नो ड्यूसाठी शेतकर्यांना नाहक त्रास
By Admin | Updated: May 31, 2014 00:08 IST2014-05-31T00:08:19+5:302014-05-31T00:08:19+5:30
सध्या खरीप हंगामाची शेतकर्यांची लगबग सुरू आहे. शेतात पिकाच्या तयारीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झीजवत आहे. परंतु तेथे नोड्यूसाठी त्यांना

नो ड्यूसाठी शेतकर्यांना नाहक त्रास
वायगाव (नि.) : सध्या खरीप हंगामाची शेतकर्यांची लगबग सुरू आहे. शेतात पिकाच्या तयारीसाठी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी कर्जाची गरज असल्याने शेतकरी बँकेचे उंबरठे झीजवत आहे. परंतु तेथे नोड्यूसाठी त्यांना सतावले जात असल्याने वायगाव(नि.) येथील शेतकरी संतापले आहे.
गेल्या वर्षापासून निसर्गाचा कोप असल्याने हातचे पीक वाया जात आहे. त्यातच या वर्षी खरीप हंगामात अतवृष्टी झाली तर रब्बी पिकाचे पीक घरी आणण्याच्या वेळेवरच गारपीट व वादळाने तडाखा दिला. त्यात तोंडाचा घास शेतकर्यांचा निसर्गाने हिरावून घेतला. आता खरीप हंगामाच्या बी-बियाणे व खतासाठी बँकेच्या कर्जाच्या आशेवर शेतकरी असताना नोड्यूसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेने शेतकर्यांना नोड्यू साठी गेल्यावर आल्या पावली परत पाठवण्याचा धंदा लावल्याचे चित्र दिसत आहे.
शेतकर्यांना नोड्यू न दिल्याने शेतकर्यांना वनवन भटकावे लागत आहे. शेतकर्यांनी नोड्यूसाठी आल्या पावली परत पाठवल्याने शासकीय बँक नोड्यू न आणल्यास कर्ज देण्यास तयार नसल्याने शेतकरी संभ्रमात आले आहे. यात वायगाव येथील सरपंच गणेश वांदाडे, ग्रा. पं. सदस्य सुनील तळवेकर, यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अधिकार्यांना धारेवर धरून कार्याची जाणीव करून दिली.
त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी बेलखेडे यांना फोन करून या शेतकर्यांच्या अडचणीची जाणीव करून दिली. त्यात बेलखेडे यांनी वायगाव (नि.) शाखा व कानगाव शाखेच्या अधिकार्यांना कर्ज नसलेल्या शेतकर्यांना नोड्यू देण्याचे आदेश दिले व असे पुन्हा होणार नसल्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.(वार्ताहर)