मी ग्रामसेवक...आज गावकऱ्यांच्या सेवेत हजर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 05:00 IST2020-04-27T05:00:00+5:302020-04-27T05:00:49+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तत्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही काहींनी याकडे पाठ फिरविल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तीन समित्या गठीत करुन कारवाईचा बडगा उगारला.

मी ग्रामसेवक...आज गावकऱ्यांच्या सेवेत हजर!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणूच्या साथरोग काळात काही गावातील ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी होऊ लागल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ग्रामसेवक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उपस्थित असल्याबाबत ‘जीपीएस मॅप, कॅमेरा अॅप’ व्दारे छात्राचित्र पंचायत समितीला पाठविणे बंधनकारक केले आहे. आता प्रत्येक ग्रामसेवकाला मुख्यालयी असल्याबाबतचा पुरावा द्यावा लागत असल्याने चांगलीच पंचाईत झाली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तत्काळ उपाययोजना व्हाव्या म्हणून जिल्हा परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचाºयांना मुख्यालयी राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. तरीही काहींनी याकडे पाठ फिरविल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तीन समित्या गठीत करुन कारवाईचा बडगा उगारला. पहिल्याच दिवशी दोन समित्यांनी आठ अधिकाऱ्यांची तपासणी करीत ते मुख्यालयी आढळून न आल्याने त्यांची तात्पूरत्या स्वरुपात वार्षिक वेतनावाढ रोखली. आता ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाºयांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एकीकडे गावांची व ग्रामस्थांची काळजी घेण्याकरिता काही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी दिवसरात्र झटत आहे. पण, काही मुख्यालयी राहात नसल्याच्या तक्रारी झाल्यामुळे ग्रामसेवकांनी आपल्या कार्यक्षेत्रात कार्यालयीन दिवशी उपस्थित असल्याबाबत सकाळी ९ व दुपारी १२ या दरम्यान ‘जीपीएस मॅप, कॅमेरा अॅप’ व्दारे पंचायत समिती कार्यालयास एक छायाचित्र पाठविण्याचे आदेश दिले आहे.
ग्रामसेवकांनी शक्यतो ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभे राहून छायाचित्र पाठवावे. शक्य नसल्यास कार्यक्षेत्र, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद जेथे कुठे असतील त्या ठिकाणाहून छायाचित्र पाठविण्याचे निर्देश दिले. यासंदर्भात सर्व गट विकास अधिकाऱ्यांना पत्र पाठविण्यात आले असून या कामाकरिता कनिष्ठ लिपीकाची नेमणूक करुन त्यांच्यामार्फत दररोज छायाचित्र पाठविल्याबाबतचा अहवाल तयार करुन तो जिल्हा परिषदेला सादर करण्यास सांगितले आहे.
त्यामुळे पंचायत समिती स्तरावरुन या आदेशाची अंमलबजावणी सुरु झाल्याने दांडी बहाद्दर ग्रामसेवकांनी आता मुख्यालयाकडे धाव घेतली आहे.
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा हाहाकार सुरु असल्याने प्रत्येक तालुक्यात, गावागावांत प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. पण, काही ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच तक्रारी आल्यानंतर ग्रामसेवक संघटनेशी चर्चा करुन त्यांनी उपस्थितीबाबत आपले छायाचित्र ‘जीपीएस मॅप, कॅमेरा अॅप’ व्दारे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहे. याची अंमलबजाणी पंचायत समिती स्तरावरुन सुरु झाली असून दैनंदिन अहवाल जिल्हा परिषदेला सादर होत आहे. यात कुणीही हयगय केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल.
डॉ. सचिन ओम्बासे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.,वर्धा