वर्धा जिल्ह्यातील आंजी येथे आगीत घर जळून भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 12:26 PM2020-05-22T12:26:04+5:302020-05-22T12:26:23+5:30

वर्धा जिल्ह्यातील आंजी मोठी येथे राहणाऱ्या प्रकाश मारोती कपाट यांच्या घराला शुक्रवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास अचानक आग लागून ते जळून खाक झाले.

A house caught fire in Anji in Wardha district | वर्धा जिल्ह्यातील आंजी येथे आगीत घर जळून भस्मसात

वर्धा जिल्ह्यातील आंजी येथे आगीत घर जळून भस्मसात

Next
ठळक मुद्देलाख रुपयाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा: जिल्ह्यातील आंजी मोठी येथे राहणाऱ्या प्रकाश मारोती कपाट यांच्या घराला शुक्रवारी सकाळी ९.४५ च्या सुमारास अचानक आग लागून ते जळून खाक झाले. आग लागली तेव्हा कपाट दांपत्य शेतमुजुरीला गेले होते. त्यांचा मुलगा व मुलगी बाहेर अंगणात खेळत होते. अशातच घरातून धूर निघत असल्याचे मुलीच्या लक्षात आले. तिने घरात डोकावले असता, आगीचे लोळ निघत असलेले पाहिले. तिचा आरडाओरडा ऐकून नागरिक जमा झाले व त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने मोठे रुप धारण केले असल्याने ती आटोक्यात येईपर्यंत घरातले सर्व सामान जळून खाक झाले होते. यात त्यांचे एकदीड लाखांचे नुकसान झाले आहे. आजींचे प्रभारी गिरीश चंदनखेडे हे तपास करीत आहेत. आगीचे कारण अद्याप समजलेले नाही.

Web Title: A house caught fire in Anji in Wardha district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग