शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
2
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
3
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
6
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
7
सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
8
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
9
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
10
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
11
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
12
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
13
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
14
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
15
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
16
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
17
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
18
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
19
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
20
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला

ईस्माईलपूरच्या घाटधारकाची घुसखोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला.

ठळक मुद्देसीमोल्लंघन करून उत्खनन : अधिकाऱ्यांचे पाठबळ

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लिलाव झालेल्या घाटांची मुदत संपत आली असतानाच आष्टी तालुक्यातील ईस्माईलपूरच्या वाळू घाटधारकाने आपली हद्द सोडून अमरावती जिल्ह्याच्या हद्दीत घुसखोरी चालविली आहे. बोटी आणि पोकलँडच्या सहाय्याने दिवसरात्र उत्खनन सुरु असूनही अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाने या घाटधारकांना पाठबळ मिळत असल्याची ओरड होत आहे.आष्टी तालुक्यातील वर्धा नदीच्या पात्रात ईस्माईलपूर वाळू घाट आहे. या वर्धानदीच्या पात्राचा निम्मे भाव अमरावती तर निम्मे भाग वर्धा जिल्ह्याच्या हद्दीत येतो. नियमानुसार वर्धा जिल्ह्यातील आठ घाटांच्या लिलावा दरम्यान ईस्माईलपूरच्याही वाळू घाटाचा लिलाव करण्यात आला. त्यामुळे या घाटधारकाने वर्धा जिल्ह्याच्या हद्दीतीलच वाळू उपसा करणे बंधनकारक असताना त्याने लिलाव न झालेल्या अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतून वाळू उपसा सुरु केला आहे.हा उपसा करीत असताना सर्व नियम धाब्यावर बसविले जात असून घाटधारकांने जागोजागी आपले सहकारी नेमले असून त्यांच्या माध्यमातून अवैध वाहतूक केली जात असल्याचीही आता ओरड होत आहे. या अवैध वाहतुकीमुळे परिसरातील रस्त्यांचीही वाट लागली असून परिसरातील नागरिकांचीच वहिवाट अडचणीत आली आहे. त्यामुळे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.कोणी घेतलाय हा वाळूघाट?ईस्माईलपूरचा वाळूघाट पुलगावच्या बालाजी सर्व्हीसींग सेंटरने संचालक गुप्ता यांनी २२ लाख ४९ हजार ८५० रुपयात घेतला असून या घाटधारकाला स्थगितीनंतर मे महिन्यापासून घाटाचा ताबा देण्यात आला. त्यामुळे या घाटातून त्याला १२ सप्टेंबरपर्यंत उपसा करता येणार आहे. परंतू या घाटातील वाळूसाठा पुर्ण उपसला असून आता अमरावती जिल्ह्याच्या हद्दितील वाळूचा उपसा सुरु केला आहे. शासनाकडून मिळालेली रॉयल्टी संपली असून जिल्ह्याबाहेरील वाळूचा व्यवहार आता चिठ्ठींव्दारे सुरु असून एका ट्रॅक्टरचे साडेसात हजार रुपये घेतले जात असल्याची ओरड परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे नियमबाह्य सुरु असलेल्या या उत्खननाला आळा घालण्याची मागणी होत आहे.घाटधारकावर दंडात्मक कारवाई कराआष्टी तालुक्यातील ईस्माईलपूर घाटधारकाने नियमबाह्यरित्या वर्धा नदी पात्रातीलच अमरावती जिल्ह्याच्या हद्दीतील तिवसा तालुक्याच्या फत्तेपूर (जावरा) या घाटातून वाळू उपसा सुरु केला आहे. त्याला तिवसा येथील तहसीलदारांचे पाठबळ मिळत आहे. या अवैध उत्खनना बाबत तिवसा येथील तहसीलदारांना अवगत केल्यानंतरही कारवाई होत नाही. यासंदर्भात आष्टीतील तहसीलदारांनी प्रशासनाला अहवाल सादर केला पण, कारवाई होत नसल्याने धानदांडग्या घाटधारकांमुळे प्रशासनही नतमस्तक असल्याचा आरोप होत आहे. या घाटधारकाविरुद्ध फौजदारीसह दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पिपल्स रिपल्बिकन पार्टीचे मेघराज डोंगरे यांनी अमरावतीच्या जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

टॅग्स :sandवाळू