शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

कपाशीच्या शंभर वाणांच्या तपासणीचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:36 PM

कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देदर्जाबाबत शासन गंभीर : नागपूरच्या प्रयोगशाळेतील अहवालावर अनेकांच्या नजरा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कपाशीवर आलेल्या बोंडअळीमुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादक शेतकरी चांगलाच हैराण झाला होता. यामुळे शासनाच्यावतीने कापूस बियाण्यांच्या निम्या वाणांवर बंदी आणली. या बंदीनंतर बाजारात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांबाबत शासन चांगलेच सतर्क असल्याचे दिसत आहे. शासनाने दिलेले निर्देश या बियाणे कंपन्यांनी पाळले अथवा नाही याची दक्षता घेण्याकरिता वर्धेत कपाशीच्या शंभरावर बियाण्यांचे नमुने घेण्यात आले आहे. ते नमुने तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत रवाना करण्यात आले आहे.यंदाच्या खरीपात कपाशीवर बोंडअळी सारखी किड येणार नाही, याची दक्षता शासनाच्यावतीने घेण्यात येत आहे. गत वर्षी कपाशीच्या संकरीत बियाण्यांवर आलेल्या बोंड अळीमुळे बियाण्यांच्या दर्जावर प्रश्न निर्माण झाला होता. परिणामी शासनाने कपाशीच्या बियाण्यांवरच निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला. गत वर्षी बाजारात असलेल्या बियाण्यांपैकी निम्मे वाण कमी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यात तपासणी अंती राज्यात ४२ कंपनीच्या ३७० वाणांना परवाना देण्यात आला आहे. असा परवाना मिळालेले बियाणे जिल्ह्यात दाखल झाले आहे.जिल्ह्यात आलेल्या बियाण्यांनी त्यांना दिलेल्या सूचना पाळल्या अथवा नाही याची तपासणी करण्याकरिता कृषी विभागाच्यावतीने त्यांचे नमुने घेण्यात आले आहे. वर्धेत घेण्यात आलेल्या कपाशीच्या बियाण्यांचे नमुने नागपूर येथील प्रयोग शाळेत तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. या बियाण्यांच्या तपासणीअंती यात त्रुटी आढळल्यास सदर कंननीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे. बाजारात आलेल्या बियाण्यांबाबत यंदाच्या खरीपात शासन गंभीर असल्याचे दिसून आले आहे. कपाशीच्या बियाण्यांतून शेतकऱ्यांना अतिरिक्त फटका बसणार नाही यादी दक्षता कृषी विभागाच्यावतीने घेण्यात येत आहे. सोबतच बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांना सतर्कता बाळगावी असे आवाहनही कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. परवाना प्राप्त कृषी केंद्रातून बियाणे घ्यावे व त्याचे पक्के देयक घेण्याचासही सल्लाही देण्यात आला आहे.बियाणे कंपन्यांची झाडाझडतीवर्धा शहरालगत कपाशी बियाण्यांची निर्मिती करणाऱ्या दोन मोठ्या कंपन्या आहेत. त्यांच्या गोदामाची तपासणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या कंपनीत असलेल्या बियाण्यांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. या नमुन्यात जर शासनाच्या निकषांना बगल दिल्याचे दिसून आले तर या कंपन्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत.जिल्ह्यात कपाशीची ३ लाख ५० हजार पाकिटे दाखलशेतकऱ्यांकडून मशागतीची कामे आटोपली असून त्यांच्याकडून बियाण्यांच्या वाणाची आणि त्यांच्या दराची विचारणा करण्यात येत आहे. या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची काळजी घेत शासनाकडून ही मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांनी नव्या नियमानुसार प्रमाणित करण्यात आलेली बियाणेच खरेदी करावे असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात कपाशीच्या ३ लाख ५० हजार पाकिटे दाखल झाली आहे.सोयाबीनच्या बियाण्यांचेही घेतले नमुनेकृषी विभागाच्यावतीने कपाशीच्याच नाही तर सोयाबीनच्या बियाण्यांचेही नमुने घेण्यात आले आहे. सोयाबीनच्या पाच वाणांचे नमुने कृषी विभागाने घेतले आहे. तेही तपासणीकरिता नागपूर येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. बाजारात आतापर्यंत सोयाबीनचे १४ हजार क्विंटल बियाणे दाखल झाले आहेत.

टॅग्स :cottonकापूस