शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
2
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
3
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
4
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
5
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
6
कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
7
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
9
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
10
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
11
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!
12
एकदाच गुंतवणूक करा... दरमहा २०,००० रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, कोण घेऊ शकतो लाभ?
13
Formal ED Chief Karnal Singh: नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
14
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग बदलून राहा सेफ
15
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
16
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
17
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
18
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
19
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
20
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?

कोरोनाची धास्ती;भक्तांनी फिरवली मंदिराकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 06:00 IST

जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे.

ठळक मुद्देअनेक मंदिर कुलूपबंद : मंदिर परिसरातील दुकानदारावरही बेरोजगारीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कविरूळ (आकाजी) : रोज ज्या मंदीरात पूजा व्हायची, देवाळतल्या मूर्तींची आंघोळ व्हायची, ज्या मंदीरातील रोज घंटानाद होऊन आरती केली जायची, ती मंदिरे गेल्या आठवड्यापासून ओस पडलेली आहे. एकही भाविक या मंदिराकडे फिरकत नसून मंदिरेही कुलूपबंद करण्यात आली आहे.कोरोना विषाणूच्या धास्तीने परिसरातील ग्रामीण भागातीलही अनेक मंदिर कुलूप बंद आहे. मंदिर कुलूपबंद असल्यामुळे भक्तमंडळी मंदीराकडे जातांना दिसत नाही. सध्या हे भयानक वास्तव अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. इतका शुकशुकाट व मंदिर बंद करण्याची वेळ परिसरातील नागरिकांनी कधीही अनुभवली नाही, असे वृद्ध मंडळी सांगत आहे. संकटाच्या वेळी देवाचे नाव घेणारे व मंदीराचा दरवाजा ठोठावणारे आपण पाहिले. परंतु कोरोना आजाराच्या धास्तीने मंदिर बंद पडल्याने देवळातील मूर्ती सुध्दा ऐकटी पडली आहे.जगभर कोरोनाची धास्ती आहे. गर्दी टाळण्यासाठी संचारबंदी लागू केल्याने अनेक नागरिक घरीच देवपूजा करुन कोरोना आजाराचे संकट टळू दे अशी प्रार्थणा नागरीक करीत आहे. ज्या मारोतीच्या मंदिरावर शनिवारी गर्दी व्हायची, आता त्याही संकटमोचनाच्या मंदिरावर कुणीच दिसत नाही. गावातील अनेक नागरिक मंदीराच्या पारावर गप्पा गोष्टी करायचे, तो मंदीराचा पार ही शांत झाला आहे. कधी नव्हे ऐवढ्या भीषण परिस्थितीला नागरिक समोर जातांना दिसत आहे.कोरोना आजाराच्या धास्तीने अनेकांचे रोजगार हिरावला आहे. कंपन्या, शेतीचे कामे, दुकान बंद पडल्याने रोजगार बंद पडला आहे. अनेक गरिबांच्या घरची परिस्थिती हातावर आणने व पानावर खाण्यासारखी आहे. सर्वच कामे बंद पडल्याने व रोजगार नसल्याने अनेकांचे दोन वेळचे जेवणाचे वांदे झाले आहे. या परीसरात समृध्दी महामार्गाच्या कामासाठी अनेक परप्रांतीय मजूर या परिसरात दाखल झाले आहे. अनेक कुटूंब वास्तव्यास आहे. कोरोनाच्या प्रभावामुळे समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या अ‍ॅफकॉन कंपनीने काम बंद केल्याने अनेक परप्रांतीय मजूर बेरोजगार झाले आहे. त्यांच्या हाताला काम नाही कंपनीने कामाच्या दिलेल्या पैशात त्याचा संसार चालविला जात आहे. हातातील पैसा संपल्यावर काय करायचे, काय खायचे, लेकराबाळांचे पोट कसे भरायचे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मजूर विरुळ व रसुलाबाद गावात येऊन काम मागत आहे. कामेच नसल्याने व सर्व व्यवहार ठप्प झाल्याने त्यांना काम तरी कसे द्यायचे ही समस्या आहे. म्हणून त्यांची या संचारबंदीच्या काळातही मजुरीकरिता भटकंती सुरु असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसTempleमंदिर