शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठीचा प्रेरणा प्रकल्प फोलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:45 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे,....

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : सरकारलाच मानसोपचाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे, असा घणाघाती आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षण अभियानाचे संस्थापक प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी केला आहे.देशभरात १ ते १० जून या काळात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्यावतीने केंद्र व राज्य सरकारकडे शेतकऱ्याच्या संपूर्ण आरक्षणाची लावून धरण्यात आली आहे. या संदर्भात शासनाला पाठविलेल्या प्रस्तावात अग्रवाल यांनी म्हटले आहे की, व्यसनाधिनतामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असा काहींचा निकष आहे. याबाबत सरकारने शेतकरी कोणती दारू पित होता याचा शोध घेवून बाजार भाव माहित करून घ्यावा. दरडोई येणारा खर्च याचा तुलतात्मक गोषवारा बनवावा. बिगर शेतकी मद्यापींमध्ये आत्महत्येचे प्रमाण आणि शेतकरी मद्यपींमध्ये आत्महत्याचे प्रमाण गोळा करून त्याची तुलना करावी. यात खरी आकडेवारी समोर येईल. शेतकऱ्याला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रकारही सुरू आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिर आयोजित केली जात आहेत. एका दान्यापासून चमत्कार घडविणारा शेतकरी मनोरुग्ण कसा असू शकतो, असा सवाल मिशनच्यावतीने करण्यात आला आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले प्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसोपचार शिबिर हे कृषी खात्याच्या अर्थ संकल्पिय तरतूदीतील निधीतून आयोजित केले जात आहे. हा पैसा शेतकºयांवर थेट लाभासाठी खर्च केल्यास उत्पादन क्षमता वाढेल. मात्र, आता अधिकारी शिबिराच्या नावावर केवळ देयके बनविण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्याला मानसोपचाराची गरजच नसून खरी गरज सरकारलाच आहे, असा दावा एकच मिशन शेतकरी आरक्षणाने केला आहे. शेतकऱ्याच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात सवलत द्यायला हवी, याबाबत शासनाकडे कोणतेही धोरण नाही, असेही एकच मिशन शेतकरी आरक्षणने म्हणणे आहे. सरकारच्या पीक कर्ज योजनेचा अत्यल्प शेतकऱ्यांना लाभ होत असून सरसकट कर्ज वितरण व्हायला हवे, असेही अग्रवाल यांचे म्हणणे आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आखण्याची गरज आहे. कर्जबाजारीपणा, व्यसनाधिनता, दृष्काळ, नापिकी, अपुरे सिंचन, अपुरा वित्त पुरवठा, कर्जावरील बेहिशेबी व्याज, सावकारी जाच, कुटुंब कलह, वाढती महागाई, कोसळलेले बाजारभाव, आर्थिक चणचण, ओढातान, बोझा व उद्याची चिंता या गोष्टी शेतकरी आत्महत्येला कारणीभूत आहेत. तसेच शेतमालाचे किमान शेती भाव ठरविण्याची पद्धत हे ही या मागचे महत्त्वाचे कारण आहे.- शैलेश अग्रवालप्रणेते एकच मिशन शेतकरी आरक्षण.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या