शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
2
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
3
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
4
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
5
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
6
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
7
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
8
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
9
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
10
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
11
‘सीएसएमटी’वरील १८ नंबरचा प्लॅटफॉर्म ३ महिने बंद राहणार; १ ऑक्टोबरपासून पायाभूत कामे
12
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
13
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
14
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
15
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
16
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
17
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
18
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
19
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
20
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:09 IST

राहुल गांधी : मोदींची चौकीदारी श्रीमंत उद्योगपतींपुरतीच

योगेश पांडे/राजेश भोजेकर/ अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर/वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास २०१९ मध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर करताना कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प केला जाईल, असे आश्वासन कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्धा येथे आयोजित जाहीर सभेत दिले. तत्पूर्वी त्यांनी चंद्रपूर चांदा क्लब मैदान येथील सभेत पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. शेतकरी, कामगार वर्ग यांच्या घरासमोर कधीही चौकीदार नसतो. केवळ अंबानी, अदानी यासारख्या धनाढ्य उद्योगपतींच्या घरासमोरच चौकीदार दिसून येतो. त्यांची चौकीदारी ही श्रीमंत उद्योगपतींपुरतीच मर्यादित आहे, या शब्दांत हल्लाबोल केला.

आपल्या देशात पैशाची कमी नाही. मात्र शासनाकडून जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी, मजुरांना देण्यासाठी पैशांची अडचण असल्याचे सांगितले जाते, मात्र अंबानीसारख्या उद्योगपतींना कर्जवाटप करण्यात येते. हेच अंबानीसारखे लोक मोदींचे मार्केटिंग करतात. गरिबांना नसाल देत, तर मग उद्योगपतींना सरकार पैसे का देते, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आम्ही निवडणुकांनंतर जीएसटीमध्ये बदल करू व करप्रणाली सुलभ करून एक देश एक कर प्रणाली आणू. मोदी यांची १५ लाखांची कल्पना मला पण आवडली होती. पण ते आश्वासन पोकळ होते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले, असा चिमटादेखील त्यांनी काढला.

वर्धा येथील सभेतही राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकारचे गरीब शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाले. सत्तेत आल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग फॅक्टरी शेताजवळच तयार करू, असे ते म्हणाले.चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर, गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी तर वर्धा येथील उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्या प्रचारासाठी या सभा झाल्या.प्रमुख मुद्देच्ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला. त्यादिवशी देश दु:खात होतात. मात्र नरेंद्र मोदी हे त्यावेळी अदानी यांना सहा विमानतळ देण्यास व्यस्त होते.च्मोदी यांनी नियमांना धाब्यावर बसवून विमान बनविण्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांना राफेल करारात फायदा मिळवून दिला.च्सत्तेवर आलो तर महाराष्ट्रात अन्नप्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण करू.मोदींनी केला अडवाणींचा अपमानसध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र, मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

वर्धा-नागपूर इनोव्हातून प्रवास; ढगाळ वातावरणाचा परिणामराहुल गांधी वर्धा येथे चंद्रपूर येथून ५ वाजून ७ मिनीटांनी हेलिकॉप्टरने आले. त्यानंतर ६ पर्यंत ते वर्धेत होते. सभा संपताच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरच्या चालकाने हेलिकॉप्टर नेणे धोक्याचे ठरू शकते. असे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण दोघेही इनोव्हा गाडीतून नागपूर विमानतळावर आले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस