शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर तत्काळ उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 23:44 IST

सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,

ठळक मुद्दे युवा सोशल फोरमची मागणी : सदाशिव खोत यांना निवेदनातून साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सध्यास्थितीत धरणांच्या पाण्याची पातळी लक्षात घेता वर्धा व लगतच्या गावांत भविष्यात पाण्याचे भीषण संकट उद्भवण्याची शक्यता आहे. या दुष्काळ सदृष्य परिस्थितीवर मात करण्याकरिता योग्य उपाययोजना करण्यात यावी,अशी मागणी ना. सदाशिव खोत यांना सादर केलेल्या निवेदनातून युवा सोशल फोरम व राष्ट्रसेवा दलाच्यावतीने करण्यात आली आहे.गत ५० वर्षांत दरडोई पाण्याची उपलब्धता एक तृतीयांशाने कमी होत आहे. पावसाच्या प्रमाणात वर्षागणिक होत चाललेल्या घट यामुळे दरवर्षी वर्धा जिल्ह्यातील अनेक गावे दुष्काळाच्या छायेत असतात. वर्धा शहराला बोर प्रकल्प व धाम प्रकल्प महाकाळी येथून पाणी पुरवठा केल्या होतो. जानेवारी महिन्यातच बोर प्रकल्पात ४४.५७ टक्के व धाम प्रकल्प महाकाळी येथे ६१.६२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत आहे. भविष्यात जल संकटाची तीव्रता किती भीषण असेल याची कल्पना न केलेली बरी. भविष्यातील या जलसंकटाचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध पाण्याचे कालबद्ध नियोजन करणे व त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. त्याबाबत आतापासूनच योग्य पावले उचलण्याची गरज आहे. नागरिकांना मुबलग पाणी मिळावे यासाठी नियोजन करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना युवा सोशल फोरमचे अध्यक्ष सुधीर पांगुळ, राष्ट्रसेवा दलाचे जिल्हा संगठक अविनाश सोमनाथे, नितेश पाटील, सचिन कोटंबकार, प्रकाश गायकवाड, एकनाथ डहाके, गोलू पाखडे, विवेक तळवेकर, मिलिंद मोहोड यांच्यासह युवा सोशल फोरम तसेच राष्ट्रसेवा दलचे कार्यकर्ते उपस्थित होते.