शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जिल्ह्यात दारू विक्री जोमात; उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचा मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 15:13 IST

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री, दारू वाहतूक आणि मद्यपान होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण होत आहे.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचारी कोमात

वर्धा : जिल्ह्याला महात्मा गांधींचा जिल्हा परिणामी दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. परंतु या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री, दारू वाहतूक आणि मद्यपान होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण होत आहे. याला आळा घालण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागावर असून या विभागाला कारवाईकरिता मुहूर्त सापडत नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्यामध्ये गावासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने येथे दारूबंदी नकोच, अशी भूमिका काही व्यक्तींनी ठामपणे मांडली आहे. काहींनी जिल्ह्यातील दारूबंदी करा, अन्यथा दारू खुली करा, अशी मागणीही केली आहे. पण हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा असल्याने या मागणीला पूर्णविराम मिळतो. याचाच फायदा दारू विक्रेते घेत आहेत. त्यांना काही प्रमाणात अधिकाऱ्यांचेही पाठबळ मिळत असल्याने दारू विक्री रोखण्यात अपयश येत आहे. खुल्या बारप्रमाणे जिल्ह्यात दारू सहज उपलब्ध होत असल्याने दारू विक्रेत्यांवर कुणाचाही वचक नसल्याने स्पष्ट होते.

शासनाने दोन वर्षांपूर्वी दारूबंदीकरिता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मात्र, ती समिती कुठे गेली हे कळायला मार्ग नाही. पोलीस विभाग रेकॉर्डसाठी दारू विक्रेत्यांवर कारवाई दाखवितात. मात्र, यात सातत्य ठेवून जिल्ह्यातील बेकायदेशीर दारू आणि वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होेत आहे.

पोलीस प्रशासन, महसूल विभाग व उत्पादन शुल्क विभाग कोणतीही मदत करीत नसल्याने दारूबंदी ग्रामविकास समिती आणि दारूबंदी महिला मंडळ गुंडाळल्या गेले आहे. दारूबंदीकरिता पुढाकार घेणाऱ्या महिला मंडळांवर दारू विक्रेत्यांनी प्राणघातक हल्ले केले. काहींना इजाही झाली, तर काहींना जीवही गमवावा लागला. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याशिवाय कोणतेही संरक्षण महिला मंडळाला दिले नसल्याची ओरड होत आहे. राज्य उत्पादन विभागाचे आयुक्त, उपायुक्त, जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारून दबदबा निर्माण करण्याची गरज आहे. पण तो दिवस कधी येणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारी