शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

आत्महत्या रोखण्यासाठीचा प्रेरणा प्रकल्प फोलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:45 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे,....

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : सरकारलाच मानसोपचाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे, असा घणाघाती आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षण अभियानाचे संस्थापक प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी केला आहे.देशभरात १ ते १० जून या काळात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्यावतीने केंद्र व राज्य सरकारकडे शेतकऱ्याच्या संपूर्ण आरक्षणाची लावून धरण्यात आली आहे. या संदर्भात शासनाला पाठविलेल्या प्रस्तावात अग्रवाल यांनी म्हटले आहे की, व्यसनाधिनतामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असा काहींचा निकष आहे. याबाबत सरकारने शेतकरी कोणती दारू पित होता याचा शोध घेवून बाजार भाव माहित करून घ्यावा. दरडोई येणारा खर्च याचा तुलतात्मक गोषवारा बनवावा. बिगर शेतकी मद्यापींमध्ये आत्महत्येचे प्रमाण आणि शेतकरी मद्यपींमध्ये आत्महत्याचे प्रमाण गोळा करून त्याची तुलना करावी. यात खरी आकडेवारी समोर येईल. शेतकऱ्याला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रकारही सुरू आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिर आयोजित केली जात आहेत. एका दान्यापासून चमत्कार घडविणारा शेतकरी मनोरुग्ण कसा असू शकतो, असा सवाल मिशनच्यावतीने करण्यात आला आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले प्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसोपचार शिबिर हे कृषी खात्याच्या अर्थ संकल्पिय तरतूदीतील निधीतून आयोजित केले जात आहे. हा पैसा शेतकºयांवर थेट लाभासाठी खर्च केल्यास उत्पादन क्षमता वाढेल. मात्र, आता अधिकारी शिबिराच्या नावावर केवळ देयके बनविण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्याला मानसोपचाराची गरजच नसून खरी गरज सरकारलाच आहे, असा दावा एकच मिशन शेतकरी आरक्षणाने केला आहे. शेतकऱ्याच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात सवलत द्यायला हवी, याबाबत शासनाकडे कोणतेही धोरण नाही, असेही एकच मिशन शेतकरी आरक्षणने म्हणणे आहे. सरकारच्या पीक कर्ज योजनेचा अत्यल्प शेतकऱ्यांना लाभ होत असून सरसकट कर्ज वितरण व्हायला हवे, असेही अग्रवाल यांचे म्हणणे आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आखण्याची गरज आहे. कर्जबाजारीपणा, व्यसनाधिनता, दृष्काळ, नापिकी, अपुरे सिंचन, अपुरा वित्त पुरवठा, कर्जावरील बेहिशेबी व्याज, सावकारी जाच, कुटुंब कलह, वाढती महागाई, कोसळलेले बाजारभाव, आर्थिक चणचण, ओढातान, बोझा व उद्याची चिंता या गोष्टी शेतकरी आत्महत्येला कारणीभूत आहेत. तसेच शेतमालाचे किमान शेती भाव ठरविण्याची पद्धत हे ही या मागचे महत्त्वाचे कारण आहे.- शैलेश अग्रवालप्रणेते एकच मिशन शेतकरी आरक्षण.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या