शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयाचा कारभार आरोग्य केंद्रातूनच

By admin | Updated: October 29, 2014 22:53 IST

ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मोफत मिळावी म्हणून शासनाने गाव तेथे दवाखाना धोरण राबविले़ १९८४ मध्ये शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यावर शासनाने प्राथमिक

बांधकाम अंतिम टप्प्यात : पदभरती अद्याप झालीच नाही; ग्रामीण रुग्णालय केवळ नावापुरतेचआष्टी (श़) : ग्रामीण भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा मोफत मिळावी म्हणून शासनाने गाव तेथे दवाखाना धोरण राबविले़ १९८४ मध्ये शहीदभूमीला तालुक्याचा दर्जा मिळाल्यावर शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा दिला़ लोकसंखा वाढल्याने तब्बल २४ वर्षांनी २००९ मध्ये ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला़ यासाठी ३ कोटी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. बांधकामही ८० टक्के पूर्ण झाले; पण शासनाने अद्याप कर्मचारी व अधिकाऱ्यांची पदभरती केली नाही. यामुळे ग्रामीण रुग्णालय नावापुरतेच काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत़ २००९ मध्ये तत्कालीन आमदार अमर काळे यांनी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे पाठपुरावा करून ३५ खाटेचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करून घेतले. यानंतर नियोजित जागेवरून वाद झाल्याने माजी आमदार दादाराव केचे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवरच ग्रामीण रुग्णालय हवे, अशी मागणी लावून धरली. येथे आजी-माजी आमदारांच्या वादात जनतेची मुस्कटदाबी झाली. शेवटी आ. काळे यांनी जनतेवरच निर्णय सोपवून वादातून माघार घेतली व केचे यांनी त्याच ठिकाणी बांधकाम करायला लावले. सदर जागा आठवडी बाजार, ग्रामपंचायत, शाळा याला लागून असल्याने भविष्यात रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत होती़ इमारत बांधकामाचा आगडोंब सोडला तर शासनाने ग्रामीण रुग्णालयाप्रती अनास्थेचे धोरण स्वीकारल्याचेच दिसून आले़आरोग्य उपसंचालक नागपूर, जिल्हा शल्यचिकित्सक वर्धा यांनी वारंवार पत्रव्यवहार करून पदभरती करण्याची मागणी केली़ त्यासाठी बृहत आराखडा मंजूर झाला होता; पण काही ठिकाणी राजकारण आडवे आल्याने ही समस्या आजही कायम आहे़ तालुक्याची लोकसंख्या ५० हजारांच्या वर आहे. एकट्या आष्टी, नवीन आष्टी, पेठअहमदपूर या तीनही गावांची मिळून लोकसंख्या २२ हजार आहे. अशावेळी ग्रामीण रुग्णालय नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. रोगराई वाढली आहे. डेंग्यू, गॅस्टोची साथ सतत वाढत आहे. रुग्णतपासणी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन्ही पदे रिक्त आहेत़ तालुका आरोगय अधिकारी पदही रिक्त आहे. रुग्णालय म्हटले की केवळ सुसज्ज इमारत असून चालत नाही. त्यासाठी डॉक्टर, परिचारिका, यंत्र, औषधीसाठा असणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून शासनाने त्वरित ग्रामीण रुग्णालयात कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदभरती करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.(प्रतिनिधी)