शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:44 IST

सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,

ठळक मुद्दे युवा सोशल फोरमची मागणी : सदाशिव खोत यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,अशी मागणी ना. सदाशिव खोत यांना सादर केलेल्या निवेदनातून युवा सोशल फोरम व राष्ट्रसेवा दलाच्यावतीने करण्यात आली आहे.गत ५० वर्षांत दरडोई पाण्याची उपलब्धता एक तृतीयांशाने कमी होत आहे. पावसाच्या प्रमाणात वर्षागणिक होत चाललेल्या घट यामुळे दरवर्षी वर्धा जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या छायेत असतात. वर्धा शहराला बोर प्रकल्प व धाम प्रकल्प महाकाळी येथून पाणी पुरवठा केल्या होतो. जानेवारी महिन्यातच बोर प्रकल्पात ४४.५७ टक्के व धाम प्रकल्प महाकाळी येथे ६१.६२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत आहे. भविष्यात जल संकटाची तीव्रता किती भीषण असेल याची कल्पना न केलेली बरी. भविष्यातील या जलसंकटाचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध पाण्याचे कालबद्ध नियोजन करणे व त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याबाबत आतापासूनच योग्य पावले उचलण्याची गरज आहे. नागरिकांना मुबलग पाणी मिळावे यासाठी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संगठक अविनाश सोमनाथे, नितेश पाटील, सचिन कोटंबकार, प्रकाश गायकवाड, एकनाथ डहाके, गोलू पाखडे, विवेक तळवेकर, मिलिंद मोहोड यांच्यासह युवा सोशल फोरम तसेच राष्ट्रसेवा दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.