शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

जिल्ह्यात दारू विक्री जोमात; उत्पादन शुल्क विभागाला कारवाईचा मुहूर्त सापडेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 15:13 IST

जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री, दारू वाहतूक आणि मद्यपान होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण होत आहे.

ठळक मुद्देअधिकारी, कर्मचारी कोमात

वर्धा : जिल्ह्याला महात्मा गांधींचा जिल्हा परिणामी दारूबंदी जिल्हा म्हणून ओळखल्या जाते. परंतु या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारू विक्री, दारू वाहतूक आणि मद्यपान होत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेबद्दल साशंकता निर्माण होत आहे. याला आळा घालण्याची जबाबदारी उत्पादन शुल्क विभागावर असून या विभागाला कारवाईकरिता मुहूर्त सापडत नसल्याचेच चित्र पाहावयास मिळत आहे.

जिल्ह्यामध्ये गावासह शहरी भागातही मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत असल्याने येथे दारूबंदी नकोच, अशी भूमिका काही व्यक्तींनी ठामपणे मांडली आहे. काहींनी जिल्ह्यातील दारूबंदी करा, अन्यथा दारू खुली करा, अशी मागणीही केली आहे. पण हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नावाने ओळखला जाणारा जिल्हा असल्याने या मागणीला पूर्णविराम मिळतो. याचाच फायदा दारू विक्रेते घेत आहेत. त्यांना काही प्रमाणात अधिकाऱ्यांचेही पाठबळ मिळत असल्याने दारू विक्री रोखण्यात अपयश येत आहे. खुल्या बारप्रमाणे जिल्ह्यात दारू सहज उपलब्ध होत असल्याने दारू विक्रेत्यांवर कुणाचाही वचक नसल्याने स्पष्ट होते.

शासनाने दोन वर्षांपूर्वी दारूबंदीकरिता तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मात्र, ती समिती कुठे गेली हे कळायला मार्ग नाही. पोलीस विभाग रेकॉर्डसाठी दारू विक्रेत्यांवर कारवाई दाखवितात. मात्र, यात सातत्य ठेवून जिल्ह्यातील बेकायदेशीर दारू आणि वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया महिला वर्गातून व्यक्त होेत आहे.

पोलीस प्रशासन, महसूल विभाग व उत्पादन शुल्क विभाग कोणतीही मदत करीत नसल्याने दारूबंदी ग्रामविकास समिती आणि दारूबंदी महिला मंडळ गुंडाळल्या गेले आहे. दारूबंदीकरिता पुढाकार घेणाऱ्या महिला मंडळांवर दारू विक्रेत्यांनी प्राणघातक हल्ले केले. काहींना इजाही झाली, तर काहींना जीवही गमवावा लागला. या संदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याशिवाय कोणतेही संरक्षण महिला मंडळाला दिले नसल्याची ओरड होत आहे. राज्य उत्पादन विभागाचे आयुक्त, उपायुक्त, जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारून दबदबा निर्माण करण्याची गरज आहे. पण तो दिवस कधी येणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीCrime Newsगुन्हेगारी