शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

शकुंतला रेल्वेला अर्थसंकल्पात वाटाण्याच्या अक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 5:00 AM

सध्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  महाराष्ट्राचे असल्याने आता तरी या गाड्यांचे चांगले दिवस येतील, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. शकुंतला रेल्वे विकसित करून चालू केल्यास सामान्य जनतेची सोय होऊन केंद्र शासनाला आर्थिक लाभ होईल. पण याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. २०१४ च्या निवडणुकीत दिलेले वचन हे सरकार विसरले असल्याचा आरोप शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास परिषदेने केला आहे.

फनिन्द्र रघाटाटेलोकमत न्यूज नेटवर्करोहणा : २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात तत्त्वतः मान्यता दिलेल्या विदर्भातील तिन्ही शकुंतला रेल्वे मार्गाच्या विकासासाठी अर्थसंकल्पात कोणतीच आर्थिक तरतूद न केल्याने याहीवर्षी शकुंतलेची चाके जागीच राहणार असल्याची भावना शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास संघटनेने केली आहे.  मागील १५ वर्षांपासून विदर्भातील आर्वी पुलगाव, अचलपूर परतवाडा, ब्रह्मपुरी नागभीड या तिन्ही शकुंतला रेल्वे बंद स्थितीत आहेत.  २०१६ मध्ये या रेल्वे ब्रिटिशांच्या मालकीतून मुक्त झाल्या आहेत. तेव्हापासून या रेल्वेचे नॅरोगेजमधून ब्राॅडगेजमध्ये परिवर्तित करून ती सुरू करावी म्हणून या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या नागरिकांची मागणी आहे.काँग्रेसच्या काळात या सर्व गाड्या आर्थिक तोट्यात असतात हीच मानसिकता सरकारची होती. पण नंतर  भाजपच्या काळात या रेल्वे विकसित करून सुरू करण्यासाठी प्रयत्न झाला. त्यानिमित्ताने सर्व्हेदेखील केला. या तिन्ही मार्गाच्या विकास कामाला तत्त्वतः मान्यता दिली, पण त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. यासाठी निधीची तरतूददेखील झाली नाही. यावरून याही सरकारची या गाड्यांबाबत उदासीनता लक्षात येते. सध्या रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे  महाराष्ट्राचे असल्याने आता तरी या गाड्यांचे चांगले दिवस येतील, अशी आशा होती, पण ती फोल ठरली. शकुंतला रेल्वे विकसित करून चालू केल्यास सामान्य जनतेची सोय होऊन केंद्र शासनाला आर्थिक लाभ होईल. पण याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. २०१४ च्या निवडणुकीत दिलेले वचन हे सरकार विसरले असल्याचा आरोप शकुंतला रेल्वे मुक्ती व विकास परिषदेने केला आहे. विदर्भातील  लोकप्रतिनिधींनी  पुरवणी मागण्यांच्या वेळी या रेल्वेसाठी आर्थिक तरतूद करावी,   कामाला  सुरुवात करावी, अशी मागणी शकुंतला रेल्वे मुक्ती  विकास परिषदेने  केली   आहे.

 

टॅग्स :Shakuntala Trainशकुंतला रेल्वे