियमबाह्यपणे सुरक्षा ठेव न घेताच कार्यारंभ आदेश दिल्याचे, माहिती अधिकारात उघडकीस आले.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांकडून कंत्राटदारांचे हित : कारवाईकडे होताहेत डोळेझाक

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील काही अधिकारी शासनाचे वेतन घेवून कंत्राटदाराचे हित जोपासत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी तक्रारीअंती चौकशीही पूर्ण झाली तसेच सभागृहात लेखा अधिकाºयाच्या निलंबनाचा ठराव घेण्यात आला, तरीही कारवाई होत नसल्याने नेमके पाणी कुठे मुरत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सध्या चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हिंगणघाट तालुक्यातील पारडी येथील राष्ट्रीय पेयजल योजना आणि बोरगाव (दातार) येथील मुख्यमंत्री पेयजल योजना, या दोन्ही कामांचे कार्यारंभ आदेश देताना कंत्राटदाराकडून सुरक्षा ठेव घेणे बंधनकारक होते. मात्र, पाणीपुरवठा विभागातील लेखा अधिकारी विनोद चौधरी यांनी कंत्राटदाराचे हित जोपासत नियमबाह्यपणे सुरक्षा ठेव न घेताच कार्यारंभ आदेश दिल्याचे, माहिती अधिकारात उघडकीस आले.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्या कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीअंती चौकशीसमिती गठित करुन पाणीपुरवठा विभागातील तिघांना कारणे दाखवा नोटीसही बजावल्याची माहिती आहे. सोबतच नुकताच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत लेखा अधिकारी विनोद चौधरी यांना निलंबित करण्याचा ठरावही पारित करण्यात आला.पण, अद्याप दोषी अधिकऱ्यांवर कुठलीही कारवाई झाली नसल्याने या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.माहिती अधिकारात या बाबींचा झाला खुलासानियमानुसार अतिरिक्त सुरक्षा ठेव दिल्याशिवाय १ टक्के बिलोचा करारनामा करता येत नाही. पण, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी या नियमाला तिलांजली देत अतिरिक्त सुरक्षा ठेव रक्कमेचा डीडी न घेताच दोन वर्षात तब्बल १८ ते २० निवादा १ टक्के बिलो ने काढल्यात. त्यातही करारनामा संपल्यावर डीडीऐवजी बँक गॅरंटीचा वापर करण्यात आला.हिंगणघाट तालुक्यातील पारडी, कान्होली, बोरगाव (दातार) या तिन्ही गावातील पाणीपुरवठा कामाच्या निविदा एक टक्क्यापेक्षा कमी दराने मंजूर करण्यात आल्या. कामाच्या निविदा झाल्या, करारनामे झाले पण, अतिरिक्त सुरक्षा रक्कम करारनामा संपल्यावर घेऊन त्याचे डीडी विभागाच्या खात्यात जमा न करताच धूळखात ठेवण्यात आले. इतक्यावरच न थांबता काही प्रकरणात काम पूर्ण होण्यापूर्वीच नियमबाह्य पद्धतीने कंत्राटदाराला डीडी देखील परत केल्याची बाब समोर आली आहे.नियमानुसार १ टक्क्याखाली टेंडर देण्यात आले असेल तर कंत्राटदाराने मूळ परफॉर्मन्स डीडी सादर करणे बंधनकारक आहे. तो सादर केला नाही तर त्यापुढच्या कंत्राटदाराला प्राधान्य देण्याचा नियम आहे. परंतु नियम पायदळी तुडवत ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने अनेक करारनामे केले आहेत, अशी माहिती प्रकाश कांबळे यांनी मागितलेल्या माहिती अधिकारात पुढे आली आहे.ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील गैरप्रकाराबाबत तक्रार प्राप्त होताच चौकशी करुन लेखा अधिकाऱ्यांसह तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दरम्यान स्थायी समितीमध्ये निलंबनाचा ठरावही घेण्यात आला आहे. याप्रकरणाची चौकशी सुरु असून येत्या आठ दिवसात संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.वधापाणीपुरवठा विभागातील लेखा अधिकारी विनोद चौधरी यांनी कंत्राटदाराचे हित जोपासून शासनाच्या निधीला चुना लावल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तक्रारही झाली आहे. लेखा अधिकाºयांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समितीच्या सभागृहात केल्यानंतर त्यासंदर्भात ठराव पारित करण्यात आला. आता मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तत्काळ कारवाई करावी.नितीन मडावी, माजी अध्यक्ष तथा भाजपा गटनेता, जि.प. वधाग्रामीण पाणीपुरवठा विभागातील लेखा अधिकाºयांना निलंबित करण्यासंदर्भात सभागृहात निलंबनाचा ठराव घेण्यात आला. यापूर्वी अनेकदा संबंधित अधिकाºयाला निलंबन करण्याची मागणी करण्यात आली पण, याकडे दुर्लक्ष केले गेले. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करण्यात येईल.महेंद्र मुनेश्वर, जिल्हाध्यक्ष, रिपाई(आंबेडकर)

टॅग्स :zpजिल्हा परिषदWaterपाणी