शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

वर्धा जिल्ह्याचा इतिहास येणार पुस्तकरूपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2020 2:31 PM

विदर्भातील अकराही जिल्ह्याचा इतिहास ८ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे.

ठळक मुद्देकला-साहित्यापासून ते राजकारण-सामाजिक चळवळींची संकलित केली जातेय माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सर्वगुणसंपन्न अशा विदर्भाचा नावलौकिक असला तरी त्याचे दस्तावेजीकरण झालेले नाही. ही बाब हेरत काही प्रगल्भ लेखकांनी पुढाकार घेऊन या संपूर्ण इतिहासाचा मागोवा घेत, त्यात वर्तमान प्रमुख घडामोडींचेही संकलन करीत विदर्भाची इत्यंभूत माहिती कागदावर उतरण्याचे कार्य सुरू केले आहे. यात वर्धा जिल्ह्याचा इतिहासही पुस्तक रूपात येणार आहे.वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकला, प्रबोधनाचा वसा देणारे संतांचे कार्य , विविधतेने नटलेला निसर्ग व वैशिष्ट्यपूर्ण लोकजीवन असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या प्राचीन राजवटीपासून ते आजच्या राजकारणापर्यंत, संत चळवळीपासून आजच्या अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीपर्यंत आणि विनोबा- गांधीजींच्या आगमनापासून ते जिल्ह्याची स्वातंत्र्योत्तर वाटचाल अधोरेखित केली जाणार आहे.प्राचीन मध्ययुगीन साहित्य निर्मितीचा आजच्या काळाची संबंध साधला जाणार आहे. संपूर्ण सांस्कृतिक पर्यावरणाचा साक्षेपी साधार, चिकित्सक वेध घेण्याचे महत्त्वाकांक्षी आणि धाडसी कार्य विदर्भातच युद्धपातळीवर सुरू आहे. विदर्भाचा सांस्कृतिक इतिहास कागदावर या माध्यमातून जिवंत होत आहे.

इतिहास ग्रंथरूपातया स्मृतिरूप इतिहासाचे ग्रंथरूपाने दस्तावेजीकरण होत आहे. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या संकल्पनेतून व समीक्षक डॉ. अजय देशपांडे यांच्या संपादनात हा प्रकल्प सुरू आहे.

अकराही जिल्ह्याचा इतिहास आठ खंडांमध्येया स्मृतिरूप ग्रंथात विदर्भातील अकराही जिल्ह्याचा इतिहास ८ खंडात समाविष्ट केला जात आहे. यात वर्धा जिल्ह्याचा सांस्कृतिक इतिहास लिहिण्याची जबाबदारी अभ्यासक डॉ. राजेंद्र मुंढे यांच्यावर संपादक मंडळाने सोपविली आहे. जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यक्ती, इतिहासाचे जाणकार, स्वातंत्र्य सैनिक, कार्यकर्ते तसेच ज्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याची माहिती, दुर्मिळ कागदपत्रे, छायाचित्रे, नकाशे आदी असेल तर ती द्यावी. त्यांनी दिलेल्या माहितीचा लेखन कार्यात उपयोग झाल्याचा स्पष्टपणे नामनिर्देश केला जाईल . असे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :historyइतिहास