शेतकऱ्यांना सन्मान देऊ शकत नसाल, तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा
By Admin | Updated: February 14, 2016 01:54 IST2016-02-14T01:54:08+5:302016-02-14T01:54:08+5:30
देशात ८० टक्के शेतकरी आहेत. विदर्भातील शेतकरी समस्यांशी झुंज देत आहे. त्यांना सन्मानाने जगवता येत नसेल, तर ...

शेतकऱ्यांना सन्मान देऊ शकत नसाल, तर राज्य सरकारने राजीनामा द्यावा
राखी बिडलान : आपचा जनाधार वाढला
वर्धा : देशात ८० टक्के शेतकरी आहेत. विदर्भातील शेतकरी समस्यांशी झुंज देत आहे. त्यांना सन्मानाने जगवता येत नसेल, तर महाराष्ट्र राज्य सरकारने राजीनामा देऊन निवडणुकांना सामोरे गेले पाहिजे, असा आरोप दिल्ली सरकारच्या माजी महिला बाल कल्याण मंत्री व आपच्या नेत्या राखी बिडलान यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
राज्यात व दिल्लीत भाजपाचे सरकार आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यास कोणतीही अडचण नाही. शेतकऱ्यांना सन्मानाने जगू देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे, असेही त्या म्हणाल्या. राखी बिडलान विदर्भाचा दौरा आटोपून आज सायंकाळी वर्धेत आल्या होत्या. दरम्यान, त्यांनी येथील आपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आप या पक्षाची स्थापना झाल्यामुळे हा पक्ष निवडणुका लढणार आहेच. मात्र सर्वप्रथम दिल्ली हे उद्दीष्ट होते. दिल्लीत आप सरकारने केलेल्या कामांचा आदर्श देशातही घडविण्याचा पक्षाचा मानस आहे. आता लक्ष पंजाब राज्यावर केंद्रित केलेले आहे. पंजाबच्या आगामी निवडणुकीत पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. देशात पक्षाचा जनाधार वाढला आहे, संघटनही मजबूत होत असून सदस्य संख्याही वाढीवर आहे. तेव्हा पंजाबमध्येही दिल्लीची पुनरावृत्ती होईल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.नागपूरचे आपचे नेते जगजीतसिंग, प्रमोद भोमले, पंकज सायंकार,प्रमोद भोयर व कार्यकर्ते उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)
दिल्ली सरकार मोहल्ला सभेतून बजेट सादर करणार
दिल्लीत सर्व जनतेला मोफत औषधी उपलब्ध करुन देण्याची तयारी करीत आहे. तसेच या वर्षीचा अर्थसंकल्प वित्तमंत्री मनीष सिसोदिया हे मोहल्ला सभेच्या माध्यमातून सादर करणार आहे. याची तयारीही जवळपास पूर्णत्वास आलेली आहे, असेही त्या म्हणाल्या.