शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

आत्महत्या रोखण्यासाठीचा प्रेरणा प्रकल्प फोलच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:45 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे,....

ठळक मुद्देशैलेश अग्रवाल : सरकारलाच मानसोपचाराची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी राज्य शासनाने मानसोपचार शिबिर आयोजित केले आहे. यासाठी प्रेरणा प्रकल्प राबविला जात आहे. हा अतिशय मुर्खपणा असून शासनालाच मानसोपचाराची गरज निर्माण झाली आहे, असा घणाघाती आरोप एकच मिशन शेतकरी आरक्षण अभियानाचे संस्थापक प्रणेते शैलेश अग्रवाल यांनी केला आहे.देशभरात १ ते १० जून या काळात शेतकऱ्यांचा संप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एकच मिशन शेतकरी आरक्षणाच्यावतीने केंद्र व राज्य सरकारकडे शेतकऱ्याच्या संपूर्ण आरक्षणाची लावून धरण्यात आली आहे. या संदर्भात शासनाला पाठविलेल्या प्रस्तावात अग्रवाल यांनी म्हटले आहे की, व्यसनाधिनतामुळे शेतकरी आत्महत्या करतात, असा काहींचा निकष आहे. याबाबत सरकारने शेतकरी कोणती दारू पित होता याचा शोध घेवून बाजार भाव माहित करून घ्यावा. दरडोई येणारा खर्च याचा तुलतात्मक गोषवारा बनवावा. बिगर शेतकी मद्यापींमध्ये आत्महत्येचे प्रमाण आणि शेतकरी मद्यपींमध्ये आत्महत्याचे प्रमाण गोळा करून त्याची तुलना करावी. यात खरी आकडेवारी समोर येईल. शेतकऱ्याला मनोरुग्ण ठरविण्याचा प्रकारही सुरू आहे. त्यासाठी गावागावात मानसोपचार शिबिर आयोजित केली जात आहेत. एका दान्यापासून चमत्कार घडविणारा शेतकरी मनोरुग्ण कसा असू शकतो, असा सवाल मिशनच्यावतीने करण्यात आला आहे.शासनाने शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेले प्रेरणा प्रकल्पांतर्गत मानसोपचार शिबिर हे कृषी खात्याच्या अर्थ संकल्पिय तरतूदीतील निधीतून आयोजित केले जात आहे. हा पैसा शेतकºयांवर थेट लाभासाठी खर्च केल्यास उत्पादन क्षमता वाढेल. मात्र, आता अधिकारी शिबिराच्या नावावर केवळ देयके बनविण्याचे काम करीत आहेत. शेतकऱ्याला मानसोपचाराची गरजच नसून खरी गरज सरकारलाच आहे, असा दावा एकच मिशन शेतकरी आरक्षणाने केला आहे. शेतकऱ्याच्या पाल्यांसाठी उच्च शिक्षणात सवलत द्यायला हवी, याबाबत शासनाकडे कोणतेही धोरण नाही, असेही एकच मिशन शेतकरी आरक्षणने म्हणणे आहे. सरकारच्या पीक कर्ज योजनेचा अत्यल्प शेतकऱ्यांना लाभ होत असून सरसकट कर्ज वितरण व्हायला हवे, असेही अग्रवाल यांचे म्हणणे आहे.शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायमस्वरूपी धोरण आखण्याची गरज आहे. कर्जबाजारीपणा, व्यसनाधिनता, दृष्काळ, नापिकी, अपुरे सिंचन, अपुरा वित्त पुरवठा, कर्जावरील बेहिशेबी व्याज, सावकारी जाच, कुटुंब कलह, वाढती महागाई, कोसळलेले बाजारभाव, आर्थिक चणचण, ओढातान, बोझा व उद्याची चिंता या गोष्टी शेतकरी आत्महत्येला कारणीभूत आहेत. तसेच शेतमालाचे किमान शेती भाव ठरविण्याची पद्धत हे ही या मागचे महत्त्वाचे कारण आहे.- शैलेश अग्रवालप्रणेते एकच मिशन शेतकरी आरक्षण.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या