शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

काँग्रेस सत्तेत आल्यास शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 08:09 IST

राहुल गांधी : मोदींची चौकीदारी श्रीमंत उद्योगपतींपुरतीच

योगेश पांडे/राजेश भोजेकर/ अभिनय खोपडे ।लोकमत न्यूज नेटवर्क

चंद्रपूर/वर्धा : आगामी लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास २०१९ मध्ये देशाचा अर्थसंकल्प सादर करताना कृषीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प केला जाईल, असे आश्वासन कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी वर्धा येथे आयोजित जाहीर सभेत दिले. तत्पूर्वी त्यांनी चंद्रपूर चांदा क्लब मैदान येथील सभेत पंतप्रधान मोदींच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. शेतकरी, कामगार वर्ग यांच्या घरासमोर कधीही चौकीदार नसतो. केवळ अंबानी, अदानी यासारख्या धनाढ्य उद्योगपतींच्या घरासमोरच चौकीदार दिसून येतो. त्यांची चौकीदारी ही श्रीमंत उद्योगपतींपुरतीच मर्यादित आहे, या शब्दांत हल्लाबोल केला.

आपल्या देशात पैशाची कमी नाही. मात्र शासनाकडून जनतेला संभ्रमित केले जात आहे. शेतकरी, मजुरांना देण्यासाठी पैशांची अडचण असल्याचे सांगितले जाते, मात्र अंबानीसारख्या उद्योगपतींना कर्जवाटप करण्यात येते. हेच अंबानीसारखे लोक मोदींचे मार्केटिंग करतात. गरिबांना नसाल देत, तर मग उद्योगपतींना सरकार पैसे का देते, असा सवाल राहुल गांधी यांनी केला. आम्ही निवडणुकांनंतर जीएसटीमध्ये बदल करू व करप्रणाली सुलभ करून एक देश एक कर प्रणाली आणू. मोदी यांची १५ लाखांची कल्पना मला पण आवडली होती. पण ते आश्वासन पोकळ होते हे काळाच्या ओघात सिद्ध झाले, असा चिमटादेखील त्यांनी काढला.

वर्धा येथील सभेतही राहुल यांनी मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकारचे गरीब शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांकडे दुर्लक्ष झाले. सत्तेत आल्यास विदर्भातील शेतकऱ्यांसाठी फूड प्रोसेसिंग फॅक्टरी शेताजवळच तयार करू, असे ते म्हणाले.चंद्रपूर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुरेश धानोरकर, गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी तर वर्धा येथील उमेदवार अ‍ॅड. चारूलता टोकस यांच्या प्रचारासाठी या सभा झाल्या.प्रमुख मुद्देच्ज्या दिवशी पुलवामा हल्ला झाला. त्यादिवशी देश दु:खात होतात. मात्र नरेंद्र मोदी हे त्यावेळी अदानी यांना सहा विमानतळ देण्यास व्यस्त होते.च्मोदी यांनी नियमांना धाब्यावर बसवून विमान बनविण्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांना राफेल करारात फायदा मिळवून दिला.च्सत्तेवर आलो तर महाराष्ट्रात अन्नप्रक्रिया उद्योगांचे जाळे निर्माण करू.मोदींनी केला अडवाणींचा अपमानसध्याच्या भाजपामध्ये ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही. मोदी आणि अडवाणींचे नाते गुरु शिष्याचे आहे. मात्र, मोदींनी त्यांना डावलले. लालकृष्ण अडवाणी यांना अपमानित करून भाजपाच्या स्टेजवरून उतरवण्यात आले, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.

वर्धा-नागपूर इनोव्हातून प्रवास; ढगाळ वातावरणाचा परिणामराहुल गांधी वर्धा येथे चंद्रपूर येथून ५ वाजून ७ मिनीटांनी हेलिकॉप्टरने आले. त्यानंतर ६ पर्यंत ते वर्धेत होते. सभा संपताच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हेलिकॉप्टरच्या चालकाने हेलिकॉप्टर नेणे धोक्याचे ठरू शकते. असे सांगितले. त्यानंतर राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण दोघेही इनोव्हा गाडीतून नागपूर विमानतळावर आले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस