शहरं
Join us  
Trending Stories
1
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
2
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
3
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
4
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
5
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
6
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
7
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
8
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
9
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
10
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
11
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
12
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
13
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
14
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
15
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
16
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
17
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
18
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
19
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
20
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
Daily Top 2Weekly Top 5

केळीवर ‘करप्या’ रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST

सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या बागा आहेत. केळी पिकावर करप्या रोगाने अतिक्रमण केल्याने बागेत असलेले केळीचे पीक गळून खाली पडत आहेत. केळीच्या झाडांची पाने देखील करपायला सुरुवात झाली आहे. तर कुठे-कुठे या रोगाने केळीचे आपोआप झाडे सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केळी उत्पादक आर्थिक संकटात : १७ ते १८ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : एकेकाळी सेलू तालुका हा केळी उत्पादनात विदर्भात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, सध्या परतीच्या पावसाने सेलु तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आता केळीच्या पिकावर परतीच्या पावसाने ‘करप्या' रोग आला असून शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या बागा आहेत. केळी पिकावर करप्या रोगाने अतिक्रमण केल्याने बागेत असलेले केळीचे पीक गळून खाली पडत आहेत. केळीच्या झाडांची पाने देखील करपायला सुरुवात झाली आहे. तर कुठे-कुठे या रोगाने केळीचे आपोआप झाडे सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खडकी धानोली परिसरातील केळी उत्पादकांवर आर्थिक संकटाचे डोंगर उभे ठाकले असून पुढील पीक कसे घ्यावे, याच विवंचनेत ते आहेत.यावर्षी जिल्ह््यात पावसाचे प्रमाण जास्त होते. परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणात आला आणि पावसाने केळी पिकांवर करप्या रोग आला. करप्या आल्याने बागेतील केळीच्या झाडांचे पाने सुकली, पाने वाळली, त्यामुळे सूर्यापासून झाडांना मिळणारे अन्नद्रव्य कमी झालं आहे. त्यामुळे केळीचे झाडे स्वत: मुळातून कोलमडून पडत आहेत आणि त्याचा घड खाली पडत आहे. केळीचं एक झाड जगवायला ३०० रुपये लागतात. या भागात ५ हजार ४०० केळींची झाडे आहेत. परतीच्या पावसामुळे जवळ-जवळ १६ ते १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.शेतकरी सावकारांच्या दारातजिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचे हातचे पीक वाया गेले. सोयाबीन, कपासी, हरभरा, तूर आदी पिकांसह केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असल्याने त्यांच्याकडे सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. परिणामी, शेतकरी आत्महत्या करण्यासारखे गंभीर पाऊल उचलत आहे. शासनाने नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या नुकसानीची पहाणी करत त्यांना तत्काळ आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला. जमिनी वाफया नाही करता आल्या. तीन महिन्यापर्यंत केळीची वाढ झाली नाही. त्यामुळे परतीच्या पावसामुळे आता केळीच्या झाडांवर करप्या रोग आला. परतीच्या पावसाने केळी उत्पादक शेतकºयांचे पुरते कंबरडे मोडले असून करप्या रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. शासनाने याकडे लक्ष देत तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे.कुंदन वाघमारे, केळी उत्पादक,शेतकरीजिल्ह्यामध्ये फळ पिकाखाली ४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जास्तीत जास्त क्षेत्र हे आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांमध्ये आहे. केळी संदर्भात जी तक्रार झाली आहे. नैसर्गिक आपत्ती या सत्राखाली मोडत नाही, त्यावर करपा रोग आला असल्याची माहिती आहे. त्याठिकाणी आम्ही कृषी विभागाचे अधिकारी पाठवून नेमकं काय झालं ते पाहून केळी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.अनिल इंगळे, कृषी अधीक्षक, वर्धा

टॅग्स :agricultureशेती