शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

चॉकलेटच्या किमतीत अंगणवाडी पोषण आहार कसा देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:17 IST

महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी, बालवाडी विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत आहे.

ठळक मुद्देअनुदान वाढीची मागणी : बचतगट, पोषण आहार शिजविणाºयांचा प्रश्न

गौरव देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महिला व बालकल्याण विभागामार्फत अंगणवाडी, बालवाडी विद्यार्थ्यांना प्रथिनेयुक्त आहार देण्याचा गाजावाजा करण्यात येत आहे. या योजनेतून मात्र बालकांची थट्टाच होत असल्याचा आरोप अंगणवाडी सेविका, मदतनीसांसह पालक करीत आहे. पोषण आहाराच्या नावावर केवळ ४ रुपये ९२ पैसे देण्यात येत आहे.महिला व बालकल्याण विभागामार्फत शालेय पोषण आहार पोहचविण्यात येते. पोषण आहाराकरिता एका विद्यार्थ्यांमागे ४ रुपये ९२ पैसे अनुदान देण्यात येते. सर्व खर्च संबंधित अंगणवाडी आहार बनविणाºया महिला किंवा बचत गटांकडे असतो. या योजनेत ५० टक्के केंद्र तर ५० टक्के राज्य सरकार अनुदान देते. या तोकड्या अनुदानात सर्व साहित्य, धान्य लागणारे इंधन आणि भाजीपाला, खरेदीसह अठवड्यातून काही दिवस व्हिटॅमीनयुक्त पदार्थ यात गुळ, शेंगदाणे लाडू, वडी, राजगिरा शिरा, उसळ आदींकरिता हे अनुदान दिले जाते. हे अनुदान एका चॉकलेटच्या किमतीचे असून यातून उष्मांक व प्रथिनेयुक्त पोषण आहार कसा घ्यावा, असा प्रश्न बचत गटांना व आहार बनविणाºया महिलांना पडला आहे. महागाईच्या काळात या एवढ्या तोडक्या रकमेत कसा पोषण आहार मिळणार असा सवाल असून यातून शासन एक प्रकारे विद्यार्थ्यांची थट्टाच करीत असल्याचा आरोप होत आहे.प्रत्येक दिवस कुठला आहार द्यावा याचा टाईमटेबल शासनाने दिला आहे. मुंग खिचडी, मसाले भात, शिरा, पोहा, सोजी, शेंगदाने लाडू, राजगिरा लाडू आदी देणे बंधनकारक आहे.मिळणाºया अनुदानात धान्य, भाजीपाला, तिखट, मीठ, तेल व इंधन खरेदीनंतर काय उरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अंगणवाडी पोषण आहार बनविण्यासाठी बचतगट, महिला मिळणे कठीण झाले आहे. नाईलाजाने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना पोषण आहार शिजवावा लागत आहे. त्यातही महिला बालकल्याण अंगणवाडी सेविकांना सुपरवायझर बनविण्यास नकार देऊन विद्यार्थ्यांना आहार बंद करण्याची तंबी देत असल्याची माहिती आहे.अनुदान फार कमी आहे. आमच्या विभागामार्फत अनुदान वाढीसाठी पाठपुरावा सुरू आहे. अंगणवाडी मध्ये विद्यार्थी संख्या जास्त असल्यास बचत गटांना पोषण आहार द्यावे लागते. मात्र विद्यार्थी संख्या कमी असणाºया अंगणवाडीमध्ये बचत गट किंवा पोषण आहार बनविण्यासाठी महिला मिळत नसेल तर त्यास ठिकाणी अंगणवाडी सेविकांना पोषण आहार बनवावे लागते.- विवेक इलमे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, वर्धा