पाच गावांतील शाळा झाल्यात ‘हायटेक’

By Admin | Updated: February 9, 2016 01:56 IST2016-02-09T01:56:53+5:302016-02-09T01:56:53+5:30

ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या सहकार्यातून तालुक्यातील पाच गावांतील शाळा ‘हायटेक’ झाल्या आहेत.

'High Tech' in five villages | पाच गावांतील शाळा झाल्यात ‘हायटेक’

पाच गावांतील शाळा झाल्यात ‘हायटेक’

उब्दा शाळेतही राबविणार उपक्रम : पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थ्यांनी केला अभ्यास
समुद्रपूर : ग्रामपंचायत प्रशासन, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती आणि शिक्षकांच्या सहकार्यातून तालुक्यातील पाच गावांतील शाळा ‘हायटेक’ झाल्या आहेत. अन्य शाळांमध्येही तत्सम उपक्रम राबविता यावे आणि विद्यार्थ्यांना नवीन शिक्षण पद्धती अवगत करता यावी म्हणून पदाधिकारी, ग्रामस्थ व शिक्षकांची धडपड सुरू झाल्याचे दिसते. जि.प. उच्च प्राथमिक शाळा उब्दा येथेही हा उपक्रम राबविता यावा म्हणून पदाधिकारी, ग्रामस्थ व शिक्षक सरसावले आहेत.
जि.प. उच्च प्राथमिक शाळा उब्दा यांनी पं.स. गटशिक्षणाधिकारी यांची परवानगी घेत विविध उपक्रमशील, गुणवत्ताप्राप्त, ई-लर्निंग शाळांचा अभ्यास केला. यात हिंगणघाट पंचायत समितीमधील जि.प. शाळा मुरपाड, काजळसरा, नरसाळा, खेकडी, कोल्ही येथील उपक्रमांची पाहणी करण्यात आली. यात उब्दा येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सुनीता उरकुडे, उपाध्यक्ष संजय कुबळे, सदस्य चौधरी, तुराळे, पुष्पा राजपूत, पांडे, उब्दाचे सरपंच सुधाकर सालवडे, माजी सरपंच अरुण महाकाळकर, सदस्य दीपक गावंडे, ग्रामस्थ गऱ्हाड, शाळेचे मुख्याध्यापक उल्हास राठोड, शिक्षक दिलीप झाडे, सुनील लोंडे व विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
शिक्षक पुलकर यांनी प्रोजेक्टर, टॅब तसेच ज्ञानरचनावर विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. शाळा उपक्रमशील करण्यात पालक तसेच ग्रा.पं. चे सहकार्य लाभले. यामुळे शाळाबाह्य कला मंच तयार करता आले, असे सांगितले. काजळसरा शाळेचे मुख्याध्यापक पोहाणे यांनी प्रत्यक्ष टॅब व प्रोजेक्टरचा शैक्षणिक गुणवत्ता वाढीस कसा उपयोग होतो, हे सांगितले. नरसाळा येथे मुख्याध्यापक पुसदेकर यांनी शाळा सजावट, ओटा बांधकाम, समाज सहभाग, श्रमदान यात ग्रामस्थांचो कसे सहकार्य लाभले, याबाबत माहिती दिली.
सर्व शाळांतील माहिती घेऊन उब्दा शाळेतील विद्यार्थ्यांना या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस पदाधिकारी, ग्रामस्थ व शिक्षकांनी व्यक्त केला.(तालुका प्रतिनिधी)

आकाश तारामंडळाची विद्यार्थ्यांना भुरळ
जि.प. शाळा खेकडी येथील शाळा वर्ग सजावट, परिसर बाग, शाळेचे बाह्यांग तसेच आकाश तारामंडळ, दोन्ही हातांनी विद्यार्थ्यांनी केलेले लेखण आणि विद्यार्थी स्वयंप्रेरणेणे टॅब हाताळताना पाहून शिक्षक, पालक व विद्यार्थी थक्क झाले. आकाश तारामंडळाने तर विद्यार्थ्यांना भूरळच घातली. शिक्षक नरवटे, मुख्याध्यापक तडस यांनी शाळा प्रगतीत समाजाचा लाभलेला सहभाग, शाळा ई-लर्निंग, डिजीटल होण्यास पालकांचा उत्साह कारणीभूत असल्याचे सांगितले. जि.प. शाळा कोल्ही येथील उपक्रम, ज्ञानरचनावाद, डिजिटल शाळा, टॅब हाताळणे, शैक्षणिक ज्ञानासह व्यावसायिक शिक्षणाची जोड आदींवर सर्वच भाळले.

Web Title: 'High Tech' in five villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.