शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

‘समृद्धी’ने दुभंगलेली मने अजूनही जुळलीच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2021 5:00 AM

जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले.

प्रफुल्ल लुंगेलोकमत न्यूज नेटवर्कसेलू : ‘पैसा आणि संपत्ती’ हे रक्ताच्या नात्यालाच नाही तर जन्मदात्यांनाही विसरायला भाग पाडतात. अशी परिस्थिती नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाने निर्माण केली आहे. या महामार्गामुळे सेलू तालुक्यातील बहीण-भावांच्या पवित्र नात्यातही अंतर निर्माण झाले आहे. आता महामार्ग पूर्ण झाला खरा; पण ही दुभंगलेली मने अद्यापही जुळली नाही. या भाऊबीजेच्या सणाला भाऊ-बहिणींमधील रुसवे फुगवे कायम असल्याने नात्यात चांगलाच दुरावा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग गेला असून यामध्ये सेलू तालुक्याचाही समावेश आहे. या महामार्गाकरिता तालुक्यातील जवळपास १६ गावांमधील पावणे तीनशे एकर जमीन संपादित करण्यात आली. या जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये देण्यात आले. या मोबदल्यातून शेतकऱ्यांच्या घरामध्ये संपन्नता आली असली तरी नात्यांमध्ये वादावादी निर्माण झाली. या पैशाकरिता बहीण-भावांमधील सलोख्याचे आणि स्नेहाचे संबंध एकाएकी दुरावल्या गेले. समृद्धी महामार्गाचा मोबदला उचलताना विवाहित बहिणी आडव्या आल्यात. त्यांनी हिस्सा-वाटणीची मागणी केल्याने नात्यांमध्ये वितुष्ट आले. जमिनीचा कोट्यवधीचा मोबदला बघून अनेकांनी ‘मी ही वारसदार’ असा कांगावा सुरू केला. समृद्धी महामार्ग विभागाने शेतीचे विक्रीपत्र करून घेतले त्यावेळी काही बहिणींनी त्यास विरोध केला. त्यामुळे कायदेशीर भावांनाच मोबदला देणे क्रमप्राप्त ठरले. त्यामुळे चारभिंतीच्या आतील वाद थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आणि बहीण-भावाचे नाते कायमचे दूर झाले. यातुनच दरवर्षी दिवाळीनिमित्ताने भाऊबिजेला माहेरी, भावाकडे येणारी बहीण गेल्या दोन वर्षांपासून फिरकलीच नाही. यावर्षीही तीच परिस्थिती असल्याने ‘या महामार्गामुळे दोन शहरांमधील अंतर कमी करून शेतकऱ्यांना समृद्ध केले; परंतु रक्तांच्या नात्यांमध्ये कायमचे अंतर वाढवून घराघरात वाद निर्माण केले’ असे मत आता व्यक्त व्हायला लागले आहे.

तिसऱ्यावर्षीही अंतर कायमपैशामुळे बहिणीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या भावाच्या मनातील बहिणीबद्दलचा आदर संपला. काही बहिणींनी पैशाला नाकारून बहीण-भावाच्या नात्याला महत्त्व दिल्याने भावांनीही स्वमर्जीने बहिणींना ओवाळणी म्हणून मोठी रक्कम दिली. मात्र, काहींचे संबंध ताणल्या गेले ते कायमचेच. सलग तिसऱ्या वर्षीही नात्यातील अंतर कायमच असल्याने हा महामार्ग नात्यात वैरी ठरला आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग