शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

युवकांना सर्वोदयशी जोडल्यास संजीवनी प्राप्त होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 10:14 PM

भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो.

ठळक मुद्देएस.एन. सुब्बाराव : अखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप

ऑनलाईन लोकमतसेवाग्राम : भारत देश युवकांचा देश आहे. त्यामुळे युवकांना एकत्र करणे गरजेचे आहे. त्यांना विचार दिल्यास योग्य शक्तीचा उपयोग होऊ शकतो. याच युवकांना सर्वोदयाशी जोडल्यास संजीवनी प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, असे मत गांधी विचारवंत व राष्ट्रीय युवा योजनेचे डॉ. एस.एन. सुब्बाराव यांनी व्यक्त केले.सर्वोदय समाज संमेलनाचा समारोप रविवारी झाला. अध्यक्षस्थानी डॉ. सुब्बाराव तर अतिथी म्हणून न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, राधाबहन भट, जयवंत मठकर, डॉ. उल्हास जाजू आदी उपस्थित होते. डॉ. सुब्बाराव पूढे म्हणाले की, आज हिंसामुक्त भारत पाहिजे. भाषेच्या नावावर विरोध होता कामा नये. आजही देशात भुकेलेल्यांचे प्रमाण ३० कोटी आहे. ग्रामोद्योगाच्या माध्यमातून देशातील रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो. पर्यावरण रक्षण व भ्रष्टाचार मुक्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. न्या. धर्माधिकारी यांनी माणसांचे जीवन निर्भय असावे. निडलेस लाईफ असावी, ग्रीड बेस नसावे. धर्मनिरपेक्ष समाज व्यवस्था असावी. शोषण समाप्त व्हावे. समानता व सर्वांचा आदर झाला पाहिजे, असे सांगितले. डॉ. जाजू यांनी सामाजिक स्तरावरील कामात वैयक्तिकता आणू नये. निष्ठापूर्ण कामात यश मिळते. शरीरात श्वासाचे महत्त्व असते. बुद्धीत अहंकाराला स्थान देता कामा नये. मैत्री सर्वोदयचे हृदय आहे. मतभिन्नता असू शकते; पण मनभिन्नता होऊ देऊ नका, असे सांगितले. याप्रसंगी सर्व स्वयंसेवक व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी घोषणापत्राचे वाचन करण्यात आले. यात दारूमुक्त भारत बनविणे, राष्ट्रनिर्माणासाठी अहिंसा मार्ग स्वीकारून युवकांत संजिवनी निर्माण करणे, स्थानिक संसाधनांचा उपयोग आणि रोजगार वाढविणे, महिला शेतकरी, आदिवासी सिस्टम-पासून पिडीत असून निर्भयतेसाठी काम करणे, गणतंत्र व पंचायत राजला अधिक बळकट करणे, गांधीजींच्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी ग्राम-स्वराज्याला वाढविणे, अंत्योदयाची सुुरुवात करणे, सर्वोदय समाजाला व्यापक बनविणे, जय जगत नारा अधिक प्रभावी व्हावा, मूलभूत मुल्यांवरील संकटांचा सामना करण्यासाठी आम्ही सर्व सर्वोदयी व गांधीजन तत्पर असावे, असे दहा मुद्यांचे वाचन संयोजक आदित्य पटनायक यांनी केले. संचालन गिताजंली पटनायक व महादेव विद्रोही यांनी केले तर आभार डॉ. सुगम बरंठ यांनी मानले. संमेलनात देशभरातील ४५०० सर्वोदयी सहभागी झाले होते.पारंपरिक नृत्य सादरीकरणअखिल भारतीय सर्वोदय समाज संमेलनात सहभागी होण्याकरिता देशातील कानाकोपºयातून सर्वोदयी आले होते. सोबतच आसाम, त्रिपूरा येथून काही स्वयंसेवकही आले होते. त्यांनी समारोपीय कार्यक्रमात पारंपरिक लोकनृत्यातून कला, संस्कृतीचे सादरीकरण केले.