शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
2
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
3
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
4
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
5
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
6
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
7
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
8
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
9
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
10
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
11
सावधान! तुमची एक छोटी चूक आणि बँक खाते रिकामे; UPI वापरताना 'हे' ५ डिजिटल नियम पाळणे आता अनिवार्य
12
'बंकरमध्ये लपण्याची वेळ आलेली...', ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानी राष्ट्रपती झरदारींचा मोठा खुलासा
13
Navneet Rana: "अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, हा शरद पवारांचाच प्लॅन!" नवनीत राणा असं का म्हणाल्या?
14
"गिरीजा ओकला पाहून इम्रान हाश्मीही झालेला दंग", प्रसिद्ध निर्मातीने सांगितला 'तो' किस्सा
15
"गौतम अदानी हे माझ्या मोठ्या भावासारखे, ते हक्काने मला रागवतात"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
16
नव्या पर्वाला सुरुवात; मुंबई महानगरपालिकेसाठी काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, जागावाटपही ठरले!
17
वृद्धापकाळाची चिंता सोडा! एलआयसीच्या 'या' योजनेत एकदा गुंतवा आणि आयुष्यभर मिळवा पेन्शन
18
Malegaon Municipal Corporation Election : जमलं तर आघाडी; नाहीतर काँग्रेस स्वबळावर; एमआयएमबरोबर फिस्कटले, ९ उमेदवारांची घोषणा
19
अभिमानास्पद! जुन्या कागदांपासून पेन्सिल बनवणारं यंत्र; कोण आहे राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती?
20
१२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष
Daily Top 2Weekly Top 5

ईस्माईलपूरच्या घाटधारकाची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला.

ठळक मुद्देसीमोल्लंघन करून उत्खनन : अधिकाऱ्यांचे पाठबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लिलाव झालेल्या घाटांची मुदत संपत आली असतानाच आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूरच्या वाळू घाटधारकाने आपली हद्द सोडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत घुसखोरी चालविली आहे. बोटी आणि पोकलँडच्या सहाय्याने दिवसरात्र उत्खनन सुरु असूनही अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने या घाटधारकांना पाठबळ मिळत असल्याची ओरड होत आहे.आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला. त्यामुळे या घाटधारकाने वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतीलच वाळू उपसा करणे बंधनकारक असताना त्याने लिलाव न झालेल्या अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतून वाळू उपसा सुरु केला आहे.हा उपसा करीत असताना सर्व नियम धाब्यावर बसविले जात असून घाटधारकांने जागोजागी आपले सहकारी नेमले असून त्यांच्या माध्यमातून अवैध वाहतूक केली जात असल्याचीही आता ओरड होत आहे. या अवैध वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांचीही वाट लागली असून परिसरातील नागरिकांचीच वहिवाट अडचणीत आली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.कोणी घेतलाय हा वाळूघाट?ईस्माईलपूरचा वाळूघाट पुलगावच्या बालाजी सर्व्हीसींग सेंटरने संचालक गुप्ता यांनी २२ लाख ४९ हजार ८५० रुपयात घेतला असून या घाटधारकाला स्थगितीनंतर मे महिन्यापासून घाटाचा ताबा देण्यात आला. त्यामुळे या घाटातून त्याला १२ सप्टेंबरपर्यंत उपसा करता येणार आहे. परंतू या घाटातील वाळूसाठा पुर्ण उपसला असून आता अमरावती जिल्ह्याच्या हद्दितील वाळूचा उपसा सुरु केला आहे. शासनाकडून मिळालेली रॉयल्टी संपली असून जिल्ह्याबाहेरील वाळूचा व्यवहार आता चिठ्ठींव्दारे सुरु असून एका ट्रॅक्टरचे साडेसात हजार रुपये घेतले जात असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे नियमबाह्य सुरु असलेल्या या उत्खननाला आळा घालण्याची मागणी होत आहे.घाटधारकावर दंडात्मक कारवाई कराआष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर घाटधारकाने नियमबाह्यरित्या वर्धा नदी पात्रातीलच अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतील तिवसा तालुक्याच्या फत्तेपूर (जावरा) या घाटातून वाळू उपसा सुरु केला आहे. त्याला तिवसा येथील तहसीलदारांचे पाठबळ मिळत आहे. या अवैध उत्खनना बाबत तिवसा येथील तहसीलदारांना अवगत केल्यानंतरही कारवाई होत नाही. यासंदर्भात आष्टीतील तहसीलदारांनी प्रशासनाला अहवाल सादर केला पण, कारवाई होत नसल्याने धानदांडग्या घाटधारकांमुळे प्रशासनही नतमस्तक असल्याचा आरोप होत आहे. या घाटधारकाविरुद्ध फौजदारीसह दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पिपल्स रिपल्बिकन पार्टीचे मेघराज डोंगरे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :sandवाळू