शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

सोयाबीनवर अज्ञात रोगाचे आक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:40 IST

येथील शेतकरी विनोद कुंभारे यांचे गावाशेजारी तळेगाव एकुर्ली रस्त्यावर चार एकर शेतात सोयाबीनची लागवड केली; पण ते सोयाबीन पिवळे पडून मरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतात जवळपास अर्धा-अर्धा एकराचे खळे तयार झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी धास्तावले : कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची कास्तकारांची मागणी

किशोर तेलंग।लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (टा.) : येथील शेतकरी विनोद कुंभारे यांचे गावाशेजारी तळेगाव एकुर्ली रस्त्यावर चार एकर शेतात सोयाबीनची लागवड केली; पण ते सोयाबीन पिवळे पडून मरत असल्याचे दिसून येत आहे. शिवाय शेतात जवळपास अर्धा-अर्धा एकराचे खळे तयार झाले आहे. परिसरात सोयाबीनची लागवड झालेल्या अनेक शेतात हिच परिस्थिती दिसून येत असल्याने व संपूर्ण पीक हातचे जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची मागणी आहे.जमिनीतील ओलावा कमी झाल्यामुळे हा रोगा असल्याचे काही कृषी व्यवसायिक सांगत आहे. मात्र, याआधी सुद्धा याच शेतात सोयाबीन होते, तेव्हा असे झाले नाही असे शेतकरी कुंभारे यांचे म्हणणे आहे. शेतकरी कुंभारे यांनी सोयाबीन दोन फवारणी केल्या रासायनिक खते सुद्धा दिली. डवरणी झाली, तणनाशक सुद्धा फवारले. त्यामुळे पीक चांगले बहरले; पण या अज्ञात रोगाने सोयाबीन उत्पादकांवर मोठे संकटच आले आहे. सध्या जमिनीत ओलावा आहे. तरी सोयाबीन पिवळे पडत असल्याने शेतकऱ्यांसमोर कुठला रोग आहे याबाबत उलट-सुटल चर्चा होत आहे. ही परिस्थिती नेमकी अशामुळे ओढावली याचा साधा अंदाजही शेतकºयांना सध्या बांधता येत नसल्याचे शेतकरी सांगतात. यावर उपाययोजना म्हणून काय करावे, याची माहिती पीक पाहणी करून कृषी विभागाच्या तज्ज्ञांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना द्यावी, अशी मागणी आहे.कपाशीवरही आला चुरडाया भागातील कपाशी व तूर ही पीक बºयापैकी असल्याचे दिसून येत असली तरी कपाशी पिकांवर चुरडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे महागडी औषधे खरेदी करून त्याची फवारणी कपाशी पिकावर केल्या जात आहे. या प्रकारामुळे यंदाही उत्पादन खर्चात वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात. त्यातच कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या अस्मानी व सुल्तानी संकटांनी शेतकरी पुरता धास्तावला आहे.मी सोयाबीन पिकाची योग्य निगा राखली. औषध फवारले, वेळेवर खत दिले, डवरणी केली सर्व कामे वेळीच केल्याने पीकही चांगले बहरले होते. परंतु, अचानक पीक पिवळे होत करपल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सदर रोग कुठला याबाबत कृषी विभागाने आम्हाला सांगत त्यावरील उपाययोजनांची माहिती द्यावी.- विनोद कुंभारे, शेतकरी, तळेगाव (टा.).

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती