शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची धास्ती;भक्तांनी फिरवली मंदिराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे.

ठळक मुद्देअनेक मंदिर कुलूपबंद : मंदिर परिसरातील दुकानदारावरही बेरोजगारीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : रोज ज्या मंदीरात पूजा व्हायची, देवाळतल्या मूर्तींची आंघोळ व्हायची, ज्या मंदीरातील रोज घंटानाद होऊन आरती केली जायची, ती मंदिरे गेल्या आठवड्यापासून ओस पडलेली आहे. एकही भाविक या मंदिराकडे फिरकत नसून मंदिरेही कुलूपबंद करण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या धास्तीने परिसरातील ग्रामीण भागातीलही अनेक मंदिर कुलूप बंद आहे. मंदिर कुलूपबंद असल्यामुळे भक्तमंडळी मंदीराकडे जातांना दिसत नाही. सध्या हे भयानक वास्तव अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतका शुकशुकाट व मंदिर बंद करण्याची वेळ परिसरातील नागरिकांनी कधीही अनुभवली नाही, असे वृद्ध मंडळी सांगत आहे. संकटाच्या वेळी देवाचे नाव घेणारे व मंदीराचा दरवाजा ठोठावणारे आपण पाहिले. परंतु कोरोना आजाराच्या धास्तीने मंदिर बंद पडल्याने देवळातील मूर्ती सुध्दा ऐकटी पडली आहे.जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे. कधी नव्हे ऐवढ्या भीषण परिस्थितीला नागरिक समोर जातांना दिसत आहे.कोरोना आजाराच्या धास्तीने अनेकांचे रोजगार हिरावला आहे. कंपन्या, शेतीचे कामे, दुकान बंद पडल्याने रोजगार बंद पडला आहे. अनेक गरिबांच्या घरची परिस्थिती हातावर आणने व पानावर खाण्यासारखी आहे. सर्वच कामे बंद पडल्याने व रोजगार नसल्याने अनेकांचे दोन वेळचे जेवणाचे वांदे झाले आहे. या परीसरात समृध्दी महामार्गाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर या परिसरात दाखल झाले आहे. अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या अ‍ॅफकॉन कंपनीने काम बंद केल्याने अनेक परप्रांतीय मजूर बेरोजगार झाले आहे. त्यांच्या हाताला काम नाही कंपनीने कामाच्या दिलेल्या पैशात त्याचा संसार चालविला जात आहे. हातातील पैसा संपल्यावर काय करायचे, काय खायचे, लेकराबाळांचे पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मजूर विरुळ व रसुलाबाद गावात येऊन काम मागत आहे. कामेच नसल्याने व सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्यांना काम तरी कसे द्यायचे ही समस्या आहे. म्हणून त्यांची या संचारबंदीच्या काळातही मजुरीकरिता भटकंती सुरु असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTempleमंदिर